शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

खासगी बाजारपेठेत दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:26 IST

कापसाचे खासगी बाजारपेठेत वाढलेले भाव अचानक घसरल्याने त्याचा सर्वाधिक फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. कापसावर मोठ्या प्रमाणात खर्च केल्याने कापसाचे दर कमी झाल्याने उत्पादनासाठी केलेला खर्च भरून निघणार की नाही, याची चिंता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगलीच सताऊ लागली आहे.

ठळक मुद्देकापूस उत्पादकांना आर्थिक फटका : कसा निघेल खर्च भरून ?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कापसाचे खासगी बाजारपेठेत वाढलेले भाव अचानक घसरल्याने त्याचा सर्वाधिक फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. कापसावर मोठ्या प्रमाणात खर्च केल्याने कापसाचे दर कमी झाल्याने उत्पादनासाठी केलेला खर्च भरून निघणार की नाही, याची चिंता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगलीच सताऊ लागली आहे.विदर्भ प्रांत कापूस उत्पादनात पूर्वीपासूनच अग्रेसर आहे. येथील काळ्या कसदार मातीत बळीराजा पांढरे सोने पिकवितो. खरे तर चंद्रपूर जिल्हा कापूस पिकविण्यात आजपर्यंत पुढे राहिला आहे. यंदा सुरूवातीपासूनच कापसाला बऱ्यापैकी भाव होता. जवळपास सहा हजारांपर्यंत कापसाचे दर गेल्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या घरी सुबत्ता येईल, असे वाटत होते. मात्र खासगी बाजारपेठेत कापसाचे दर ४०० ते ५०० रूपयांनी कमी झाले. सध्या पाच हजार ५०० रूपयांनी खासगी बाजारपेठेत कापूस विकला जात आहे. कापसाची आवक वाढल्याने खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाडल्याचे बोलले जात आहे. यावर्षी निसर्गानेही शेतकऱ्यांना साथ दिली नाही. त्यामुळे कापसासह अन्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च केला. परंतु यावर्षी कापसाने शेतकºयांचे घर अजूनही भरले नाही.जिथे २० क्विंटल कापूस व्हायला पाहिजे, त्या शेतात उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही भरून निघणे कठीण आहे. कापूस चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांचे नगदी पीक आहे. गोवरी, पोवनी, वरोडा, साखरी, चार्ली, निर्ली, धिडशी, पेल्लोरा, चिंचोली, निंबाळा परिसरातील कपाशीची शेती वाळायला लागली आहे. खासगी बाजारपेठेत कापसाचे दर ५०० रूपयांनी खाली आल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.कापूस उत्पादकांच्या पदरी निराशाचकापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक असल्याने शेतकरी दिवस रात्र शेतात काबाडकष्ट करतो. परंतु यावर्षी अपुऱ्या पावसामुळे निसर्गानेही शेतकऱ्यांना दगा दिला आहे. नापिकीने शेतकऱ्यांना घेतलेले कर्जही फेडणे मुश्किल झाले आहे. शेतकºयांना घामाचे दाम मिळत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे.यंदा कापूस पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी अतोनात खर्च केला. परंतु त्यानंतरही उत्पादनात घट झाल्याने यावर्षी कापसाची शेती शेतकऱ्यांना परवडण्यासारखी राहिली नाही. त्यात खासगी बाजारपेठेत कापसाचे दर घसरल्याने आम्ही चिंतातूर झाला आहे.- गणपत लांडे, शेतकरी.

टॅग्स :cottonकापूस