शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

इको-प्रोच्या स्वच्छतेचा ‘मन की बात’ मध्ये गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:31 IST

शहरात पर्यावरण व वन्यजीव तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया इकॉलाजीकल प्रोटेक्शन आॅर्गनायझेशन (इको-प्रो) संस्थेतर्फे सुरू असलेल्या चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानास आज २२९ दिवस पूर्ण झाले.

ठळक मुद्देअभियनास २२९ दिवस पूर्ण : १ मार्च २०१७ ला सुरू झाले अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात पर्यावरण व वन्यजीव तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया इकॉलाजीकल प्रोटेक्शन आॅर्गनायझेशन (इको-प्रो) संस्थेतर्फे सुरू असलेल्या चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानास आज २२९ दिवस पूर्ण झाले. या स्वच्छता अभियानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात उल्लेख करीत कामाचा गौरव केला. ही बाब चंद्रपूर शहरासाठी तसेच इको-प्रो संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे.किल्ला स्वच्छता अभियान ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत जिल्हातील ऐतीहासीक वारसा संवर्धनाचा उद्देश समोर ठेवून सुरू करण्यात आलेला आहे. जे आजही नियमीतपणे अविरत सुरू आहे. स्वच्छताच नाही तर आपला ऐतिहासिक वारसा जतन केला जावा याकरिता सुध्दा या अभियानाचे महत्व असून अशाप्रकारे सर्व ठिकाणी स्वच्छतेसंदर्भात कार्य केले गेले पाहीजे, असा उल्लेख सुध्दा केला. इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या या अभियानाचे सामूहिकता आणि सातत्यता याचाही उल्लेख केला आहे.सदर किल्ला स्वच्छता अभियान १ मार्च २०१७ पासून नियमीतपणे रोज सकाळी ६ ते १० या वेळेत इको-प्रो संस्थेचे कार्यकर्ते श्रमदान करीत आहे. आज या अभियानाचा २२९ वा दिवस असून आजही सदर अभियान सुरू आहे. या अभीयानात चंद्रपूर शहरात गोलाकार बांधण्यात आलेल्या गोंडकालीन ५५० वर्ष जुना किल्ला परकोट ११ किमीचा परिसर स्वच्छ केला जात आहे. ११ किमी किल्लाच्या भितींपैकी जवळपास ७ किमी लांबीची भिंत स्वच्छ करण्यात आलेली आहे. एकुण ३९ कुण बुरूज पैकी २५ बुरूज स्वच्छ करण्यात आलेले असून ४ मुख्य दरवाजे, ५ खिडक्या पैकी ४ खिडक्या स्वच्छ करण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर यांनी २९ सप्टेंबर रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रम अंतर्गत चंद्रपूर किल्लावर स्वच्छता अभियानात स्व:ता श्रमदान करीत सहभागी झाले होते. त्यांनी या अभियानाची माहिती पंतप्रधान कार्यालयास एका पत्राव्दारे कळविली होती. तसेच पुरातत्व खात्याचे केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांची इको-प्रो च्या शिष्टमंडळानी भेट घेऊन माहिती दिली होती.खुद्द पंतप्रधानांनी दखल घेतल्यामुळे अभियानातील सहभागी सर्व सदस्याचे मनोबल उंचवले आहेत. ‘मन की बात’ मध्ये इको-प्रोच्या कार्याची दखल म्हणजे संस्थेस मिळालेला पुरस्कार आणि सन्मान आहे. यामुळे संस्थेचे काम अधिक जोमाने पुढे नेण्यास आणखी बळ मिळाले आहे.- बंडू धोतरेइको-प्रो संस्थेचे अध्यक्ष