शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सिंचन प्रकल्पांच्या पृूर्णत्वाला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2017 01:57 IST

शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या दृष्टीने सिंचन प्रकल्पांशी संबंधित अडचणी दूर करत प्रकल्प पूर्ण करण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे

सुधीर मुनगंटीवार : मौलझरी तलावाच्या पुनरुज्जीवन मोहिमेला सुरुवात चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या दृष्टीने सिंचन प्रकल्पांशी संबंधित अडचणी दूर करत प्रकल्प पूर्ण करण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्रात पडलेल्या १९७२ च्या दुष्काळ काळात सुरु झालेल्या मौलझरी तलावाच्या अस्तित्वाला ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पुर्नजीवन देण्याचा प्रयत्न केला आहे. भुगर्भ तज्ञ्जांच्या सल्यानुसार या ठिकाणी पाणी साठवण केली जाणार असून मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. २७ मार्च रोजी या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मौलझरी तलाव धरणाच्या दुरूस्ती कामाचे भूमीपुजन पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, पंचायत समिती सभापती वंदना पिंपळशेंडे, उपसभापती चंद्रकांत धोडरे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता आर.आर.सोनोने आदी उपस्थित होते. मौलझरी तलावाच्या ठिकाणी भूमिपुजनाचा हा कार्यक्रम पार पडला. नागाळा येथे भूमिपुजन समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांचे नुतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. मौलझरी या तलावाखाली चंद्रपूर तालुक्यातील नागाळा, महादवाडी व गोंडसावरी या ३ गावांचे ३९८ हेक्टर सिंचनक्षेत्र असून या गावांना सिंचनाकरिता हा तलाव बांधण्यात आलेला आहे. तथापि या तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाळीमधून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाझरामुळे तलावाव्दारे वरील गावांना आजपर्यंत सिंचन करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे या तीनही गावांचे मिळून जवळपास ५५० लाभधारक सिंचनापासून वंचीत आहेत. दरम्यान जलसंपदा विभागाचे सचिव यांनीही ना. मुनगंटीवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या तलावास भेट दिली. त्यानंतर भुगर्भ वैज्ञानिक नागपूर यांनी पायव्यामध्ये कर्टन ग्राऊंटींगची उपाययोजना सुचविली. यासंदर्भात एक कोटी ५७ लाख ३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून सोमवारी त्याचे भूमीपुजन करण्यात आले. हा प्रयोग यशस्वी झाल्यास ४७८ हेक्टर सिंचन क्षमता पुनरुज्जीवीत होईल व हे संपूर्ण क्षेत्र धानपिकाचे असल्याने कृषीमुल्याचे स्वरुपात राष्ट्रीय उत्पन्नातही वाढ होईल. तसेच मत्स्योत्पादनातूनही शासनास लाखो रूपयांचा महसूल मिळणार असल्याची माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी) नळ जोडणीमार्फत होणार सिंचन मूल तालुक्यातील चिचाळा व नजिकच्या सहा गावांना असोलामेंढा तलावाच्या मुख्य कालव्यातून नळ जोडणी मार्फत सिंचन सुविधा पुरविण्यासाठी चांदा ते बांदा या विशेष कार्यक्रमांतर्गत २३.५० कोटी रू. निधी मंजूर करण्यात आले असून नलेश्वर सिंचन प्रकल्पाच्या मुख्य कालव्याच्या दुरूस्तीच्या कामाचे ९०६ लाख ४४ हजार रूपये किमतीचा अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.