शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या बदलीचे प्रस्ताव

By admin | Updated: May 23, 2017 00:34 IST

मोठ्या प्रमाणावर निधी अखर्चित ठेवणे, ई-लर्निंग यासह अन्य काही कारणांचा ठपका ठेवून जिल्हा परिषदेतील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.

कामात हयगय : ई-लर्निंग, अखर्चित निधी कारणीभूतलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मोठ्या प्रमाणावर निधी अखर्चित ठेवणे, ई-लर्निंग यासह अन्य काही कारणांचा ठपका ठेवून जिल्हा परिषदेतील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. यात समाजकल्याण, सिंचन, पाणीपुरवठा आणि शिक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील एका अधिकाऱ्यास महिन्याभरापासून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले, तर एक अधिकारी सेवानिवृत्ती घेण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. एकाचवेळी पाच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या प्रस्तावाने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळा मागे पडल्या आहेत. या शाळांचा चेहरामोहरा बदलविण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला. कॉन्व्हेंटच्या धर्तीवर जिल्हा परिषद शाळांत ई-लर्निंगची व्यवस्था त्यांनी करून दिली होती. त्यासाठी कोट्यवधींचा निधी त्यांनी मंजूर करवून दिला होता. जिल्हा परिषदेच्या १७९४ शाळा आहेत. टप्प्याटप्प्यात या शाळांत ई-लर्निंगची सोय करून देण्याची जबाबदारी शिक्षण विभागाकडे होती. मात्र, याच विभागाने या कामात हयगय केली होती. वारंवार निर्देश, सूचना दिल्यानंतर त्याची पाहिजे तशी अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे ई-लर्निंगचे काम पडत गेले होते. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देवेंद्र सिंह यांनी याच मुद्याला घेऊन शिक्षण विभागाचे अधिकारी गारकर यांना चांगलेच धारेवर धरले होते. याच कारणामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. अजूनही ते रुजू झाले नाही.समाजकल्याण विभागाच्या अनेक योजना आहेत. अनेक योजनांची अंमलबजावणी करण्याचे समाजकल्याण अधिकारी आत्राम मागे पडल्या. या विभागाकडे तब्बल ४ कोटींचा निधी अखर्चिक राहिला. हा निधी त्यांनी मुदतीत खर्च केला नाही. अनेक लाभार्थ्यांना साहित्यही वाटप करण्यात आले नसल्याचे प्रकार या विभागातून उजेडात आला होता. सिंचन विभागाचा एक कोटी ७५ लाखांचा निधी अखर्चिक राहिला. विहिरी, शेततळे यासह अन्य कामे या विभागाच्या दिरंगाईमुळे मागे पडली होती. त्यामुळे या विभागाचे कार्यकारी अभियंता सहारे यांना धारेवर धरण्यात आले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रागडे यांच्या कार्यकाळात अनेक योजना अपूर्ण राहिल्या.नळयोजनांसाठी निधी येऊनही त्यांनी तो खर्च केला नाही. त्यामुळे मधल्या काळात तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह यांनी या विभागातील अनेक अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या होत्या. कामात हयगय आणि अखर्चिंक निधीचा मुद्दा उपस्थित करून सिंह यांनी बदलीचे प्रस्ताव तयार केले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनीही अखर्चिक निधीचा मुद्दा गांभीर्याने घेतला. अखर्चिक निधीमुळे अनेक योजना जिल्हा परिषदेला पाहिजे तथा राबविता आल्या नाही. अनेक लाभार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांनी या पाच अधिकाऱ्यांच्या बदलीचे प्रस्ताव पाठविले असल्याचे माहिती आहे. अधिकारी बदलीच्या प्रयत्नातजिल्हा परिषदेतील अनेक अधिकाऱ्यांचा कार्यकाळ आता संपुष्टात आला आहे. काहींचा कार्यकाळ अजूनही शिल्लक आहे. मात्र, जिल्हा परिषदेत काम करण्याची इच्छा नसल्याने कार्यकाळ शिल्लक असलेले काही अधिकारी बदलीच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू आहे. लवकरच बदलीचे सत्र सुरू होणार आहे.