शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मालमत्ता कर नोटीसची होळी

By admin | Updated: October 28, 2016 00:49 IST

महानगरपालिकेने वाढविलेल्या मालमत्ता कराविरोध नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष घुमसत आहे.

मलोआची भूमिका : सर्वपक्षीय आंदोलनचंद्रपूर : महानगरपालिकेने वाढविलेल्या मालमत्ता कराविरोध नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष घुमसत आहे. याबाबत महाराष्ट्र लोकशाही आघाडीने सर्वपक्षीय धरणे देऊन नागरिकांना पाठविण्यात आलेल्या मालमत्ता कर नोटीसची होळी करण्यात आली.चंद्रपूर मनपाच्या वाढीव मालमत्ता करवाढीस नागरिकांनी प्रचंड विरोध केल्याने ३० मे २०१६ रोजीच्या आमसभेत ठरावाद्वारे २०१६-१७ यावर्षी जुन्या दरानेच कर वसूल करण्याचे ठरले होते. तशा प्रकारची घोषणा तत्कालीन आयुक्त आणि महापौरांनी पत्रपरिषदेत केली होती. धार्मिक स्थळे, सार्वजनिक न्यास, सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करातून सुट दिली पाहिजे होती. आता मनपाने मालमत्ता कराच्या नोटीस पाठवल्या आहेत. त्यात मालमत्ता कर प्रचंड प्रमाणात वाढविला आहे. तसेच ज्यांना सूट दिली होती, त्यानाही मालमत्ता कराच्या नोटीस दिलेल्या आहेत. ही जनतेची फसवणूक आहे. त्यांचा विश्वासघात आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सर्वपक्षीय प्रचंड धरणे आंदोलन करून मनपाच्या धोरणाचा तीव्र निषेध केला. जुन्या दरानेच कर वसुली करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.मालमत्ता कर मागे घ्यावा आणि पाण्याची जुनी पाईप लाईन बदलण्यात यावी, या मागण्या त्वरीत मंजूर करून त्याची पुर्तता करावी अन्यथा महाराष्ट्र लोकशाही आघाडीद्वारे प्रचंड जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला.हे धरणे आंदोलन दिवाकर पेंदाम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी मलोआचे मुख्य निमंत्रक अंकुश वाघमारे, किशोर पोतनवार, प्रा. रमेशचंद्र दहिवडे, प्रा. नामदेव कन्नाके, प्रा. एस.टी. चिकटे, खुशाल तेलंग, शंकरराव सागोरे, हिराचंद बोरकुटे, शशिकांत देशकर, गोविंद मित्रा, प्रा. माधव गुरनुले, अरुण धानोरकर, इरफान शेख, जहीरभाई काझी, शेख मैकू शहाबुद्दीन, अनवर आलम मिर्झा, रामकुमार आकापल्लीवार, संबाजी वाघमारे, धम्मदीप देवगडे, नामदेव साव, डॉ. अभिलाषाताई गावतुरे, प्रगती भोसले, वैशाली साव, शाहिदा शेख, यशोधरा पोतनवार, शोभाताई बोगावार आदी नेते व कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)नागरिकांना दूषित पाणीपुरवठाचंद्रपूर शहराची लोकसंख्या आठ लाखांच्या वर असून शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन ६० वर्षे जुनी असल्यामुळे ती अनेक ठिकाणी फुटली आहे. त्यामुळे त्यात नालीचे घाण पाणी जाऊन ते दूषित होते. पाण्याच्या टाक्यांवर झाकन व सुरक्षा नसल्याने समाजकंटक कचरा टाकतात. त्यामुळे जनतेला तेच दूषित पाणी प्यावे लागते. परिणामी लोकांना अनेक आजारांना बळी पडावे लागत आहे. तसेच पाणी अपुरेही मिळत आहे. सदर पाईप लाईन बदलवून जनतेला स्वच्छ आणि भरपूर पाणी मिळण्याची व्यवस्था करावी., अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.