शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गाळपेर जमीन वाटपाचे प्रस्ताव तत्काळ मंत्रालयात पाठवा!

By admin | Updated: April 8, 2017 00:40 IST

धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना धरणाच्या बुडीत जमिनी वहिवाटीकरिता देण्यात येते.

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : धरणग्रस्त शेतकऱ्यांना दिलासावरोरा : धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना धरणाच्या बुडीत जमिनी वहिवाटीकरिता देण्यात येते. परंतु या जमिनीवर धरणग्रस्तऐवजी इतर शेतकरी जमीन वाहिती करुन पिक घेत आहे. त्यामुळे शासनाला महसूल मिळत नाही. अशा गाळपेर जमिनी धरणग्रस्त श्ेतकऱ्यांना मिळाव्यात, याकरिता जमीन वाटपाचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी एका बैठकीत पाटबंधारे विभागास दिले आहे.वरोरा तालुक्यातील चारगाव धरणामध्ये आकोला, राळेगाव, उमरी, चारगाव, गिरोला, बोरगाव, पारडी, सावरी आदी गावातील शेकडो हेक्टर जमिनी गेल्या. धरणातील पाणी कमी झाल्यावर शिल्लक असलेल्या गाळपेर जमिनीचे वाटप धरणग्रस्त शेतकऱ्यांना केले जाते. यामध्ये शासन भूभाडे आकारत असल्याने शासनास मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो. परंतु मागील काही वर्षापासून धरणग्रस्त शेतकरी गाळपेर जमिनी वाहितीकरिता मागत आहे. परंतु या जमिनीवर अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण करुन शेती करीत असल्याने धरणग्रस्त शेतकरी गाळपेर जमिनीपासून वंचित राहत आहे. गाळपेर जमिनी मिळाव्या, याकरिता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना साकडे घालण्यात आले होते. यासंदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी धरणग्रस्त व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये कायमस्वरूपी उपलब्ध होणारी जमीन धरणग्रस्तांना दहा वर्षाकरिता भाडेतत्वार देण्यात यावी. जसजसे धरणातील पाणी कमी होईल त्यानुसार प्राधान्य क्रमाने धरणग्रस्तांना भाडे तत्वावर जमीन देण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी सदर बैठकीत दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)पोलीस संरक्षणात अतिक्रमण काढणारचारगाव धरणातील गाळपेर जमिनीवर अतिक्रमण करुन पिके घेण्यात येत आहे. त्यामुळे धरणग्रस्तांना जमिनी मिळत नसल्याने शासनाला महसुलापासून मुकावे लागत आहे. सदर जमिनीवरौल अतिक्रमण पोलीस संरक्षणात काढण्यात यावे, असे निर्देशही सदर बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. सोनवणे, सहाय्यक कार्यकारी अभियंता एस.एच. महाल्ले, शाखा अभियंता आर. एम. कोरडे, तर धरणग्रस्त शेतकरी सदाशिव उमरे, शामदेव उमरे, रामचंद्र उमरे, पाडुरंग उमरे, तुळशिराम बोथले उपस्थित होते.