शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

चंद्रपूर  जिल्ह्यातील गोंडपिपरीच्या भूगर्भात दुर्मिळ धातूंचा मौल्यवान खजिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 10:48 IST

Chandrapur News भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या शास्त्रज्ञांनी गोंडपिपरी तालुक्यात सन २००७ ते २०१० मध्ये सर्वे केला होता. प्लॅटिनम, सोने आणि रूथेनिअम, रोडिअम, इरेडिअम धातू असल्याचे संशोधनातून समोर आले.

ठळक मुद्देफटका शासकीय उदासीनतेचा दहा वर्षांपूर्वी संशोधनातून आले समोर जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणार

नीलेश झाडे 

लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : गोंडपिपरीच्या भूगर्भात मौल्यवान प्लॅटिनम, सोने आणि दुर्मिळात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रूथेनिअम, रोडिअम, इरेडिअम धातू असल्याचे दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून समोर आले. हे दुर्मिळ धातू बाहेर काढण्यासाठी यानंतर काहीही प्रयत्न झाले नाही. हे दुर्मिळ धातू आजही तसेच आहेत. हे धातू बाहेर काढले तर विकासात मैलाचा दगड ठरू शकेल, असा हा खनिजा असल्याचे संशोधकांचे मत आहे.

भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या शास्त्रज्ञांनी गोंडपिपरी तालुक्यात सन २००७ ते २०१० मध्ये सर्वे केला होता. यावर एम. एल. डोरा, के. के. के. नायर आणि के. शशिधरण या भूगर्भ शास्त्रज्ञांच्या त्रिकुटाने बंगळूर येथून प्रकाशित होणाऱ्या ‘करंट सायन्स’ या नियतकालिकात शोधनिबंध प्रकाशित केला. या शोधनिबंधात गोंडपिपरीच्या भूगर्भात मौल्यवान सोने, प्लॅटिनम, दुर्मिळातील दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रूथेनिअम, रोडिअम, इरेडिअम हे धातू पुरेशा प्रमाणात आढळून आल्याची माहिती समोर आली. जगभरात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे धातू चंद्रपूर जिल्ह्याच्या एका छोट्याशा गोंडपिपरी तालुक्याच्या पोटात आहेत. ही बाब मागास अशी ओळख असलेल्या गोंडपिपरीसाठी सुखावणारी होती. या संशोधनाने गोंडपिपरीच्या रुपाने चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर गेले. आता विकासाला नवी चालना मिळेल, अशी आशा या परिसरातील जनतेला होती. मात्र याबाबत शासन यंत्रणेकडून कोणत्याही हालचाली न झाल्याने भूगर्भातील हा खजिना तसाच पडून आहे.

वटराणा, हेटी पट्ट्यात प्रमाण अधिक

भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने केलेल्या संशोधनात गोंडपिपरी येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वटराणा पट्ट्यात पाॅयरोझिनाईट आणि गॅब्रो हे प्लॅटिनमचे तर पेंटालँडाईट हे सोन्याचे संयुग आढळून आले. भंगाराम तळोधी परिसरात असलेल्या हेटी पट्ट्यात दुर्मिळात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे धातूचे प्रमाण आढळून आले आहेत. वटराणा, हेटी पट्ट्यात प्रमाण अधिक आहे.

एकदा वेधले होते लोकसभेचे लक्ष

हंसराज अहिर यांनी खासदार असताना लोकसभेत याकडे लक्ष वेधून संशोधनकार्य मंदगतीने सुरू आहे. संशोधनाचा निधी वाढवावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर महत्त्वपूर्ण संशोधनाकडे कोणीही लक्ष दिले नाही.

टॅग्स :Governmentसरकार