शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

प्राध्यापकांचा वनवास संपता संपेना

By admin | Updated: January 1, 2015 22:59 IST

राज्यात २००१ या वर्षापासून कायम विनाअनुदानीत तत्वावर लाखो संस्थांना शाळा महाविद्यालये देण्यात आलीत. राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा मिळावी व उच्च शिक्षण घेण्यासाठी

वनसडी : राज्यात २००१ या वर्षापासून कायम विनाअनुदानीत तत्वावर लाखो संस्थांना शाळा महाविद्यालये देण्यात आलीत. राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा मिळावी व उच्च शिक्षण घेण्यासाठी परिसरातच महाविद्यालय असावे, असा त्या मागील उद्देश होता. अशा महाविद्यालयांमध्ये डोनेशन देऊन प्राध्यापकांनी अध्यापनाचे कार्य सुरू केले. मात्र आयुष्याची १० वर्षे खर्ची घातली तरी त्यांचा वनवास संपलेला नाही. महाविद्यालयांना अनुदानच नसल्याने प्राध्यापकांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. वयाची चाळीशी ओलांडणाऱ्या प्राध्यापकांना विद्यादानाचे पवित्र काम केल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतात मजुरी, हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करावी लागत आहे. काहींनी तर फावल्या वेळात चहाटपरी चालविणे पसंत केले आहे. तर अनेकांना छोटे-मोठे व्यवसाय करुन आपले उपजिविका करावी लागत आहे. कधी तरी अनुदान मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.कित्येक प्राध्यापक शिकविणी आटोपल्यानंतर शेतात जाऊन श्रम करताना दिसतात. शाळेत जाऊन पोट भरणार नाही, याची त्यांना जाणिव असल्याने वेगवेगळे उद्योग करून त्यांना उदरनिर्वाह करावा लागत आहे. आजपर्यंत प्राध्यापकांच्या संघटनेने जवळपास २००-२५० आंदोलने केलीत. मात्र आश्वासनाशिवाय काहीच पदरी पडले नाही. विद्यादानाचे पवित्र काम करुन देशातील चांगले नागरिक घडविणाऱ्या शिक्षकांची ही अवस्था पाहून अनेकांनी या पेशाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. आज राज्यातील २० हजार शिक्षकांच्या जीवन मरणाचा हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. या प्राध्यापकांना न्यायाची अपेक्षा आहे. विना अनुदानित महाविद्यालयांना तातडीने अनुदान द्यावे व गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा वनवास कुठे तरी थांबवावा, प्राध्यापकांची मागणी आहे. (वार्ताहर)