शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

विभागीय कृषी संचालकापुढे शेतकऱ्यांनी मांडल्या समस्या

By admin | Updated: November 9, 2014 22:30 IST

पोंभूर्णा तालुका परिसरामध्ये यावर्षी उशीरा व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धान पिकांना प्रचंड झळ बसली. धान पीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांचे धान

देवाडा खुर्द : पोंभूर्णा तालुका परिसरामध्ये यावर्षी उशीरा व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धान पिकांना प्रचंड झळ बसली. धान पीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांचे धान पीक सुकत आहेत. धान पिकाचे तणस झाले असून जगायचे तर कसे असा प्रश्न निराश झालेल्या शेतकऱ्यांनी नागपूरचे विभागीय कृषी सह संचालक यांना केला. विभागीय कृषी सह संचालक नागपूर यांनी आपल्या पथकासह शुक्रवारी पोंभूर्णा तालुक्याला भेट देऊन धानपिक परिसराची पाहणी केली. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. यावेळी विभागीय कृषी सह संचालक डॉ. विजय धावटे, विभागीय कृषी अधिकारी सलोदे, जिल्हा कृषी अधीक्षक हसना चहांदे, उपविभागीय कृषी अधिकारी बानोडे यांची उपस्थिती होती. कृषी अधिकाऱ्यांचे पथक ७ नोव्हेंबरला पोंभूर्णा तालुक्यामध्ये दाखल झाले. सर्व प्रथम या पथकाने मुल-पोंभूर्णा मार्गावरील जामतुकूम परिसरातील शेतशिवाराला भेट देऊन ेपावसाअभावी सुकलेल्या धानपिकांची पाहणी केली. यावेळी डॉ. विजय धावटे यांनी शेतावर उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. परिसर पाहणी केल्यानंतर या परिसरात धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे त्यांनी मान्य केले. झालेल्या नुकसान संदर्भात आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या अनेक व्यथा मांडल्या आणि या परिसरामध्ये सिंचनाची सोय नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून परंपरागत मामा तलाव, शेतबोडी, विहीर नाले यांचेवर अवलंबून शेतीचे उत्पादन घ्यावे लागत आहे. त्यामुळे अपुऱ्या सिंचन व्यवस्थेमुळे परिसरामध्ये सतत नापिकी येत असल्याचे सांगितले. यावेळी तालुका कृषी अधिकारी भाष्कर गायकवाड, पं.स. सदस्या रिनाताई बोधळकर, मंडळ अधिकारी काळे, कृषी सहाय्यक ताळे, पेंदोर व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)