शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

रेल्वेच्या भुयारी पुलाखाली पाणी येण्याचा प्रश्न मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:30 IST

भद्रावती : वेकोलिच्या कोळसा खाणीने वेढलेल्या भागात रेल्वेचा भुयारी मार्ग आहे. त्यातूनच पाण्याचा प्रवाह होत असल्यामुळे चिरादेवी, ढोरवासा, तेलवासा, ...

भद्रावती : वेकोलिच्या कोळसा खाणीने वेढलेल्या भागात रेल्वेचा भुयारी मार्ग आहे. त्यातूनच पाण्याचा प्रवाह होत असल्यामुळे चिरादेवी, ढोरवासा, तेलवासा, चारगाव, पिपरी, कोची, घोनाड यासह १२ गावांचा संपर्क तुटत असतो. अनेकदा दोन ते तीन दिवस गावाला जाणारा रस्ता बंद असल्यामुळे ग्रामस्थांच्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा लोकहितार्थ प्रश्न मार्गी लावण्यासाठी या भागातील आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गुरुवारी रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वासुदेव ठाकरे, सरपंच सुनील मोरे, सदस्य ज्योती मोरे यासह रेल्वे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. वर्धा नदीच्या तिरावर असलेले पिपरी गाव १९९४ रोजी आलेल्या महाकाय पुरामध्ये सापडले होते. आता जास्त पाऊस आल्यामुळे रेल्वेच्या भुयारी पुलाखाली पाणी साठून राहते. त्यामुळे येथील नागरिकांना रहदारीकरिता मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे गुरुवारी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मध्य रेल्वेचे सहाय्यक अभियंता नागदेवे यांच्याशी बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सूचना केल्या. या सूचना लवकर मार्गी काढून हा प्रश्न कायमचा सोडविण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.

290721\1428-img-20210729-wa0001.jpg

फोटो