शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
3
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
4
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
5
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
6
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
7
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
8
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
9
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
10
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!
11
हृदयद्रावक! एका पायलटच्या लग्नासाठी कुटुंबीय शोधत होते मुलगी तर दुसऱ्याला १ महिन्याचा मुलगा
12
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
13
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
14
Life Lesson: तुम्हाला अतिविचार करण्याची सवय आहे? मग 'हा' गुरुमंत्र येईल कामी!
15
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
16
आयपीएलमध्ये तिकीट घोटाळा, सीआयडीची मोठी कारवाई, हैदराबाद क्रिकेट संघटेनेच्या अध्यक्षांना अटक   
17
'पालिका प्लॅन' ON ! सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
18
दे दणादण! काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; माजी आमदार जखमी
19
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
20
Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला सायंकाळी 'हा' उपाय करा; अडलेली कामे मार्गी लागतील!

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सिंचन प्रकल्पांच्या पृूर्णत्वाला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2017 01:57 IST

शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या दृष्टीने सिंचन प्रकल्पांशी संबंधित अडचणी दूर करत प्रकल्प पूर्ण करण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे

सुधीर मुनगंटीवार : मौलझरी तलावाच्या पुनरुज्जीवन मोहिमेला सुरुवात चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या दृष्टीने सिंचन प्रकल्पांशी संबंधित अडचणी दूर करत प्रकल्प पूर्ण करण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्रात पडलेल्या १९७२ च्या दुष्काळ काळात सुरु झालेल्या मौलझरी तलावाच्या अस्तित्वाला ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पुर्नजीवन देण्याचा प्रयत्न केला आहे. भुगर्भ तज्ञ्जांच्या सल्यानुसार या ठिकाणी पाणी साठवण केली जाणार असून मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. २७ मार्च रोजी या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मौलझरी तलाव धरणाच्या दुरूस्ती कामाचे भूमीपुजन पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, पंचायत समिती सभापती वंदना पिंपळशेंडे, उपसभापती चंद्रकांत धोडरे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता आर.आर.सोनोने आदी उपस्थित होते. मौलझरी तलावाच्या ठिकाणी भूमिपुजनाचा हा कार्यक्रम पार पडला. नागाळा येथे भूमिपुजन समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांचे नुतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. मौलझरी या तलावाखाली चंद्रपूर तालुक्यातील नागाळा, महादवाडी व गोंडसावरी या ३ गावांचे ३९८ हेक्टर सिंचनक्षेत्र असून या गावांना सिंचनाकरिता हा तलाव बांधण्यात आलेला आहे. तथापि या तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाळीमधून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाझरामुळे तलावाव्दारे वरील गावांना आजपर्यंत सिंचन करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे या तीनही गावांचे मिळून जवळपास ५५० लाभधारक सिंचनापासून वंचीत आहेत. दरम्यान जलसंपदा विभागाचे सचिव यांनीही ना. मुनगंटीवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या तलावास भेट दिली. त्यानंतर भुगर्भ वैज्ञानिक नागपूर यांनी पायव्यामध्ये कर्टन ग्राऊंटींगची उपाययोजना सुचविली. यासंदर्भात एक कोटी ५७ लाख ३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून सोमवारी त्याचे भूमीपुजन करण्यात आले. हा प्रयोग यशस्वी झाल्यास ४७८ हेक्टर सिंचन क्षमता पुनरुज्जीवीत होईल व हे संपूर्ण क्षेत्र धानपिकाचे असल्याने कृषीमुल्याचे स्वरुपात राष्ट्रीय उत्पन्नातही वाढ होईल. तसेच मत्स्योत्पादनातूनही शासनास लाखो रूपयांचा महसूल मिळणार असल्याची माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी) नळ जोडणीमार्फत होणार सिंचन मूल तालुक्यातील चिचाळा व नजिकच्या सहा गावांना असोलामेंढा तलावाच्या मुख्य कालव्यातून नळ जोडणी मार्फत सिंचन सुविधा पुरविण्यासाठी चांदा ते बांदा या विशेष कार्यक्रमांतर्गत २३.५० कोटी रू. निधी मंजूर करण्यात आले असून नलेश्वर सिंचन प्रकल्पाच्या मुख्य कालव्याच्या दुरूस्तीच्या कामाचे ९०६ लाख ४४ हजार रूपये किमतीचा अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.