शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर  जिल्ह्यातील गोंडपिपरीच्या भूगर्भात दुर्मिळ धातूंचा मौल्यवान खजिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 10:48 IST

Chandrapur News भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या शास्त्रज्ञांनी गोंडपिपरी तालुक्यात सन २००७ ते २०१० मध्ये सर्वे केला होता. प्लॅटिनम, सोने आणि रूथेनिअम, रोडिअम, इरेडिअम धातू असल्याचे संशोधनातून समोर आले.

ठळक मुद्देफटका शासकीय उदासीनतेचा दहा वर्षांपूर्वी संशोधनातून आले समोर जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणार

नीलेश झाडे 

लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : गोंडपिपरीच्या भूगर्भात मौल्यवान प्लॅटिनम, सोने आणि दुर्मिळात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रूथेनिअम, रोडिअम, इरेडिअम धातू असल्याचे दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून समोर आले. हे दुर्मिळ धातू बाहेर काढण्यासाठी यानंतर काहीही प्रयत्न झाले नाही. हे दुर्मिळ धातू आजही तसेच आहेत. हे धातू बाहेर काढले तर विकासात मैलाचा दगड ठरू शकेल, असा हा खनिजा असल्याचे संशोधकांचे मत आहे.

भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या शास्त्रज्ञांनी गोंडपिपरी तालुक्यात सन २००७ ते २०१० मध्ये सर्वे केला होता. यावर एम. एल. डोरा, के. के. के. नायर आणि के. शशिधरण या भूगर्भ शास्त्रज्ञांच्या त्रिकुटाने बंगळूर येथून प्रकाशित होणाऱ्या ‘करंट सायन्स’ या नियतकालिकात शोधनिबंध प्रकाशित केला. या शोधनिबंधात गोंडपिपरीच्या भूगर्भात मौल्यवान सोने, प्लॅटिनम, दुर्मिळातील दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रूथेनिअम, रोडिअम, इरेडिअम हे धातू पुरेशा प्रमाणात आढळून आल्याची माहिती समोर आली. जगभरात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे धातू चंद्रपूर जिल्ह्याच्या एका छोट्याशा गोंडपिपरी तालुक्याच्या पोटात आहेत. ही बाब मागास अशी ओळख असलेल्या गोंडपिपरीसाठी सुखावणारी होती. या संशोधनाने गोंडपिपरीच्या रुपाने चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर गेले. आता विकासाला नवी चालना मिळेल, अशी आशा या परिसरातील जनतेला होती. मात्र याबाबत शासन यंत्रणेकडून कोणत्याही हालचाली न झाल्याने भूगर्भातील हा खजिना तसाच पडून आहे.

वटराणा, हेटी पट्ट्यात प्रमाण अधिक

भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने केलेल्या संशोधनात गोंडपिपरी येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वटराणा पट्ट्यात पाॅयरोझिनाईट आणि गॅब्रो हे प्लॅटिनमचे तर पेंटालँडाईट हे सोन्याचे संयुग आढळून आले. भंगाराम तळोधी परिसरात असलेल्या हेटी पट्ट्यात दुर्मिळात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे धातूचे प्रमाण आढळून आले आहेत. वटराणा, हेटी पट्ट्यात प्रमाण अधिक आहे.

एकदा वेधले होते लोकसभेचे लक्ष

हंसराज अहिर यांनी खासदार असताना लोकसभेत याकडे लक्ष वेधून संशोधनकार्य मंदगतीने सुरू आहे. संशोधनाचा निधी वाढवावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर महत्त्वपूर्ण संशोधनाकडे कोणीही लक्ष दिले नाही.

टॅग्स :Governmentसरकार