शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
4
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
5
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
6
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
7
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
8
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
9
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
10
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
11
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
12
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
14
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
15
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
16
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
17
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
18
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
19
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
20
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...

पाण्याची समस्या कायमची संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:50 IST

जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये १५ कोटींची पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर लवकरच कार्यान्वित होणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची संपणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शनिवारी ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी नागपूर येथील आयुक्त कार्यालयामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : १५ कोटी रूपयांच्या ३२ पाणीपुरवठा योजनांचे ई- भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये १५ कोटींची पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर लवकरच कार्यान्वित होणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची संपणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शनिवारी ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी नागपूर येथील आयुक्त कार्यालयामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे, अतिरिक्त मुख्य सचिव पाणीपुरवठा शामलाल गोयल उपस्थित होते. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यामध्ये ३२ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रकांत वाघमारे, कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर पिपरे, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभुषण पाझारे, पांढरकवडा येथील सरपंच रंजना डवरे, पंचायत समिती सदस्या सविता कोल्हे, उपसरपंच सुरज तोतडे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. चंद्रपूर तालुक्यातील पांढरकवडा ही ग्रामपंचायत १०० पाणीकर वसुली करणारी व स्मार्ट ग्रामपंचायत ठरल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरपंचाचे कौतुक केले. त्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांच्याशी संवाद साधला. जिल्ह्यांमध्ये ज्या गावांमध्ये अशुद्ध पाणी आहे.या गावांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवावा, असे निर्देश दिले. बैठकीला गदगावच्या सरपंच पुष्पा शंकर गायकवाड, पांझुर्णीचे सरपंच भारती काळे, कातलाबोडीच्या सरपंच सविता ढेंगळे, जेवराचे सरपंच सुवर्णा वासेकर, उसेगावच्या सरपंच वैशाली गेडाम, बेलगावचे सरपंच अंबादास पाल, निफंद्राच्या सरपंच ममता खंडारे, मांगलीचे सरपंच नानाजी मुंडरे, निमगावचे सरपंच रूपाली ठाकरे, कळमगावचे संतोष डांगे, बेलसनीचे मंजुषा वाढई, पुनागुडाचे सरपंच कौशल्या कुळसंगे, शेंबडेचे सरपंच विजूमाला जिवतोडे, चांदगावचे सरपंच विद्या नागपुरे, कळमनाचे सरपंच निलेश वाडी साखरीचे सरपंच राजू घरोटे, वरगावचे उपसरपंच शंकर मोहितकर, चांदगावच्या उपसरपंच मनीषा बनसोड, मंगलीचे उपसरपंच गोकुलदास पंढरीकार, गदगावचे उपसरपंच धनराज डवले आदींचा समावेश होता.खनिज निधीचा उपयोग कराजिल्ह्यामध्ये खनिज विकास निधीची उपलब्धता आहे. यामुळे निधीची उपयोग करून विकासाची कामे पूर्ण करावी. प्रत्येक गावाला आरो मशीन बसवण्यासाठी प्राधान्याने नियोजन करावे. येत्या काही दिवसांमध्ये सोलरवर आधारित योजना कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंचांशी संवाद साधना दिली.