शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
3
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
4
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
5
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
6
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
7
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
8
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
9
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
10
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
11
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
12
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
13
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
14
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
15
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
16
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
17
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
18
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
19
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

इको-प्रोच्या स्वच्छतेचा ‘मन की बात’ मध्ये गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:31 IST

शहरात पर्यावरण व वन्यजीव तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया इकॉलाजीकल प्रोटेक्शन आॅर्गनायझेशन (इको-प्रो) संस्थेतर्फे सुरू असलेल्या चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानास आज २२९ दिवस पूर्ण झाले.

ठळक मुद्देअभियनास २२९ दिवस पूर्ण : १ मार्च २०१७ ला सुरू झाले अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात पर्यावरण व वन्यजीव तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया इकॉलाजीकल प्रोटेक्शन आॅर्गनायझेशन (इको-प्रो) संस्थेतर्फे सुरू असलेल्या चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानास आज २२९ दिवस पूर्ण झाले. या स्वच्छता अभियानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात उल्लेख करीत कामाचा गौरव केला. ही बाब चंद्रपूर शहरासाठी तसेच इको-प्रो संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे.किल्ला स्वच्छता अभियान ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत जिल्हातील ऐतीहासीक वारसा संवर्धनाचा उद्देश समोर ठेवून सुरू करण्यात आलेला आहे. जे आजही नियमीतपणे अविरत सुरू आहे. स्वच्छताच नाही तर आपला ऐतिहासिक वारसा जतन केला जावा याकरिता सुध्दा या अभियानाचे महत्व असून अशाप्रकारे सर्व ठिकाणी स्वच्छतेसंदर्भात कार्य केले गेले पाहीजे, असा उल्लेख सुध्दा केला. इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या या अभियानाचे सामूहिकता आणि सातत्यता याचाही उल्लेख केला आहे.सदर किल्ला स्वच्छता अभियान १ मार्च २०१७ पासून नियमीतपणे रोज सकाळी ६ ते १० या वेळेत इको-प्रो संस्थेचे कार्यकर्ते श्रमदान करीत आहे. आज या अभियानाचा २२९ वा दिवस असून आजही सदर अभियान सुरू आहे. या अभीयानात चंद्रपूर शहरात गोलाकार बांधण्यात आलेल्या गोंडकालीन ५५० वर्ष जुना किल्ला परकोट ११ किमीचा परिसर स्वच्छ केला जात आहे. ११ किमी किल्लाच्या भितींपैकी जवळपास ७ किमी लांबीची भिंत स्वच्छ करण्यात आलेली आहे. एकुण ३९ कुण बुरूज पैकी २५ बुरूज स्वच्छ करण्यात आलेले असून ४ मुख्य दरवाजे, ५ खिडक्या पैकी ४ खिडक्या स्वच्छ करण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर यांनी २९ सप्टेंबर रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रम अंतर्गत चंद्रपूर किल्लावर स्वच्छता अभियानात स्व:ता श्रमदान करीत सहभागी झाले होते. त्यांनी या अभियानाची माहिती पंतप्रधान कार्यालयास एका पत्राव्दारे कळविली होती. तसेच पुरातत्व खात्याचे केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांची इको-प्रो च्या शिष्टमंडळानी भेट घेऊन माहिती दिली होती.खुद्द पंतप्रधानांनी दखल घेतल्यामुळे अभियानातील सहभागी सर्व सदस्याचे मनोबल उंचवले आहेत. ‘मन की बात’ मध्ये इको-प्रोच्या कार्याची दखल म्हणजे संस्थेस मिळालेला पुरस्कार आणि सन्मान आहे. यामुळे संस्थेचे काम अधिक जोमाने पुढे नेण्यास आणखी बळ मिळाले आहे.- बंडू धोतरेइको-प्रो संस्थेचे अध्यक्ष