शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

विभागीय कृषी संचालकापुढे शेतकऱ्यांनी मांडल्या समस्या

By admin | Updated: November 9, 2014 22:30 IST

पोंभूर्णा तालुका परिसरामध्ये यावर्षी उशीरा व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धान पिकांना प्रचंड झळ बसली. धान पीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांचे धान

देवाडा खुर्द : पोंभूर्णा तालुका परिसरामध्ये यावर्षी उशीरा व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धान पिकांना प्रचंड झळ बसली. धान पीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांचे धान पीक सुकत आहेत. धान पिकाचे तणस झाले असून जगायचे तर कसे असा प्रश्न निराश झालेल्या शेतकऱ्यांनी नागपूरचे विभागीय कृषी सह संचालक यांना केला. विभागीय कृषी सह संचालक नागपूर यांनी आपल्या पथकासह शुक्रवारी पोंभूर्णा तालुक्याला भेट देऊन धानपिक परिसराची पाहणी केली. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. यावेळी विभागीय कृषी सह संचालक डॉ. विजय धावटे, विभागीय कृषी अधिकारी सलोदे, जिल्हा कृषी अधीक्षक हसना चहांदे, उपविभागीय कृषी अधिकारी बानोडे यांची उपस्थिती होती. कृषी अधिकाऱ्यांचे पथक ७ नोव्हेंबरला पोंभूर्णा तालुक्यामध्ये दाखल झाले. सर्व प्रथम या पथकाने मुल-पोंभूर्णा मार्गावरील जामतुकूम परिसरातील शेतशिवाराला भेट देऊन ेपावसाअभावी सुकलेल्या धानपिकांची पाहणी केली. यावेळी डॉ. विजय धावटे यांनी शेतावर उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. परिसर पाहणी केल्यानंतर या परिसरात धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे त्यांनी मान्य केले. झालेल्या नुकसान संदर्भात आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या अनेक व्यथा मांडल्या आणि या परिसरामध्ये सिंचनाची सोय नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून परंपरागत मामा तलाव, शेतबोडी, विहीर नाले यांचेवर अवलंबून शेतीचे उत्पादन घ्यावे लागत आहे. त्यामुळे अपुऱ्या सिंचन व्यवस्थेमुळे परिसरामध्ये सतत नापिकी येत असल्याचे सांगितले. यावेळी तालुका कृषी अधिकारी भाष्कर गायकवाड, पं.स. सदस्या रिनाताई बोधळकर, मंडळ अधिकारी काळे, कृषी सहाय्यक ताळे, पेंदोर व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)