शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

चंद्रपूर  जिल्ह्यातील गोंडपिपरीच्या भूगर्भात दुर्मिळ धातूंचा मौल्यवान खजिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 10:48 IST

Chandrapur News भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या शास्त्रज्ञांनी गोंडपिपरी तालुक्यात सन २००७ ते २०१० मध्ये सर्वे केला होता. प्लॅटिनम, सोने आणि रूथेनिअम, रोडिअम, इरेडिअम धातू असल्याचे संशोधनातून समोर आले.

ठळक मुद्देफटका शासकीय उदासीनतेचा दहा वर्षांपूर्वी संशोधनातून आले समोर जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणार

नीलेश झाडे 

लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : गोंडपिपरीच्या भूगर्भात मौल्यवान प्लॅटिनम, सोने आणि दुर्मिळात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रूथेनिअम, रोडिअम, इरेडिअम धातू असल्याचे दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून समोर आले. हे दुर्मिळ धातू बाहेर काढण्यासाठी यानंतर काहीही प्रयत्न झाले नाही. हे दुर्मिळ धातू आजही तसेच आहेत. हे धातू बाहेर काढले तर विकासात मैलाचा दगड ठरू शकेल, असा हा खनिजा असल्याचे संशोधकांचे मत आहे.

भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या शास्त्रज्ञांनी गोंडपिपरी तालुक्यात सन २००७ ते २०१० मध्ये सर्वे केला होता. यावर एम. एल. डोरा, के. के. के. नायर आणि के. शशिधरण या भूगर्भ शास्त्रज्ञांच्या त्रिकुटाने बंगळूर येथून प्रकाशित होणाऱ्या ‘करंट सायन्स’ या नियतकालिकात शोधनिबंध प्रकाशित केला. या शोधनिबंधात गोंडपिपरीच्या भूगर्भात मौल्यवान सोने, प्लॅटिनम, दुर्मिळातील दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रूथेनिअम, रोडिअम, इरेडिअम हे धातू पुरेशा प्रमाणात आढळून आल्याची माहिती समोर आली. जगभरात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे धातू चंद्रपूर जिल्ह्याच्या एका छोट्याशा गोंडपिपरी तालुक्याच्या पोटात आहेत. ही बाब मागास अशी ओळख असलेल्या गोंडपिपरीसाठी सुखावणारी होती. या संशोधनाने गोंडपिपरीच्या रुपाने चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर गेले. आता विकासाला नवी चालना मिळेल, अशी आशा या परिसरातील जनतेला होती. मात्र याबाबत शासन यंत्रणेकडून कोणत्याही हालचाली न झाल्याने भूगर्भातील हा खजिना तसाच पडून आहे.

वटराणा, हेटी पट्ट्यात प्रमाण अधिक

भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने केलेल्या संशोधनात गोंडपिपरी येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वटराणा पट्ट्यात पाॅयरोझिनाईट आणि गॅब्रो हे प्लॅटिनमचे तर पेंटालँडाईट हे सोन्याचे संयुग आढळून आले. भंगाराम तळोधी परिसरात असलेल्या हेटी पट्ट्यात दुर्मिळात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे धातूचे प्रमाण आढळून आले आहेत. वटराणा, हेटी पट्ट्यात प्रमाण अधिक आहे.

एकदा वेधले होते लोकसभेचे लक्ष

हंसराज अहिर यांनी खासदार असताना लोकसभेत याकडे लक्ष वेधून संशोधनकार्य मंदगतीने सुरू आहे. संशोधनाचा निधी वाढवावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर महत्त्वपूर्ण संशोधनाकडे कोणीही लक्ष दिले नाही.

टॅग्स :Governmentसरकार