शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

बाजाराच्या मागणीनुसार वस्तुंची निर्मिती करा

By admin | Updated: March 3, 2017 00:49 IST

महिलांमध्ये प्रचंड शक्ती आहे. अलीकडे कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. बचतगटाच्या माध्यमातून महिला आर्थिक क्रांती घडवित आहेत.

मुनगंटीवार यांचा बचतगटांना सल्ला : सरस महोत्सव स्वयंसिध्दा - २०१७चंद्रपूर : महिलांमध्ये प्रचंड शक्ती आहे. अलीकडे कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. बचतगटाच्या माध्यमातून महिला आर्थिक क्रांती घडवित आहेत. विविध उत्पादने गटाच्या माध्यमातून महिला घेत आहेत. या गटांनी आता पारंपारिक उत्पादनांना बाजूला सारत बाजारात चांगली मागणी असलेल्या वस्तूंच्या निर्मितीकडे वळले पाहिजे, असा सल्ला राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.ग्रामीण विकास विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर तसेच जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा चंद्रपूर व गडचिरोलीच्या वतीने आयोजित महिला स्वयंसहायता गटामार्फत उत्पादित वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीकरिता विभागीयस्तरीय सरस महोत्सव स्वयंसिध्दा २०१७ च्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.नाना शामकुळे, आ.बाळू धानोरकर, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, उपाध्यक्षा कल्पना बोरकर, सभापती ईश्वर मेश्राम, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, गोंदीयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पलकुंडवार, गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, वर्धाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, उपविभागीय अधिकारी आर.दयानिधी, एस.राममूर्ती, विपीन इटनकर, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी अमन मित्तल, विकास उपायुक्त विपुल जाधव आदी उपस्थित होते.बचतगटांच्या वस्तुला अलिकडे प्रचंड मागणी निर्माण झाली आहे. एका आॅनलाईन कंपनीने बचतगटाच्या वस्तु आॅनलाईन विक्रीसाठी ठेवल्या असता त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे आढळून आले. गटांनी आता पारंपारिक वस्तुंना बाजूला करून बाजाराच्या मागणीप्रमाणे वस्तुंची निर्मिती करावी, तसेच आॅनलाईन विक्रीवर भर द्यावा, असे मुनगंटीवार म्हणाले. महिला बचतगटांनी रोजगार देणारे बनावे, असेही ते म्हणाले.बांगलादेशाने महिला बचतगटाच्या माध्यमातून क्रांती केली आहे. अशीच क्रांती आपणही करू शकतो. विविध क्षेत्रात महिला पुढे आहे. कौशल्य विकासात महिलांचे प्रमाण ५७ टक्के आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी मुलींचे प्रमाण ६८ टक्के आहे. नारी शक्तीचा रोजगार निर्मितीसाठी वापर झाला पाहिजे, असे ना. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी आमदार सुरेश धानोरकर, जि.प.अध्यक्ष संध्या गुरनुले, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, विभागिय आयुक्त अनुपकुमार यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी केले.कार्यक्रमाचे आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी अशोक सिरसे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)बचतगटांमुळे महिला व्यवहारी झाल्या - हंसराज अहीरबचतगटांमुळे देशातील महिलांमध्ये आर्थिक क्रांती घडून आली. ग्रामीण महिलांना आर्थिक व्यवहार समजले. त्या व्यवहारी झाल्या, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले. बचतगटाद्वारे महिलांच्या सक्षमीकरणात महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे. प्रयत्न, परिश्रम आणि इच्छाशक्तीतून बदल घडविता येऊ शकतो, हे राज्यातील महिलांनी दाखवून दिले आहे. कोणत्याही क्षेत्रात कौशल्याला फार महत्व आहे. गटाच्या महिलांनी कौशल्य प्राप्त करून विविध वस्तुंचे दर्जेदार उत्पादन करावे आणि चांगली बाजारपेठ मिळवावी, यासाठी शासनसुध्दा सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षण, दर्जा आणि गुणवत्तेच्या बळावर गटाची उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारात जातील, असेही त्यांनी सांगितले. महिला गटांची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी, त्याला चालना देण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घेतला पाहिजे, असेही ना. अहीर म्हणाले.३० हजार कुटुंबांना रोजगारजिल्ह्यात महिलांचे १२ हजार गट अस्तित्वात आहे. ३० हजार कुटुंबांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष गटाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त झाला असल्याची माहिती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह यांनी दिली. नागपूर विभागातील २२६ महिला गटांनी प्रदर्शनी व विक्री महोत्सवात सहभाग घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पाहुण्यांनी काही गटांच्या विक्री स्टॉलला भेटी देऊन पाहणी केली. तसेच गटाच्या महिलांशी संवाद साधला. सदर प्रदर्शनात महिलांनी निर्मित केलेल्या विविध वस्तु ठेवण्यात आल्या आहे. प्रदर्शन ६ मार्चपर्यंत चालणार असून चंद्रपूरकरांनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.