शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना समानतेची वागणूक दिली तरच प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 22:36 IST

बहुजनांची संस्कृती कोणती होती, हे समजणे स्त्रियांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. ही संस्कृती समानतेवर आधारित आहे. महिलांना सन्मानाचा दर्जा होता. परंतु बहुजनांच्या सिंधु संस्कृतीवर हल्ला करून नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे महिलांना हीन लेखून दुय्यम दर्जा देण्याची परंपरा निर्माण करण्यात आली. हा प्रकार लोकशाही मूल्यरचनेसाठी गंभीर असून महिलांना समतेची वागणूक दिली तरच खऱ्या अर्थाने प्रगती होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या जिल्हाध्यक्ष शरयू दहाट केले. रविवारी येथे पार पडलेल्या सातव्या जिल्हा अधिवेशनात त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देशरयु दहाट : राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाचे अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बहुजनांची संस्कृती कोणती होती, हे समजणे स्त्रियांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. ही संस्कृती समानतेवर आधारित आहे. महिलांना सन्मानाचा दर्जा होता. परंतु बहुजनांच्या सिंधु संस्कृतीवर हल्ला करून नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे महिलांना हीन लेखून दुय्यम दर्जा देण्याची परंपरा निर्माण करण्यात आली. हा प्रकार लोकशाही मूल्यरचनेसाठी गंभीर असून महिलांना समतेची वागणूक दिली तरच खऱ्या अर्थाने प्रगती होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या जिल्हाध्यक्ष शरयू दहाट केले. रविवारी येथे पार पडलेल्या सातव्या जिल्हा अधिवेशनात त्या बोलत होत्या.यावेळी प्रा. प्रभा वासाडे, अ‍ॅड. इतिका साहा, संगिता मुलकलवार, निर्मला ठाकूर, निवेदिता कवाडे, शाहिन खान, छाया सोनुले, रजनी मत्ते, डॉ. अभिलाषा गावतुरे उपस्थित होत्या. दहाट म्हणाल्या, महिलांवरील वाढते अत्याचार आणि त्यांची भयावह आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे सर्व महिलांनी प्रबोधनाच्या राष्ट्रव्यापी संघर्षात सहभागी होणे गरजेचे झाले आहे. याकरिता राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ देशभर व्यापक जनप्रबोधन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय संस्कृती आणि राज्यघटना यातील विविध पैलुंची माहिती त्यांनी दिली. दिवसभर चाललेल्या सत्रांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.प्रा. वासाडे म्हणाल्या, देशात महिलांची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. पुरुषप्रधान समाजात आता पुरुषांची मानसिकता बदलावी लागणार आहे. ही मानसिकता कशी बनली, याची कारणे काय? ही व्यवस्था कायम ठेवण्याचे षडयंत्र कोण करत आहेत, याचा विचार करण्याची आज गरज आहे. व्यवस्था परिवर्तनाचा लढा पुढे नेल्याशिवाय महिलांची प्रगती होणार नाही. यासाठी चाकोरीच्या बाहेर निघून विविध प्रश्नांवर एकत्र आले पाहिजे, असेही प्रा. वासाडे म्हणाल्या.महिलांच्या समस्यांवर विचारमंथन करण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो महिला उपस्थित झाल्या होत्या. ग्रामीण भागातील महिलांनी संविधान व लोकशाही, महिला अत्याचार आदी विषयांवर विचार मांडले. यावेळी पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. संचालन शाहिदा शेख, प्रास्ताविक माया कोसे यांनी केले. कल्पना तेलंग यांनी आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी सीमा मेश्राम, मृणालिनी नगराळे, चहारे, शशिकला गावतुरे, ताराबाई वाघधरे, मनिषा भसारकर, अफसाना शेख, वीना पेटकुले, तनवीर सय्यद, संध्या फुलझेले, सपना देशभ्रतार, संगिता भगत, करुणा चालखुरे, दुर्गा वैरागडे, उषा फुलझेले, अरुणा नगराळे, विजय मुसळे, आसुटकर, अनिता देरकर आदी उपस्थित होते.