शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कापूस दरवाढीने खासगी व्यापारी मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:25 IST

कापसाचे दर वाढेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. मध्यंतरी कापसाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल दरात कापसाची विक्री केली. मात्र आता कापसाचे दर पाच हजार आठशे रूपयांवर पोहचल्याने या कापूस दरवाढीचा सर्वाधिक लाभ खासगी व्यापाऱ्यांना होणार आहे. शेतकºयांच्या घरी आता कापूस शिल्लक नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

ठळक मुद्देकापूस विक्रीनंतर वाढले दर : शेतकऱ्यांना आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कापसाचे दर वाढेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. मध्यंतरी कापसाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल दरात कापसाची विक्री केली. मात्र आता कापसाचे दर पाच हजार आठशे रूपयांवर पोहचल्याने या कापूस दरवाढीचा सर्वाधिक लाभ खासगी व्यापाऱ्यांना होणार आहे. शेतकºयांच्या घरी आता कापूस शिल्लक नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात नगदी पीक म्हणून कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा, भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकवला जातो. कापूस पिकासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने कवडीमोल भावात कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडत नाही. शासनाने कापूस पिकांसाठी पाच हजार चारशे पन्नास रूपये हमीभाव जाहीर केला. परंतु सरकारी केंद्रावरील जाचक अटीने शेतकऱ्यांनी पणन महासंघाकडे कापूस विक्रीसाठी नेला नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनी मिळेल त्या कवडीमोल भावात शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केला.दरवर्षीपेक्षा यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असतानाच खुल्या बाजारपेठेत कापसाचे भाव गडगडले. काही शेतकऱ्यांनी नाईलाजाने कवडीमोल दरात कापूस विकून आपली आर्थिक गरज भागविली. कापसाचे दर वाढण्याचे कोणतेच संकेत नसल्याने शेतकºयांनी बँकाचे कर्ज भरण्यासाठी कापूस विकून टाकला. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावर्षी कापूस पिकावर केलेला खर्चही भरून निघाला नसल्याने शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला आहे.कापसाचे दर आता ४०० ते ५०० रूपयांनी वाढल्याने त्याचा सर्वाधिक फायदा खासगी व्यापाऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांच्या घरी कापूस होता, त्यावेळेस भाव वाढले नाही. आता कापूस संपल्यावर कापसाचे दर वाढले आहे. त्यामुळे कापूस दरवाढीचा सर्वाधिक फायदा खासगी व्यापाºयांना झाला आहे. यात मात्र नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे.कापूस दरवाढ कुणासाठी?शेतकरी आपल्या गरजेपोटी कवडीमोल दरात कापूस विकत असतो. यावर्षी कापसाची दरवाढ होईल, या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला होता. परंतु मार्च एन्डींगमध्ये कर्जाचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांनी कापूस विकून टाकला. आता कापसाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे.