शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची समस्या कायमची संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:50 IST

जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये १५ कोटींची पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर लवकरच कार्यान्वित होणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची संपणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शनिवारी ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी नागपूर येथील आयुक्त कार्यालयामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : १५ कोटी रूपयांच्या ३२ पाणीपुरवठा योजनांचे ई- भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये १५ कोटींची पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर लवकरच कार्यान्वित होणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची संपणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शनिवारी ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी नागपूर येथील आयुक्त कार्यालयामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे, अतिरिक्त मुख्य सचिव पाणीपुरवठा शामलाल गोयल उपस्थित होते. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यामध्ये ३२ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रकांत वाघमारे, कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर पिपरे, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभुषण पाझारे, पांढरकवडा येथील सरपंच रंजना डवरे, पंचायत समिती सदस्या सविता कोल्हे, उपसरपंच सुरज तोतडे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. चंद्रपूर तालुक्यातील पांढरकवडा ही ग्रामपंचायत १०० पाणीकर वसुली करणारी व स्मार्ट ग्रामपंचायत ठरल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरपंचाचे कौतुक केले. त्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांच्याशी संवाद साधला. जिल्ह्यांमध्ये ज्या गावांमध्ये अशुद्ध पाणी आहे.या गावांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवावा, असे निर्देश दिले. बैठकीला गदगावच्या सरपंच पुष्पा शंकर गायकवाड, पांझुर्णीचे सरपंच भारती काळे, कातलाबोडीच्या सरपंच सविता ढेंगळे, जेवराचे सरपंच सुवर्णा वासेकर, उसेगावच्या सरपंच वैशाली गेडाम, बेलगावचे सरपंच अंबादास पाल, निफंद्राच्या सरपंच ममता खंडारे, मांगलीचे सरपंच नानाजी मुंडरे, निमगावचे सरपंच रूपाली ठाकरे, कळमगावचे संतोष डांगे, बेलसनीचे मंजुषा वाढई, पुनागुडाचे सरपंच कौशल्या कुळसंगे, शेंबडेचे सरपंच विजूमाला जिवतोडे, चांदगावचे सरपंच विद्या नागपुरे, कळमनाचे सरपंच निलेश वाडी साखरीचे सरपंच राजू घरोटे, वरगावचे उपसरपंच शंकर मोहितकर, चांदगावच्या उपसरपंच मनीषा बनसोड, मंगलीचे उपसरपंच गोकुलदास पंढरीकार, गदगावचे उपसरपंच धनराज डवले आदींचा समावेश होता.खनिज निधीचा उपयोग कराजिल्ह्यामध्ये खनिज विकास निधीची उपलब्धता आहे. यामुळे निधीची उपयोग करून विकासाची कामे पूर्ण करावी. प्रत्येक गावाला आरो मशीन बसवण्यासाठी प्राधान्याने नियोजन करावे. येत्या काही दिवसांमध्ये सोलरवर आधारित योजना कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंचांशी संवाद साधना दिली.