शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

शक्तिशाली स्फोटांनी पोवनी गाव हादरतेयं

By admin | Updated: April 7, 2016 00:39 IST

वेकोलित कोळसा उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या शक्तिशाली स्फोटांमुळे पोवनी गावातील अनेक नव्या जुन्या इमारतींना अल्पावधीतच तडे गेले आहेत.

लोकप्रतिनिधी लक्ष देईना : वेकोलिच्या मुजोर प्रशासनापुढे गावकरी हतबलप्रकाश काळे गोवरीवेकोलित कोळसा उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या शक्तिशाली स्फोटांमुळे पोवनी गावातील अनेक नव्या जुन्या इमारतींना अल्पावधीतच तडे गेले आहेत. वेकोलितील दुष्परिणामाचा नाहक फटका नागरिकांना बसत असून स्फोटांमुळे गावकऱ्यांचे आयुष्यच हादरले आहे. जनतेचे सेवक समजले जाणारे लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने गावकरी आता निराधार झाले आहेत.राजुरा तालुक्यातील गोवरी-कवठाळा या मुख्य मार्गावरील तालुका स्थळापासून १२ कि.मी. अंतरावर असलेले पोवनी गाव वेकोलिच्या कुशीत वसले आहे. सभोवताल कोळसा खाणी व मातीचे महाकाय ढिगारे असल्याने जवळ गेले तरी गाव दिसत नाही. मातीच्या ढिगाऱ्यावर वन्यप्राण्यांचा दिवस-रात्र हैदोस सुरू असतो. त्यामुळे गावकरी वैतागले आहेत. मातीचे ढिगारे हटविण्यासाठी गावातील ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी वेकोलिला अनेकदा निवेदन दिले.मात्र वेकोलिच्या मुजोर प्रशासनाने आश्वासन देण्याखेरीज दुसरे काहीच केले नाही. वेकोलिच्या प्रतापाचे हे सारे दुष्परिणाम गावकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. गावकऱ्यांची ही आजची समस्या नाही तर ज्या दिवशीपासून वेकोलिचा कोळसा खाणीचे निर्माण झाले. तेव्हापासून वेकोलि प्रशासनाने गावकऱ्यांना वेठीस धरले आहे. मात्र जनतेचे सेवक समजले जाणारे मायबाप लोकप्रतिनिधी या नागरिकांच्या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाही.पोवनी गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा मुख्य मार्गालगत आहे. या ठिकाणापासून कोळसा खाणीजवळ आहे. वेकोलित कोळसा उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या ब्लॉस्टिंगचे आवाज विद्यार्थी व गावकऱ्यांच्या कानावर सारखे घोंगावत असतात. हे स्फोटाचे आवाज क्षणभर नागरिकांच्या काळजात धडकी भरविणारे आहे. या गावातील नागरिकांच्या जमिनी वेकोलिने कोळसा खाणीसाठी घेतल्याने जमिनीचा तुकडाही आता शिल्लक राहिला नाही. त्यामुळे गावात राहून काय करायचे, या विचाराने बहुतांश नागरिकांनी शहराच्या ठिकाणी स्थानांतरण केले आहे. त्यामुळे गाव आता ओस पडायला लागले आहे. पूर्वी सारखी मजा आता गावात राहिली नसल्याचे गावकरी सांगतात.प्रस्तुत प्रतिनिधीने पोवनी गावाला भेट दिली असता वेकोलित घडवून आणल्या जाणाऱ्या शक्तिशाली स्फोटांमुळे अनेक नव्या, जुन्या इमारतींना अल्पावधीतच तडे गेल्याचे दिसून आले. तर काही घरांच्या भिंती कोसळण्याच्या मार्गावर असल्याने कुटुंबीयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. स्फोटांची तीव्रता इतकी असते की ब्लास्टिंगमुळे घरातील भांडी व घर अनेकदा हालत असल्याचे गावकरी सांगतात.गाव लहान असल्याने गावात विकासाची गंगा वाहने आवश्यक आहे. मात्र येथील चित्र उलट असून गावाला प्रशासनाकडून विकासासाठी तोकडा निधी मिळत असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात येते. त्यामुळे गावातील विकासकामांना खीळ बसली आहे. गावातील ग्रामपंचायतीने आता लक्ष देणे सोडून दिल्याचे दिसते.