शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

प्रधानमंत्र्यांचा चलनबंदी निर्णय राष्ट्र विकासासाठी आवश्यक

By admin | Updated: November 19, 2016 00:57 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला ५०० व १००० नोटा चलनातून बंद करून देशात निर्माण होणाऱ्या...

हंसराज अहीर यांचे आवाहन : अफवांवर विश्वास ठेवू नये चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला ५०० व १००० नोटा चलनातून बंद करून देशात निर्माण होणाऱ्या काळ्या पैशावर घाळा घालण्याचे पाऊल उचलले आहे. यामुळे दहशतवादी व नक्षलवाद्यांसह अतिरेकी कारवाई संलग्न असणाऱ्यांना आता काळ्या पैशाविना मोठ्या प्रमाणात आडकाठी निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे भविष्यात अर्थव्यवस्थेला उभारी येण्यासोबत विकासासाठी मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. जनतेने विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून चलनबंदीच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्यावा, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे.या संदर्भात बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी सांगितले की, देशात चलनबंदीचा निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध बँकात कर्मचारी व अधिकाऱ्यांनी अतिरिक्त कार्य करून ग्राहकांना उचित सेवा उपलब्ध दिली. त्यामुळे केंद्र सरकारच्या चलनबंदीचा निर्णय राबविण्यात मदत झाली आहे. याआधी जनधन योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी असेच स्पृहनिय कार्य केले असल्याने पुढेही असेच पुढे येवून राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पंतप्रधान यांच्या चलनबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा मोठ्या प्रमाणात नष्ट होणार असून याचा फायदा सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात होणार आहे. जनतेने बँकेच्या माध्यमाने चलनबदलासाठी होत असलेला थोडा त्रास सहन केला तर पुढे भविष्यातील पिढीला विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी ध्येर्य राखत आपले व्यवहार करण्याचे आणि विरोधकांच्या अफवांवर विश्वास न ठेवता निर्णयाचे समर्थन करण्याचे आवाहन केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)