शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

जीवनावश्यक वस्तूंचे दर भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:32 IST

अनवर खान पाटण : सध्या सर्वच प्रकारच्या किराणा साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. भाजीपाल्यासह जवळजवळ सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती ...

अनवर खान

पाटण : सध्या सर्वच प्रकारच्या किराणा साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. भाजीपाल्यासह जवळजवळ सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे. कुटुंबाचा मासिक खर्च वाढल्याने कुटुंब प्रमुखाची संसाराचा गाडा हाकताना दमछाक होत आहे.

घरगुती सिलिंडर व पेट्रोल, डिझेलच्या दरात तर उच्चांकी वाढ झाली आहे. असे असताना शासकीय पातळीवर महागाई कमी करण्यासंदर्भात काहीच उपाययोजना होताना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांपासून सर्वच प्रकारच्या धान्यासह शेंगदाणे, साखर, साबुदाणा, डाळ, तांदूळ, गहू व इतर खाद्यपदार्थाचे भाव वाढले आहे. खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत. प्रत्येक महिन्यात हे दर आणखी वाढतच जात आहे. जिवती तालुक्यातील अनेक जण शेतीवर अवलंबून आहेत. शेतकरी दिवसभर शेतात मेहनत करतो. मात्र पीक निघेपर्यंत त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अस्मानी संकट, विविध रोग यामुळे उत्पादन कमी होते. पीक निघाल्यानंतर त्याला भावही कमी मिळतो. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना शेतकऱ्यांना अक्षरश: रडू कोसळते. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांनी जगावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बॉक्स

पुन्हा स्वयंपाक चुलीवर

काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली. आता तर घरगुती सिलिंडर हजार रुपयांच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चुलीच स्वयंपाकगृहात आल्या आहेत. अनेक ठिकाणी चुलीवर स्वयंपाक केला जात आहे.