शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

फळांच्या राजावर पुन्हा प्रक्रिया

By admin | Updated: June 23, 2014 00:01 IST

कॅल्शिअम कार्बाईडचा वापर करुन पिकविलेले आंबे पुन्हा चंद्रपुरातील बाजारात विक्रीस येत आहेत. या आंब्यांचा रंग आणि चव दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीच बदलत असल्याने त्यात रसायनाचा वापर करण्यात येत

कार्बाईडचाच वापर : चंद्रपुरात करवाईनंतर सिंदेवाही पर्यायचंद्रपूर : कॅल्शिअम कार्बाईडचा वापर करुन पिकविलेले आंबे पुन्हा चंद्रपुरातील बाजारात विक्रीस येत आहेत. या आंब्यांचा रंग आणि चव दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीच बदलत असल्याने त्यात रसायनाचा वापर करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, चंद्रपुरातील मागील महिन्यात झालेल्या कारवाईनंतर काही व्यापाऱ्यांनी सिंदेवाहीत फळांच्या राजावर प्रक्रिया सुरू केल्याची माहिती आहे.येथील वाहतूक कार्यालयासमोर अनेक फळविक्रेते बसतात. तुकूम, दुर्गापूर, शास्त्रीनगर आणि अन्य भागातील नागरिक रस्त्यावर भरणाऱ्या या बाजारातूनच फळ आणि भाजी विकत घेतात. गेल्या काही दिवसांपासून येथून आंबे विकत घेणाऱ्यांना वेगळाच अनुभव येत आहे.येथून विकत घेतलेल्या आंब्यांचा रंगच दुसऱ्या दिवशी काळपट पडत असून, त्याची चवही वेगळी येत आहे. वारंवार असे प्रकार होत आहे. त्यामुळे पुन्हा फळांच्या राजावर प्रक्रिया होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.मागील महिन्यात ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते. त्यानंतर चंद्रपुरातील काही फळ व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. येथील काही फळ व्यापाऱ्यांनी आपले बस्तान सिंदेवाहीत हलविले असल्याची माहिती आहे. सिंदेवाहीत कॅल्शिअम कार्बाईडमध्ये आंबे पिकवून ते दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी चंद्रपूरसह अन्य गावात विकण्यासाठी पाठविले जात आहे. मागील महिन्यात कृषी उत्पन्न बाजर समितीतील दोन फळविक्रेत्यांच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासन विभाग, महसूल विभाग, वजनमापे आणि पोलिसांनी छापा टाकला होता. कॅल्शिअम कार्बाईडच्या पुड्या टाकलेले जवळपास साडेचार हजार किलो आंबे ताब्यात घेण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या आंब्यांची किंमत ६७ हजार ६७० रुपये इतकी होती. या कारवाईने धास्तावलेल्या काही मोठ्या फळ विक्रेत्यांनी सिंदेवाहीत आपली दुकानदारी पुन्हा सुरू केली आहे. (शहर प्रतिनिधी)