शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना समानतेची वागणूक दिली तरच प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 22:36 IST

बहुजनांची संस्कृती कोणती होती, हे समजणे स्त्रियांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. ही संस्कृती समानतेवर आधारित आहे. महिलांना सन्मानाचा दर्जा होता. परंतु बहुजनांच्या सिंधु संस्कृतीवर हल्ला करून नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे महिलांना हीन लेखून दुय्यम दर्जा देण्याची परंपरा निर्माण करण्यात आली. हा प्रकार लोकशाही मूल्यरचनेसाठी गंभीर असून महिलांना समतेची वागणूक दिली तरच खऱ्या अर्थाने प्रगती होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या जिल्हाध्यक्ष शरयू दहाट केले. रविवारी येथे पार पडलेल्या सातव्या जिल्हा अधिवेशनात त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देशरयु दहाट : राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाचे अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बहुजनांची संस्कृती कोणती होती, हे समजणे स्त्रियांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. ही संस्कृती समानतेवर आधारित आहे. महिलांना सन्मानाचा दर्जा होता. परंतु बहुजनांच्या सिंधु संस्कृतीवर हल्ला करून नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे महिलांना हीन लेखून दुय्यम दर्जा देण्याची परंपरा निर्माण करण्यात आली. हा प्रकार लोकशाही मूल्यरचनेसाठी गंभीर असून महिलांना समतेची वागणूक दिली तरच खऱ्या अर्थाने प्रगती होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या जिल्हाध्यक्ष शरयू दहाट केले. रविवारी येथे पार पडलेल्या सातव्या जिल्हा अधिवेशनात त्या बोलत होत्या.यावेळी प्रा. प्रभा वासाडे, अ‍ॅड. इतिका साहा, संगिता मुलकलवार, निर्मला ठाकूर, निवेदिता कवाडे, शाहिन खान, छाया सोनुले, रजनी मत्ते, डॉ. अभिलाषा गावतुरे उपस्थित होत्या. दहाट म्हणाल्या, महिलांवरील वाढते अत्याचार आणि त्यांची भयावह आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे सर्व महिलांनी प्रबोधनाच्या राष्ट्रव्यापी संघर्षात सहभागी होणे गरजेचे झाले आहे. याकरिता राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ देशभर व्यापक जनप्रबोधन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय संस्कृती आणि राज्यघटना यातील विविध पैलुंची माहिती त्यांनी दिली. दिवसभर चाललेल्या सत्रांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.प्रा. वासाडे म्हणाल्या, देशात महिलांची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. पुरुषप्रधान समाजात आता पुरुषांची मानसिकता बदलावी लागणार आहे. ही मानसिकता कशी बनली, याची कारणे काय? ही व्यवस्था कायम ठेवण्याचे षडयंत्र कोण करत आहेत, याचा विचार करण्याची आज गरज आहे. व्यवस्था परिवर्तनाचा लढा पुढे नेल्याशिवाय महिलांची प्रगती होणार नाही. यासाठी चाकोरीच्या बाहेर निघून विविध प्रश्नांवर एकत्र आले पाहिजे, असेही प्रा. वासाडे म्हणाल्या.महिलांच्या समस्यांवर विचारमंथन करण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो महिला उपस्थित झाल्या होत्या. ग्रामीण भागातील महिलांनी संविधान व लोकशाही, महिला अत्याचार आदी विषयांवर विचार मांडले. यावेळी पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. संचालन शाहिदा शेख, प्रास्ताविक माया कोसे यांनी केले. कल्पना तेलंग यांनी आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी सीमा मेश्राम, मृणालिनी नगराळे, चहारे, शशिकला गावतुरे, ताराबाई वाघधरे, मनिषा भसारकर, अफसाना शेख, वीना पेटकुले, तनवीर सय्यद, संध्या फुलझेले, सपना देशभ्रतार, संगिता भगत, करुणा चालखुरे, दुर्गा वैरागडे, उषा फुलझेले, अरुणा नगराळे, विजय मुसळे, आसुटकर, अनिता देरकर आदी उपस्थित होते.