शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

अध्यक्षांचे प्रवास भत्ता देयक अर्थ समितीने फेटाळले

By admin | Updated: May 29, 2016 00:58 IST

जिल्हा परिषद अध्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेतील मुख्य पदाधिकारी असले तरी स्वत:च्या प्रवास भत्याचे देयक अर्थ समितीकडून नामंजूर झालेले पाहण्याची पाळी

२०१४ पासून प्रलंबित : दौऱ्याचे विवरणच नव्हतेचंद्रपूर : जिल्हा परिषद अध्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेतील मुख्य पदाधिकारी असले तरी स्वत:च्या प्रवास भत्याचे देयक अर्थ समितीकडून नामंजूर झालेले पाहण्याची पाळी शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांच्यावर आली.जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांचे आॅक्टोबर २०१४ पासूनचे प्रवास देयक जिल्हा परिषदेकडे प्रलंबित आहेत. २६ हजार २४९ रूपयांच्या या देयकांमध्ये अलिकडच्या जानेवारी २०१६ नंतरच्या देयकांचाही समावेश आहे.जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीेची मासिक सभा शुक्रवारी घेण्यात आली होती. या सभेमध्ये पहिला विषय मागील सभेचे कार्यवृत्त वाचून मंजूर करणे हा होता तर, दुसराच विषय अध्यक्षांच्या तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीतील प्रवास भत्ता देयकांना मंजुरी देण्याचा होता. यामुळे केवळ अध्यक्षांच्या देयकाला मंजुरी देण्यासाठी ही सभा असल्याचा नाराजीचा सूर उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला. हा विषय चर्चेला आता असता सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला. देयकांसंदर्भात कसलेही विवरण सादर न करता केवळ दौऱ्याची यादी समितीच्या बैठकीपुढे मांडण्यात आली. दौऱ्याच्या विवरणासंदर्भात विचारणा केली असता संबंधित लिपिक रजेवर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विवरण सादर करण्यात असमर्थता दर्शविण्यात आली.ही देयके तीन महिन्यांवरील असल्याने समितीने मंजुरी द्यावी, असे ठरावात म्हटले होते. प्रत्यक्षात यात जानेवारी-२०१६ पासूनचीही देयके होती. काही देयके तीन महिन्यांच्या आतील असल्याने हा ठरावच बैठकीत फेटाळण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी) १३ व्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी वळला वेतनावर जिल्हा परिषदेसाठी मिळालेला १३ व्या वित्त आयोगाचा निधी वेळेत खर्च न झाल्याने तो महाआॅनलाईन मधील डाटा एंट्री आॅपरेटरच्या मानधनावर वळविण्यात आला. याबद्दल सदस्यांनी बैठकीत खेद व्यक्त केला. जिल्हा परिषद अध्यक्षांना २०१४-१५ या वर्षासाठीच अधिकार मिळाले होते. मात्र अधिकारात नसतानाही त्यांनी मुख्य लेखा वित्त अधिकाऱ्यांना पत्र देवून निधीचा विनियोग कसा करावा, यासंदर्भात पत्र दिल्याची बाब यावेळी उघडकीस आली. प्रत्यक्षात २८ एप्रिल रोजी झालेल्या वित्त समितीच्या सभेमध्ये यावर चर्चा झाली होती. ३० एप्रिलपर्यंत तो खर्च करण्याची मुदत असल्याने उपयोजना करून निधी १०० टक्के खर्च करण्याचे ठरले होते. या काळानंतरही निधी खर्च न झाल्याने अखेर तो महाआॅनलाईनच्या वेतनासाठी वळविण्यात आला. यावर जि.प. सदस्य विनोद अहिरकर यांनी आक्षेप घेतला.