शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

१० हजार ८०० रिक्षाचालकांच्या ‘रोटी’चा प्रश्न मिटणार इतरांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:27 IST

कोरोना रूग्णवाढीचा उद्रेक झाल्याने राज्य सरकारने बुधवारपासून संचारबंदी लागू केली. जीवनावश्यक वस्तू व औषधांची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ...

कोरोना रूग्णवाढीचा उद्रेक झाल्याने राज्य सरकारने बुधवारपासून संचारबंदी लागू केली. जीवनावश्यक वस्तू व औषधांची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू आहे. परंतु, संचारबंदीमुळे रिक्षाचालकांना ग्राहक मिळणार नाही. त्यांच्या उदरनिर्वाहाच्या समस्या निर्माण होतील, यासाठी परवानाधारक रिक्षाचालकांना दीडहजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. या मदतीमुळे रिक्षाचालकांना थोडा दिलासा मिळतो. पण, हातावर पोट असणाऱ्या इतर असंघटितांचे काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. चंद्रपुरात केवळ ३ हजार ६०० परवानाधारक रिक्षाचालक आहेत. शेकडो रिक्षाचालक इतरांची रिक्षा भाड्याने चालवितात. त्यांना या मदतीचा लाभ मिळणार नाही.

कोट

संचारबंदीच्या काळात रिक्षाचालकांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. मात्र, दीडहजाराची रक्कम अतिशय अल्प आहे. कोरोनामुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय बुडाला. गतवर्षीपासून त्यांची परिस्थिती हलाखीची झाली. अशा स्थितीत दीडहजार रुपये किती दिवस पुरणार? या रक्कमेत वाढ करण्याची गरज आहे.

-राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना, चंद्रपूर

सरकारने दीडहजार रुपये देण्याचे जाहीर केले. ही रक्कम तातडीने दिली पाहिजे. व्यवसाय चालत नसल्याने कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा काळात मदत देण्याचा निर्णय चांगला आहे.

-प्रशांत गेडाम, रिक्षाचालक, बाबूपेठ चंद्रपूर

केवळ परवानाधारकांनाच मदत मिळणार आहे. त्यामुळे अनेक रिक्षाचालक मदतीपासून वंचित राहतील. ज्यांनी परवाना मिळविण्यासाठी कागदपत्रे सादर केली. त्यांनाही ओसीच्या आधारे दीडहजाराची मदत दिली पाहिजे.

-सुधाकर रिंंगणे, रिक्षाचालक तुकूम चंद्रपूर