शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते, नाल्या, क्रीडांगणाची समस्या कायम

By admin | Updated: November 8, 2014 22:35 IST

राजुरा-कोरपना रस्त्यावरील वनसडी गावामध्ये अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. स्थानिक प्रशासन तथा पदाधिकाऱ्यांनी गावातील समस्या सोडविण्याकडे कायम दुर्लक्ष केले आहे.

वनसडी : राजुरा-कोरपना रस्त्यावरील वनसडी गावामध्ये अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. स्थानिक प्रशासन तथा पदाधिकाऱ्यांनी गावातील समस्या सोडविण्याकडे कायम दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रस्ते, नाल्या, पथदिवे नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.निजामकाळापासूनच वैभव संपन्न गाव म्हणून ‘वनसडी’ची ओळख आहे. मात्र येथील समस्यांमध्ये गावातील गतवैभव आता धोक्यात आले आहे. आजघडीला मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गासाठी निधी मंजूर आहे. प्रत्यक्षात कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. गावात धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील नाल्या तुंबल्या आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहते आहे. बहुतांश ठिकाणी पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून रस्ता शोधावा लागतो. देशात स्वच्छ भारत अभियान चालू असले तरी येथे मात्र स्वच्छतेचे तिनतेरा वाजले आहे. येथील पिपर्डा मार्ग, वनवसाहत रस्ता, मुख्य मार्गावर अनेक नागरिक उघड्यावरच शौचास बसतात. त्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्घंधी पसरली आहे. गावात कुठेच सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने हागणदारी व मुतारीची समस्या आहे. पावसाळ्यात चिखलमय रस्ते व तुंबलेल्या गटारीमुळे समस्या अधिकच गंभीर होते. मात्र याकडे लक्ष देण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडे वेळ नसल्याचे चित्र आहे. राजुरा-कोरपना या महामार्गावर भरणारा बाजार स्थलांतरित करण्यात आला. परंतु बाजारासाठी ओटे अद्यापही तयार करण्यात आले नाही. यामुळे व्यावसायिकांना जमिनीवरच आपली दुकाने थाटावे लागते.येथील मटण मार्केटसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली. मात्र गावात कुठेच कचरापेट्या लावण्यात आल्या नसल्याने रस्त्यावरच संपूर्ण कचरा विखुरलेला असतो. गावातील अस्वच्छ वातावरणामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहे. येथील ग्राम पंचायत परिसरातही झुडपे वाढली आहे. बँक आॅफ इंडिया शाखा, एटीएम, वनविभाग कार्यालय, आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी, गोडावून, उपडाकघर, आयुर्वेदिक रुग्णालय, टेलिफोन एक्सचेंज, शाळा आदी महत्त्वाची कार्यालये येथे आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक येथे मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे येथे सुसज्ज बसस्थानक क्रीडांगण, महामार्गाचे सौंदर्यकरण, सार्वजनिक स्वच्छतागृह, सामाजिक सभागृह, वाचनालय, कृषी विद्यालय स्थापन करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.विश्रामगृहाची देखभाल व दुरुस्ती, गावातील अंतर्गत चौकाचे नामांतर व सुशोभीकरण करणेही गरजेचे आहे. गावातील बहुतांश नागरिकांचा शेती व्यवसाय आहे. सोबतच राजुरा-कोरपना या मार्गावर हे गाव असल्याने दळणवळणाच्या सोयी येथे उपलब्ध आहे. त्यामुळे शेती उत्पादनावर आधारित उद्योग येथे उभारल्यास बेरोजगारांच्या हाताला काम मिळू शकते. या समस्याकडे जातीने लक्ष देऊन स्थानिक प्रशासन व तालुका प्रशासनानी समस्या मार्गी लावावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस राकेश राठोड यांनी केली आहे. (वार्ताहर)