शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर नोटीसची होळी

By admin | Updated: October 28, 2016 00:49 IST

महानगरपालिकेने वाढविलेल्या मालमत्ता कराविरोध नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष घुमसत आहे.

मलोआची भूमिका : सर्वपक्षीय आंदोलनचंद्रपूर : महानगरपालिकेने वाढविलेल्या मालमत्ता कराविरोध नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष घुमसत आहे. याबाबत महाराष्ट्र लोकशाही आघाडीने सर्वपक्षीय धरणे देऊन नागरिकांना पाठविण्यात आलेल्या मालमत्ता कर नोटीसची होळी करण्यात आली.चंद्रपूर मनपाच्या वाढीव मालमत्ता करवाढीस नागरिकांनी प्रचंड विरोध केल्याने ३० मे २०१६ रोजीच्या आमसभेत ठरावाद्वारे २०१६-१७ यावर्षी जुन्या दरानेच कर वसूल करण्याचे ठरले होते. तशा प्रकारची घोषणा तत्कालीन आयुक्त आणि महापौरांनी पत्रपरिषदेत केली होती. धार्मिक स्थळे, सार्वजनिक न्यास, सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करातून सुट दिली पाहिजे होती. आता मनपाने मालमत्ता कराच्या नोटीस पाठवल्या आहेत. त्यात मालमत्ता कर प्रचंड प्रमाणात वाढविला आहे. तसेच ज्यांना सूट दिली होती, त्यानाही मालमत्ता कराच्या नोटीस दिलेल्या आहेत. ही जनतेची फसवणूक आहे. त्यांचा विश्वासघात आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सर्वपक्षीय प्रचंड धरणे आंदोलन करून मनपाच्या धोरणाचा तीव्र निषेध केला. जुन्या दरानेच कर वसुली करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.मालमत्ता कर मागे घ्यावा आणि पाण्याची जुनी पाईप लाईन बदलण्यात यावी, या मागण्या त्वरीत मंजूर करून त्याची पुर्तता करावी अन्यथा महाराष्ट्र लोकशाही आघाडीद्वारे प्रचंड जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला.हे धरणे आंदोलन दिवाकर पेंदाम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी मलोआचे मुख्य निमंत्रक अंकुश वाघमारे, किशोर पोतनवार, प्रा. रमेशचंद्र दहिवडे, प्रा. नामदेव कन्नाके, प्रा. एस.टी. चिकटे, खुशाल तेलंग, शंकरराव सागोरे, हिराचंद बोरकुटे, शशिकांत देशकर, गोविंद मित्रा, प्रा. माधव गुरनुले, अरुण धानोरकर, इरफान शेख, जहीरभाई काझी, शेख मैकू शहाबुद्दीन, अनवर आलम मिर्झा, रामकुमार आकापल्लीवार, संबाजी वाघमारे, धम्मदीप देवगडे, नामदेव साव, डॉ. अभिलाषाताई गावतुरे, प्रगती भोसले, वैशाली साव, शाहिदा शेख, यशोधरा पोतनवार, शोभाताई बोगावार आदी नेते व कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)नागरिकांना दूषित पाणीपुरवठाचंद्रपूर शहराची लोकसंख्या आठ लाखांच्या वर असून शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन ६० वर्षे जुनी असल्यामुळे ती अनेक ठिकाणी फुटली आहे. त्यामुळे त्यात नालीचे घाण पाणी जाऊन ते दूषित होते. पाण्याच्या टाक्यांवर झाकन व सुरक्षा नसल्याने समाजकंटक कचरा टाकतात. त्यामुळे जनतेला तेच दूषित पाणी प्यावे लागते. परिणामी लोकांना अनेक आजारांना बळी पडावे लागत आहे. तसेच पाणी अपुरेही मिळत आहे. सदर पाईप लाईन बदलवून जनतेला स्वच्छ आणि भरपूर पाणी मिळण्याची व्यवस्था करावी., अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.