शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

अत्याचाराचा गडचांदुरात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:02 IST

कठुआ व उन्नाव आणि देशातील इतर ठिकाणी अल्पवयींन मुलींवर अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी गडचांदुरात गुरुवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला.

ठळक मुद्देशेकडो नागरिकांचा सहभाग :आरोपींवर कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : कठुआ व उन्नाव आणि देशातील इतर ठिकाणी अल्पवयींन मुलींवर अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी गडचांदुरात गुरुवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला. शहरातील नागरिक व विद्यार्थी हजारोंच्या संख्येने मार्चमध्ये सहभागी झाले होते. शिवाजी चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून, बसस्थानक महात्मा फुले चौक ते गांधी चौकापर्यंत मार्च काढण्यात आला होता.यावेळी नगराध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे,गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. डॉ. अनिल चिताडे, विट्ठल थीपे, नगरसेवक नीलेश ताजने, माजी उपसभापती रऊफ खान वजीर खान, नासिर खान, के.के. श्रीवास्तव, बल्लारपूर येथील थूल, पवन भगत, शेख हाफिज भाई, शरद जोगी, सागर ठाकूरवार, सुरेखा गोरे, शांता मोतेवाड, विक्रम येरणे, प्रा. अशोक डोईफोडे, शशांक नामेवार, सिद्धार्थ गोसावी, कय्युम खान, उद्धव पुरी, बंडू वैरागडे, मुमताज अली, राजू कादरी, अनिस कुरेशी, आसिफ लांबा, शेख अहेमद, शेख सिराज, नसरुद्दीन शेख, शेख अजिम आदी मान्यवर उपस्थित होते.गांधी चौकात घेण्यात आलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे संचालन रफिक शेख, प्रास्तविक प्रा. आशिष देरकर यांनी केले. देशात महिलांवर अत्याचार वाढत असल्याने उपस्थितांनी सरकारचा कठोर शब्दात निषेध केली. यावेळी ठाणेदार विनोद रोकडे यांना राष्ट्रपतीच्या नावाने निवेदन देण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सर्व जाती-धर्माचे नागरिक, महिला, युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.उन्नाव, कठुआ घटनेविरुद्ध कॅन्डल मार्चवरोरा : देशभरात अस्वस्थता निर्माण करणाऱ्या कठुआ व उन्नाव येथील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ वरोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बेटी बचाओ समिती तसेच शहरातील सामाजिक संघटनेच्या वतीने मंगळवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला. महिला सुरक्षेबाबतीत सरकार असंवेदनशील असल्याचा आरोपही यावेळी करण्यात केला. जम्मू काश्मीरच्या कठुआ येथील चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील मुलीवरील बलात्कार झाला. या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ शहरात वेगवेगळ्या भागात कँडल मार्च काढण्यात आले. हातात मेणबत्ती व निषेधाचे फलक घेऊन शहरातील सर्वधर्मीय नागरिक मार्चमध्ये सहभागी झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रगीताने कॅण्डल मार्चचा समारोप करण्यात आला.