शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

अत्याचाराचा गडचांदुरात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:02 IST

कठुआ व उन्नाव आणि देशातील इतर ठिकाणी अल्पवयींन मुलींवर अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी गडचांदुरात गुरुवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला.

ठळक मुद्देशेकडो नागरिकांचा सहभाग :आरोपींवर कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : कठुआ व उन्नाव आणि देशातील इतर ठिकाणी अल्पवयींन मुलींवर अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी गडचांदुरात गुरुवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला. शहरातील नागरिक व विद्यार्थी हजारोंच्या संख्येने मार्चमध्ये सहभागी झाले होते. शिवाजी चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून, बसस्थानक महात्मा फुले चौक ते गांधी चौकापर्यंत मार्च काढण्यात आला होता.यावेळी नगराध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे,गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. डॉ. अनिल चिताडे, विट्ठल थीपे, नगरसेवक नीलेश ताजने, माजी उपसभापती रऊफ खान वजीर खान, नासिर खान, के.के. श्रीवास्तव, बल्लारपूर येथील थूल, पवन भगत, शेख हाफिज भाई, शरद जोगी, सागर ठाकूरवार, सुरेखा गोरे, शांता मोतेवाड, विक्रम येरणे, प्रा. अशोक डोईफोडे, शशांक नामेवार, सिद्धार्थ गोसावी, कय्युम खान, उद्धव पुरी, बंडू वैरागडे, मुमताज अली, राजू कादरी, अनिस कुरेशी, आसिफ लांबा, शेख अहेमद, शेख सिराज, नसरुद्दीन शेख, शेख अजिम आदी मान्यवर उपस्थित होते.गांधी चौकात घेण्यात आलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे संचालन रफिक शेख, प्रास्तविक प्रा. आशिष देरकर यांनी केले. देशात महिलांवर अत्याचार वाढत असल्याने उपस्थितांनी सरकारचा कठोर शब्दात निषेध केली. यावेळी ठाणेदार विनोद रोकडे यांना राष्ट्रपतीच्या नावाने निवेदन देण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सर्व जाती-धर्माचे नागरिक, महिला, युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.उन्नाव, कठुआ घटनेविरुद्ध कॅन्डल मार्चवरोरा : देशभरात अस्वस्थता निर्माण करणाऱ्या कठुआ व उन्नाव येथील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ वरोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बेटी बचाओ समिती तसेच शहरातील सामाजिक संघटनेच्या वतीने मंगळवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला. महिला सुरक्षेबाबतीत सरकार असंवेदनशील असल्याचा आरोपही यावेळी करण्यात केला. जम्मू काश्मीरच्या कठुआ येथील चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील मुलीवरील बलात्कार झाला. या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ शहरात वेगवेगळ्या भागात कँडल मार्च काढण्यात आले. हातात मेणबत्ती व निषेधाचे फलक घेऊन शहरातील सर्वधर्मीय नागरिक मार्चमध्ये सहभागी झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रगीताने कॅण्डल मार्चचा समारोप करण्यात आला.