शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

प्रधानमंत्री पीक विमा योजना तारणार

By admin | Updated: July 15, 2016 01:12 IST

एकेकाळी देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती व्यवसायाला नैसर्गीक आपत्तीमुळे उतरती कळा आली आहे.

शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : निसर्गाची सुटता साथ, पीक विमा देईल हात राजकुमार चुनारकर चिमूर एकेकाळी देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती व्यवसायाला नैसर्गीक आपत्तीमुळे उतरती कळा आली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत जावून आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. शेतकऱ्यांवर ओढवणाऱ्या नैसर्गीक संकटातून बाहेर काढण्यासाठी व काही प्रमाणात आर्थिक मदत व्हावी, यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. हिच विमा योजना शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटातून तारणार आहे. शेती व्यवसाय पुर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. मात्र मानवाचे निसर्गापुढे काही एक चालत नाही. त्यामुळे निसर्गाच्या अनियमित, लहरीपणामुळे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात तोट्यात चालला आहे. त्यामुळे शेतकरी सदा कर्जात खितपत चालला आहे. या कर्जाच्या बोजातून निघता आले नाही तर अनेक शेतकरी आपली जीवनयात्रा संपवत आहेत. मात्र नैसर्गीक संकटातून होणाऱ्या शेतकऱ्याच्या नुकसानीला काही प्रमाणात आर्थिक बळ मिळावे म्हणून शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलात आणली आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यासाठी निसर्गाचा सुटता साथ, पीक विमा देईल हात, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यापुढे आली आहे. शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायाला कर्जातून बाहेर काढण्यासाठी कुणीच धजावत नाही त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनास शेतकऱ्यांना नैसर्गीक संकटातून तारणार आहे. (प्रतिनिधी) योजनेची वैशिष्ट्ये नैसर्गीक आपत्ती, कीड, अळी रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण. पिकाच्या नुकसानीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक. खातेदार व्यतीरिक्त भाडेपट्टीने व कुळाने शेती करणारे शेतकरीही योजनेस पात्र. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बीसाठी दिड टक्के व नगदी पिकासाठी ५ टक्के अमर्यादीत आहे. योजने अंतर्गत सर्व पिकासाठी जोखीमस्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. योजनेच्या लाभासाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व बँकेचे प्रतिनिधी मदत करणार आहेत. या पीक विमा योजनेचे विमा हप्ता जुलै महिन्याच्या ३१ तारखेपर्यंत भरता येणार आहे.