कामाचा मोबदला नाही : कंत्राटदारांचा आंदोलनाचा इशाराचंद्रपूर : पंतप्रधान ग्रामसडक योजनेसाठी निधी देण्यात न आल्याने या योजनेवरच भविष्यात संकट ओढविण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे केलेल्या कामाचे पैसे न मिळाल्याने संबंधित कंत्राटदार संतापले आहेत. राज्यातील संबंधित विभागाच्या मंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत या मुद्यावर चर्चा करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने येत्या ११ आॅगस्टला दिल्ली येथे जंतर-मंतरवर आंदोलन करणार असल्याची माहिती कंत्राटदारांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. शासनाने करोडो रुपयांच्या वर्क आॅर्डर देऊन कंत्राटदारांकडून अर्ध्यापेक्षा अधिक काम करून घेतले. आता कामाचे पैसे देण्यासाठी चालढकल केली जात असल्याने कंत्राटदारांना नाईलाजाने काम बंद करावे लागत असल्याचे कंत्राटदारांनी सांगितले.कंत्राटदार नितीन पुगलिया म्हणाले, राज्य सरकारसोबत आम्ही चर्चा केली. त्यावेळी देशात एकूण ५७ हजारो कोटी रुपयांची कामे सुरू आहे. मात्र केंद्र सरकारकडून या योजनेसाठी केवळ १४ हजार करोड रुपये दण्यात आले. त्यामुळे भाजपा सरकारच्या काळात सुरू झालेली ही योजना पुन्हा भाजपा सरकारच्या काळातच बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात झालेल्या कामाची १ हजार ५०० कोटी रुपयांची देयके आहेत, अशी माहिती पुगलिया यांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यात ११६ करोड रुपयांच्या वर्क आॅर्डर देण्यात आल्या. कंत्राटदारांकडून अर्धेअधिक काम करून घेतल्यानंतरही पैसे देण्यात आले नाही. जिल्ह्यात झालेल्या कामाचे कंत्राटदारांचे २४ करोड रुपयांपेक्षा अधिक पैसे कंत्राटदारांना देणे आहे. (प्रतिनिधी)
पंतप्रधान ग्राम सडक योजना संकटात
By admin | Updated: August 9, 2015 01:15 IST