शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

वनऔषधी उपलब्धतेचा जिल्हा नकाशा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 22:38 IST

जिल्ह्यातील समृद्ध जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात वनऔषधी असल्याने पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेने वनऔषधी उपलब्धतेचा जिल्हा नकाशा तयार केला. यामध्ये सुमारे दीडशेपेक्षा अधिक वनस्पतींची नोंद घेतली आहे.

ठळक मुद्देआघारकर संशोधन संस्थेचा पुढाकार : १५० दुर्मिळ वनऔषधींची नोंद

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील समृद्ध जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात वनऔषधी असल्याने पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेने वनऔषधी उपलब्धतेचा जिल्हा नकाशा तयार केला. यामध्ये सुमारे दीडशेपेक्षा अधिक वनस्पतींची नोंद घेतली आहे.पुण्यातील आघारकर ही संस्था अनेक वर्षांपासून संशोधन क्षेत्रात मूलभूत कार्य करत आहे. राज्य शासनाने औषधी वनस्पतींचे गॅझेटियर १९५३ मध्ये प्रकाशित केले. या गॅझेटकरिता डॉ. एस. पी. आघारकर यांनी पुढाकार घेतला होता. यामध्ये राज्यातील ३०० वनऔषधींची नोंद आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील बऱ्याच वनस्पतींची माहिती यामध्ये येऊ शकली नाही. त्यामुळे या संस्थेने राज्यातील काही जिल्ह्यांसोबतच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश करून संशोधन केले. संशोधन व सर्वेक्षणानुसार ४०० वनऔषधींची नोंद झाली. व्यावसायिक उपयुक्ततेसाठी ३५७ वनस्पतींची मागणी वाढत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले. वनऔषधींची माहिती संकलनासाठी जैवविविधता मंडळ, वनविभाग आणि औषध निर्मिती क्षेत्रातील काही संस्थांचेही सहकार्य घेण्यात आले. जिल्ह्यामध्ये ताडोबासारखे समृद्ध जंगल आहे. मागील पाच वर्षांपासून जंगलाचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली.राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. परिणामी, जिल्ह्यातील जैवविविधता वाढली. अनेक दुर्मिळ वनस्पती जोमाने बहरल्या आहेत. यातील बहुतेक वनस्पती बहुगुणी औषधीयुक्त आहेत. वनऔषधींची तांत्रिक नोंद करण्यासाठी डॉ. व्ही. एन. नाईक, डॉ. मुजुमदार, डॉ. दिवाकर, डॉ. चाफेकर, डॉ. चिंचणीकर अशा पाच तज्ज्ञांची मार्गदर्शक समिती गठित करण्यात आली होती. संस्थेचा हा अहवाल संशोधनासाठी दिशादर्शक ठरणार आहे.वनस्पतींची करावी व्यावसायिक लागवडजिल्ह्यातील वनस्पतींचे वर्णन, शास्त्रीय माहिती, औषधी वापर, लागवड आणि उत्पादनाचे तंत्र यासंदर्भातही पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेने माहिती संकलित केली. काही वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामध्ये ‘सर्पगंधा’ या वनस्पतीचा समावेश आहे. ‘काळमेघ’ ही वनस्पती दुर्मिळ असून व्यावसायिक लागवडीसाठी चालणा देण्याची गरज असल्याचेही निरीक्षण संस्थेने नोंदविले आहे.