शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
3
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
4
सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
5
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
6
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
7
Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!
8
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
9
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
10
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!
11
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
12
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
13
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
14
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
15
'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
16
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
17
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
18
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
19
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
20
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सिंचन प्रकल्पांच्या पृूर्णत्वाला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2017 01:57 IST

शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या दृष्टीने सिंचन प्रकल्पांशी संबंधित अडचणी दूर करत प्रकल्प पूर्ण करण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे

सुधीर मुनगंटीवार : मौलझरी तलावाच्या पुनरुज्जीवन मोहिमेला सुरुवात चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या दृष्टीने सिंचन प्रकल्पांशी संबंधित अडचणी दूर करत प्रकल्प पूर्ण करण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्रात पडलेल्या १९७२ च्या दुष्काळ काळात सुरु झालेल्या मौलझरी तलावाच्या अस्तित्वाला ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पुर्नजीवन देण्याचा प्रयत्न केला आहे. भुगर्भ तज्ञ्जांच्या सल्यानुसार या ठिकाणी पाणी साठवण केली जाणार असून मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. २७ मार्च रोजी या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मौलझरी तलाव धरणाच्या दुरूस्ती कामाचे भूमीपुजन पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, पंचायत समिती सभापती वंदना पिंपळशेंडे, उपसभापती चंद्रकांत धोडरे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता आर.आर.सोनोने आदी उपस्थित होते. मौलझरी तलावाच्या ठिकाणी भूमिपुजनाचा हा कार्यक्रम पार पडला. नागाळा येथे भूमिपुजन समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांचे नुतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. मौलझरी या तलावाखाली चंद्रपूर तालुक्यातील नागाळा, महादवाडी व गोंडसावरी या ३ गावांचे ३९८ हेक्टर सिंचनक्षेत्र असून या गावांना सिंचनाकरिता हा तलाव बांधण्यात आलेला आहे. तथापि या तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाळीमधून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाझरामुळे तलावाव्दारे वरील गावांना आजपर्यंत सिंचन करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे या तीनही गावांचे मिळून जवळपास ५५० लाभधारक सिंचनापासून वंचीत आहेत. दरम्यान जलसंपदा विभागाचे सचिव यांनीही ना. मुनगंटीवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या तलावास भेट दिली. त्यानंतर भुगर्भ वैज्ञानिक नागपूर यांनी पायव्यामध्ये कर्टन ग्राऊंटींगची उपाययोजना सुचविली. यासंदर्भात एक कोटी ५७ लाख ३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून सोमवारी त्याचे भूमीपुजन करण्यात आले. हा प्रयोग यशस्वी झाल्यास ४७८ हेक्टर सिंचन क्षमता पुनरुज्जीवीत होईल व हे संपूर्ण क्षेत्र धानपिकाचे असल्याने कृषीमुल्याचे स्वरुपात राष्ट्रीय उत्पन्नातही वाढ होईल. तसेच मत्स्योत्पादनातूनही शासनास लाखो रूपयांचा महसूल मिळणार असल्याची माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी) नळ जोडणीमार्फत होणार सिंचन मूल तालुक्यातील चिचाळा व नजिकच्या सहा गावांना असोलामेंढा तलावाच्या मुख्य कालव्यातून नळ जोडणी मार्फत सिंचन सुविधा पुरविण्यासाठी चांदा ते बांदा या विशेष कार्यक्रमांतर्गत २३.५० कोटी रू. निधी मंजूर करण्यात आले असून नलेश्वर सिंचन प्रकल्पाच्या मुख्य कालव्याच्या दुरूस्तीच्या कामाचे ९०६ लाख ४४ हजार रूपये किमतीचा अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.