शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

प्रकाश देवतळे, नंदू नगरकर यांच्या निष्कासनाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 23:53 IST

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंंध्येला येथील गांधी चौकातील ध्वजारोहण कुणी करावे, हा वाद प्रशासनात गेला. यामुळे प्रशासनाने दोन्ही गटातील नेत्यांना एकत्र बोलावून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देपुगलिया समर्थकांचा मंथन मेळावा : कार्यकर्त्यांनी मांडला ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंंध्येला येथील गांधी चौकातील ध्वजारोहण कुणी करावे, हा वाद प्रशासनात गेला. यामुळे प्रशासनाने दोन्ही गटातील नेत्यांना एकत्र बोलावून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही गटाचे समाधान झाले नाही. त्यामुळे ऐतिहासिक काँग्रेसचे ध्वजारोहण तहसीलदारांनी केले. या वादाचे पर्यवसान शनिवारी आयोजित पुगलिया समर्थकांच्या मंथन मेळाव्यात उमटले. कार्यकर्त्यांनी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या निष्कासनाचा प्रस्ताव पारित केला. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्या अध्यक्षतेखाली येथील राजीव गांधी सभागृहात विचार मंथन मेळावा शनिवारी पार पडला. या मेळाव्याचे आयोजन चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस, विदर्भ किसान मजदूर काँग्रेस, काँग्रेस सेवादल, महिला आघाडी, युवक काँग्रेस व इंटक संघटनेने केले होते. मेळाव्याला जिल्हाभरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाला व्यासपीठावर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, मनपा गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक प्रशांत दानव, अशोक नागापुरे, युवा नेते राहूल पुगलिया, जि.प. सदस्य शिवचंद काळे, विनोद अहिरकर, देवेंद्र बेले, मन्ना द्विवेदी, प्रवीण पडवेकर, चंद्रशेखर पोडे, माजी जि.प. सदस्य वैशाली पुल्लावार, वसंत मांढरे, तारासिंग कलशी, माजी जि.प. सदस्य गोदरू जुमनाके, सर्व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष नंदू नागरकर यांचे निष्कासन करण्यात यावे म्हणून साईनाथ बुच्चे यांनी तर ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांना निष्कासित करण्याचा प्रस्ताव वसंत मांढरे यांनी मांडला. दोन्ही पदाधिकाºयांना निष्कासीत करण्यासाठी उपस्थितांनी हात उंचावून प्रस्ताव पारित केला. संचालन व आभार प्रदर्शन अ‍ॅड. अविनाश ठावरी यांनी केले. काँग्रेसच्या दुसºया गटाची बैठक तुकूम येथे पार पडली. या बैठकीलाही कार्यकर्त्याची हजेरी होती.शेतकºयांसाठी आंदोलन करणार - पुगलियाशेतकरी वर्ग दुष्काळाशी संघर्ष करीत आहे. शासनाने कर्जमाफी केली. परंतु, निकष सुरळीत नसल्यामुळे शेतकºयांत नाराजी आहे. शेतकºयांना न्याय हक्क मिळाला पाहिजे. मात्र राज्य सरकारचे धोरण शेतकºयांना हक्कापासून वंचित ठेवण्याचे आहे. काँग्रेस पक्ष शेतकºयांच्या पाठीशी असून शेतीच्या खरीप हंगाम आटोपताच हक्क प्राप्तीसाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी दिला.आयात कार्यकर्त्यांना काँग्रेसचे पद नकोकाँग्रेस पक्षाला धर्मनिरपेक्षतेची वर्षापार परंपरा आहे. यासाठी अनेक जुन्या, कर्मठ व प्रामाणिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. अन्य पक्षातून आलेल्यांना पक्षातील महत्त्वाचे व संघटनात्मक बांधणीचे पद दिल्याने पक्षाला मजबुती येत नाही. परिणामी प्रामाणिक कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होवू नये, म्हणून आयात कार्यकर्त्यांना महत्त्वाचे पद देण्यात येवू नये, अशी भूमिका असल्याचे नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत मांडली.