शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्रकल्पग्रस्तांना जुन्या करारानुसारच मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:02 IST

पोवनी - ३, चिंचोली रिकॉस्ट यासह सात कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्तांना जुन्या करारानुसारच मोबदला मिळणार आहे. त्या संदर्भातील पत्र कोळसा मंत्रालयाने निर्गमित केले आहे. यामुळे मागील अनेक वर्षांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची मध्यस्थी : पोवनी ३, चिंचोली रिकॉस्टसह सात प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोवनी - ३, चिंचोली रिकॉस्ट यासह सात कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्तांना जुन्या करारानुसारच मोबदला मिळणार आहे. त्या संदर्भातील पत्र कोळसा मंत्रालयाने निर्गमित केले आहे. यामुळे मागील अनेक वर्षांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रकल्पासंदर्भातील नव्या कायद्यानुसार (एक्स.एल.ए.आर.आर.) मिळणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत प्रकल्पग्रस्त बांधवांमध्ये वेकोलि प्रशासनाने संभ्रम पसरविला होता. कोणताही वेकोलि अधिकारी याबाबत प्रकल्पग्रस्तांचे समाधान करू शकत नव्हता. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा मोबदल्यासाठीचा संघर्ष कायम होता. प्रकल्पग्रस्तांमध्ये वाढीस लागलेल्या असंतोषाची केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गंभीर दखल घेतली.ज्या प्रकल्पात सी.बी. अ‍ॅक्ट १९५७ अन्वये १४ (१) च्या प्रावधानानुसार जमिनीच्या मोबदल्याबाबत करार कार्यवाही पुर्ण झाली आहे, तसेच ज्या ठिकाणी करारनामे झालेले नाहीत, मात्रा सेक्शन ९ ची अधिसूचना यापूर्वीच लागू झाली आहे, अशा प्रकल्पग्रस्तांवर मोबदल्याबाबत अन्याय होऊ देणार नाही, असे अभिवचन ना. हंसराज अहीर यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले होते. याबाबत ना. अहीर यांनी केंद्रीय कोळसा मंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांना प्रति एकरी ६, ८ व १० लाख रूपयांचा मोबदला मान्य करणारे कोळसा मंत्रालयाचे पत्र ३० मार्चला निर्गमित करण्यात आले आहे. कोळसा मंत्रालयाच्या या अध्यादेशामुळे सात प्रकल्पातील शेतकºयांना जुन्या करारानुसारच मोबदल्याची राशी मिळणार असल्याची माहिती ना. हंसराज अहीर यांनी दिली आहे. प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणासंदर्भातील या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षांपासूनच संघर्ष थांबला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रकल्पग्रस्तांनी केला ना. अहीरांचा सत्कारया मंत्रालयीन निर्णयामुळे पौनी - ३, चिंचोली रिकॉस्ट या प्रकल्पासह सास्ती यु/जी, निलजई, उकणी अशा एकूण सात प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना लाभ मिळाल्याने या सर्व प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी ना. हंसराज अहीर यांचा राजुरा येथील एका कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी आ. अ‍ॅड. संजय धोटे, राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, जिल्हा उपाध्यक्ष अरूण मस्की, जिल्हा महामंत्री राहुल सराफ, तालुका अध्यक्ष सुनील उरकुडे आदी उपस्थित होते.