शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आधारकार्ड अपडेटसाठी अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 22:12 IST

सामान्य माणसाचा अधिकार म्हणून ‘आधार कार्ड’ला ओळखले जाते. आधार कार्डवरील चुका दुरुस्तीसाठी आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. मात्र अपडेट करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तर अनेक केंद्रचालक आधार कार्डमधील त्रुट्या दूर करण्यासाठी मुंबई किंवा हैदराबादला जाण्याचा सल्ला देत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनागरिकात संभ्रम : त्रुट्या दुरुस्तीसाठी हैदराबाद, मुबंईकडे जाण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सामान्य माणसाचा अधिकार म्हणून ‘आधार कार्ड’ला ओळखले जाते. आधार कार्डवरील चुका दुरुस्तीसाठी आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. मात्र अपडेट करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तर अनेक केंद्रचालक आधार कार्डमधील त्रुट्या दूर करण्यासाठी मुंबई किंवा हैदराबादला जाण्याचा सल्ला देत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.आधार कार्डसाठी नोंदणी करताना नागरिकांनी नमूना अर्जात आवश्यक ती माहिती पूर्णपणे भरली. मात्र आधार कार्ड प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये अनेक दोष आढळून आले. सदोष कार्डामुळे नागरिकांना आता अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. इंग्रजी नावामधील चुकविलेले स्पेलिंग, बदलविलेली जन्म तारीख, मोबाईल नंबर अशा अनेक त्रुट्या आहेत. त्यामुळे विविध कामांसाठी संबंधित विभागाकडून आधार अपडेट करून घेण्यास सांगितले जात आहे. आधार अपडेटसाठी काही मोजकीच ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी केवळ अपडेची नोंदणी करून घेत एक पावती दिली जाते.दहा ते पंधरा दिवसांनी कार्ड घरी येईल किंवा आॅनलाईन काढून मिळेल, असे सांगितले जाते. यानुसार नागरिक कार्ड कढण्यासाठी जातात तेव्हा त्यांना अपडेट करण्यात काही त्रुट्या निघाल्याचे सांगण्यात येते. यासाठी मुंबई किंवा हैदराबाद येथे संपर्क करण्याचा सल्ला त्यांना देण्यात येतो. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी आहे.केंद्र संचालकांकडून लूटजिल्हात काही ठिकाणी आधार कार्ड काढण्याचे केंद्र आहेत. मात्र या केंद्रातून आधार कार्ड काढण्यासाठी एका व्यक्तीकडून १५० ते २०० रुपये आकारण्यात येत आहे. तर ग्रामीण भागातील नागरिकांना रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला आदी कामांसाठी आधारकार्ड अपडेटचे फर्मान संबंधित विभागांंकडून देण्यात आले आहे. मात्र नागरिक केंद्रावर कार्ड अपडेटसाठी गेल्यानंतर त्यांना अनेक त्रुट्या सांगून पैसे उकडतात. किंवा मुंबई जाण्याचा सल्ला दिला जातो.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड