शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

पाण्याची समस्या कायमची संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:50 IST

जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये १५ कोटींची पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर लवकरच कार्यान्वित होणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची संपणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शनिवारी ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी नागपूर येथील आयुक्त कार्यालयामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : १५ कोटी रूपयांच्या ३२ पाणीपुरवठा योजनांचे ई- भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये १५ कोटींची पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर लवकरच कार्यान्वित होणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची संपणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शनिवारी ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी नागपूर येथील आयुक्त कार्यालयामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे, अतिरिक्त मुख्य सचिव पाणीपुरवठा शामलाल गोयल उपस्थित होते. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यामध्ये ३२ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रकांत वाघमारे, कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर पिपरे, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभुषण पाझारे, पांढरकवडा येथील सरपंच रंजना डवरे, पंचायत समिती सदस्या सविता कोल्हे, उपसरपंच सुरज तोतडे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. चंद्रपूर तालुक्यातील पांढरकवडा ही ग्रामपंचायत १०० पाणीकर वसुली करणारी व स्मार्ट ग्रामपंचायत ठरल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरपंचाचे कौतुक केले. त्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांच्याशी संवाद साधला. जिल्ह्यांमध्ये ज्या गावांमध्ये अशुद्ध पाणी आहे.या गावांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवावा, असे निर्देश दिले. बैठकीला गदगावच्या सरपंच पुष्पा शंकर गायकवाड, पांझुर्णीचे सरपंच भारती काळे, कातलाबोडीच्या सरपंच सविता ढेंगळे, जेवराचे सरपंच सुवर्णा वासेकर, उसेगावच्या सरपंच वैशाली गेडाम, बेलगावचे सरपंच अंबादास पाल, निफंद्राच्या सरपंच ममता खंडारे, मांगलीचे सरपंच नानाजी मुंडरे, निमगावचे सरपंच रूपाली ठाकरे, कळमगावचे संतोष डांगे, बेलसनीचे मंजुषा वाढई, पुनागुडाचे सरपंच कौशल्या कुळसंगे, शेंबडेचे सरपंच विजूमाला जिवतोडे, चांदगावचे सरपंच विद्या नागपुरे, कळमनाचे सरपंच निलेश वाडी साखरीचे सरपंच राजू घरोटे, वरगावचे उपसरपंच शंकर मोहितकर, चांदगावच्या उपसरपंच मनीषा बनसोड, मंगलीचे उपसरपंच गोकुलदास पंढरीकार, गदगावचे उपसरपंच धनराज डवले आदींचा समावेश होता.खनिज निधीचा उपयोग कराजिल्ह्यामध्ये खनिज विकास निधीची उपलब्धता आहे. यामुळे निधीची उपयोग करून विकासाची कामे पूर्ण करावी. प्रत्येक गावाला आरो मशीन बसवण्यासाठी प्राधान्याने नियोजन करावे. येत्या काही दिवसांमध्ये सोलरवर आधारित योजना कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंचांशी संवाद साधना दिली.