शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

मान्यतेशिवाय निधी खर्च करण्यास मनाई

By admin | Updated: July 10, 2016 00:42 IST

विभागांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता घेऊनच कामे करणे बंधनकारक आहे. अशी मान्यता न घेता कामे केल्यास ...

जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा : जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च कराचंद्रपूर : विभागांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता घेऊनच कामे करणे बंधनकारक आहे. अशी मान्यता न घेता कामे केल्यास ती अनियमितता मानली जाईल, असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी वजावले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजना, सांसद आदर्शग्राम तसेच जिल्हा नाविण्यता परिषदेअंतर्गत कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सलील बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, उपवनसंरक्षक गिरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, बांधकामचे अधीक्षक अभियंता डी. के. बालपांडे, वीज वितरणचे अधिक्षक अभियंता गजबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अण्णासाहेब हसनाबादे, जिल्हा नियोजन अधिकारी जी. आर. वायाळ, समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, एकात्मिक आदिवासी कल्याण प्रकल्प अधिकारी सुरेश वानखेडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले की, विविध शासकीय विभागांना विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या वतीने निधी उपलब्ध करुन दिला जात असतो. हा निधी योग्य बाबीवर वेळेत खर्च होणे आवश्यक आहे. वार्षिक योजनेतून या विभागांना निधी वितरित करण्यात आला आहे. त्यांनी घेण्यात आलेल्या कामांना गती द्यावी. प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजे. सर्वसामान्यांना अधिक दिलासा देणारी तसेच जोडधंदा उपलब्ध करुन देणाऱ्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देशही सलील यांनी दिले. तालुक्याच्या ठिकाणी ईको टुरिझम पार्क घेण्यासोबतच रेशिम, मधमाशा पालन यासारख्या बाबींना प्राधान्य द्यावे. त्यासाठी आवश्यकता भासल्यास वार्षिक योजनेतून वाढीव निधी उपलब्ध केला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शासकीय कामकाज करतांना पत्रव्यवहारात फार वेळ जातो. त्यामुळे कामे पाहिजे त्या गतीने होत नाही. ही बाब निदर्शनास घेता सर्व प्रकारचे पत्र व्यवहार व सुचना तथा मार्गदर्शनासाठी अधिका-यांनी व्हॉट्सअपचा जास्तीत जास्त वापर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सलील यांनी दिले. (नगर प्रतिनिधी)चंदनखेडा सांसद आदर्शग्रामचा आढावाकेंद्रीय मंत्री तथा चंद्रपूरचे खा. हंसराज अहीर यांच्या ‘चंदनखेडा’ या सांसद आदर्शग्रामचा आढावाही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत घेतला. या गावासाठी नियोजित आराखडयाप्रमाणे प्रस्तावित केलेली कामे तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सर्व उपस्थित विभागप्रमुख अधिकाऱ्यांना दिले. विभागनिहाय कामांच्या प्रगतीचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.