शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

२८ दिवसांपासून प्रकल्पग्रस्त उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:01 IST

गेल्या ४० वर्षांपूर्वी चंदईनाला प्रकल्पाकरिता शासनाने निमढेलावासीयांची जमीन संपादित केली होती. मात्र ४० वर्ष लोटूनही त्यांचे स्थायी पुनर्वसन झाले नसल्याने व वारंवार पाठपुरावा करूनही......

ठळक मुद्देचंदईनाला प्रकल्प : निमढेलावासीय न्यायाच्या प्रतीक्षेत

आशिष घुमे ।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : गेल्या ४० वर्षांपूर्वी चंदईनाला प्रकल्पाकरिता शासनाने निमढेलावासीयांची जमीन संपादित केली होती. मात्र ४० वर्ष लोटूनही त्यांचे स्थायी पुनर्वसन झाले नसल्याने व वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन त्यांच्या समस्येकडे लक्ष देत नसल्याने त्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेत १० आॅगस्टपासून चंदईनाला धरणाच्या गेटला कुलूप ठोकून कुटुंबासह साखळी उपोषण सुरु केले. आज उपोषण सुरु होऊन २८ दिवस लोटले आहेत तरीही निमढेलावासी न्यायाच्या प्रतीक्षेत उपाशी बसून आहेत.सन १९७६-७७ मध्ये निमढेलावासीयांची शेतजमीन व घरे सरकारने संपादित केल्यानंतर त्यांच्या हक्काच्या घरापासून व शेतजमिनीपासून ते वंचित झाले. त्यानंतर नोकरीपासूनही दूर झाले. प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करूनही उपयोग नाही. गेल्या ४० वषार्पासून आपल्या न्याय हक्कासाठी ते लढत आहेत. पण त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य व मदत मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्तांना अकारण हलाकीचे जीवन जगावे लागत आहे. ‘तुम्हाला जिथे शेतजमीन देऊ, तिथे तुम्हाला जावे लागेल’ असे सांगून त्यांना तात्पुरते म्हणून जलसंपदाच्या जागेवर राहण्यास जागा दिली. मात्र त्यांच्या शेतजमिनीची व घराची शिल्लक असलेली रक्कम त्यांना दिलेली नाही व एक व्यक्ती शासकीय नोकरीवर घेऊ, असे सांगून अजूनपर्यंत त्यांना नोकरीवरही घेतले नाही. या सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी निमढेला ग्रामवासी १० आॅगस्ट २०१७ पासून कुटुंबासह साखळी उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा २८ वा दिवस आहे. तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे हे आंदोलन पुढे कोणते वळण घेईल, याचा नेम नाही.लोकप्रतिनिधींची केवळ औपचारिकताचंदईनाला प्रकल्पाच्या गेटला कुलूप ठोकून प्रकल्पग्रस्तांनी साखळी उपोषण सुरु केले. यादरम्यान अनेक लोकप्रतिनिधींनी उपोषणस्थळाला भेट दिली व अनेक आश्वासने दिली. पण उपोषण सुरु होऊन २८ दिवस होऊनही कुठलाच तोडगा निघाला नसल्याने उपोषणस्थळाला दिलेली भेट केवळ औपचारिकता होती, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.आंदोलनात महिला व मुलांचाही समावेशचंदईनाला प्रकल्पावर सुरु असलेल्या साखळी उपोषणात महिला व मुलांचाही समावेश आहे. ही शाळकरी मुले शाळा सोडून उपोषणस्थळी बसून असल्याचे दिसतात. ज्या वयात त्यांना शिक्षणाचे धडे गिरवायचे आहे, त्या वयात त्यांना आंदोलन कसे करावे, हे शिकावे लागत आहे.