शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

अतिउष्णतामानातही शेतकर्‍याने घेतले मक्याचे उत्पादन

By admin | Updated: May 15, 2014 23:25 IST

महिन्यातील कडक उन्हाळा व चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमान असतानाही एका शेतकर्‍याने धाडस करून भरघोस मक्याचे उत्पादन घेतले. त्यातून हजारो रुपयांची आर्थिक प्राप्ती करून अन्य शेतकर्‍यांसमोर...

प्रवीण खिरटकर - वरोरा

मे महिन्यातील कडक उन्हाळा व चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमान असतानाही एका शेतकर्‍याने धाडस करून भरघोस मक्याचे उत्पादन घेतले. त्यातून हजारो रुपयांची आर्थिक प्राप्ती करून अन्य शेतकर्‍यांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

चंद्रपूर परिसरात उष्णतामान अधिक असल्याने उन्हाळ्यामध्ये अनेक पिकांचे उत्पादन ओलीत करून येत नाही. त्यामुळे शेतकरी उन्हाळ्यात पीक घेण्याची हिंमत शेतकरी करीत नाहीत. असे असताना विसापूर (मासळ) या गावातील शेतकरी देविदास नारायण टोंगे यांनी भरघोस मक्याचे उत्पादन घेतले आहे. देविदास टोंगे या शेतकर्‍याकडे नऊ एकर शेती आहे. त्यातील पाच एकर शेती ओलिताखाली आणली. ओलिताच्या शेतीत टोंगे हे वर्षभर भाजीपाल्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेत असतात. भाजीपाला ठोक भावाने न विकता त्याची आठवडी बाजारात बसून विक्री केल्यास फायदा होत असल्याचा अनुभव देविदास टोंगे यांच्या पाठीशी आहे. त्यांनी यावर्षी प्रथमच आपल्या शेतातील पाऊण एकरात मक्याचे बियाणे लावले. जानेवारी महिन्यात बियाणे लावले. पाऊण एकरात एक हजार ९00 रुपयांची बिजाई नागपूर येथून आणण्यात आली.

तीन बाय तीन या सार्‍यात बियाणे लावले. दोन हजार रुपयांचे खत देण्यात आले. दोन हजार रुपयांची एक फवारणी, निंदन खर्च एक हजार असा सात हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. अधिक उष्णतामानामुळे मक्याचे पीक हाती येणार नसल्याचे अनेक तज्ज्ञांनी देविदास टोंगे यांना सांगितले. परंतु देविदास टोंगे यांनी धाडस केले. मक्याचे पीक येणार की नाही याची शंका असल्याने त्यांनी ढेमसाचे आंतरपीक घेतले. सहा ते सात हजार रुपये ढेमसाच्या पिकातून मिळाल्याने मका लागवडीचा खर्च निघाला. त्यामुळे देविदास टोंगे निश्‍चिंत होते. सध्या मक्याची बारा हजार झाडे असून तीन महिन्यात मक्याचे पीक हाती येवू लागले. आतापावेतो सात ते आठ तोडे झाले आहेत. यानंतरही एवढेच तोडे निघणार असून मका चवदार असल्याने बाजारात त्याची मोठी मागणी आहे. प्रत्येक तोड्यात एक ते दीड हजार मका विकावयास नेत असतात. पुढील वर्षी मक्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कष्टाला प्रामाणिक प्रयत्नांची जोड दिली की, यश आपसूकच पायाशी येतं, हेच या शेतकर्‍याने दाखवून दिले.