शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

शक्तिशाली स्फोटांनी पोवनी गाव हादरतेयं

By admin | Updated: April 7, 2016 00:39 IST

वेकोलित कोळसा उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या शक्तिशाली स्फोटांमुळे पोवनी गावातील अनेक नव्या जुन्या इमारतींना अल्पावधीतच तडे गेले आहेत.

लोकप्रतिनिधी लक्ष देईना : वेकोलिच्या मुजोर प्रशासनापुढे गावकरी हतबलप्रकाश काळे गोवरीवेकोलित कोळसा उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या शक्तिशाली स्फोटांमुळे पोवनी गावातील अनेक नव्या जुन्या इमारतींना अल्पावधीतच तडे गेले आहेत. वेकोलितील दुष्परिणामाचा नाहक फटका नागरिकांना बसत असून स्फोटांमुळे गावकऱ्यांचे आयुष्यच हादरले आहे. जनतेचे सेवक समजले जाणारे लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने गावकरी आता निराधार झाले आहेत.राजुरा तालुक्यातील गोवरी-कवठाळा या मुख्य मार्गावरील तालुका स्थळापासून १२ कि.मी. अंतरावर असलेले पोवनी गाव वेकोलिच्या कुशीत वसले आहे. सभोवताल कोळसा खाणी व मातीचे महाकाय ढिगारे असल्याने जवळ गेले तरी गाव दिसत नाही. मातीच्या ढिगाऱ्यावर वन्यप्राण्यांचा दिवस-रात्र हैदोस सुरू असतो. त्यामुळे गावकरी वैतागले आहेत. मातीचे ढिगारे हटविण्यासाठी गावातील ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी वेकोलिला अनेकदा निवेदन दिले.मात्र वेकोलिच्या मुजोर प्रशासनाने आश्वासन देण्याखेरीज दुसरे काहीच केले नाही. वेकोलिच्या प्रतापाचे हे सारे दुष्परिणाम गावकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. गावकऱ्यांची ही आजची समस्या नाही तर ज्या दिवशीपासून वेकोलिचा कोळसा खाणीचे निर्माण झाले. तेव्हापासून वेकोलि प्रशासनाने गावकऱ्यांना वेठीस धरले आहे. मात्र जनतेचे सेवक समजले जाणारे मायबाप लोकप्रतिनिधी या नागरिकांच्या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाही.पोवनी गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा मुख्य मार्गालगत आहे. या ठिकाणापासून कोळसा खाणीजवळ आहे. वेकोलित कोळसा उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या ब्लॉस्टिंगचे आवाज विद्यार्थी व गावकऱ्यांच्या कानावर सारखे घोंगावत असतात. हे स्फोटाचे आवाज क्षणभर नागरिकांच्या काळजात धडकी भरविणारे आहे. या गावातील नागरिकांच्या जमिनी वेकोलिने कोळसा खाणीसाठी घेतल्याने जमिनीचा तुकडाही आता शिल्लक राहिला नाही. त्यामुळे गावात राहून काय करायचे, या विचाराने बहुतांश नागरिकांनी शहराच्या ठिकाणी स्थानांतरण केले आहे. त्यामुळे गाव आता ओस पडायला लागले आहे. पूर्वी सारखी मजा आता गावात राहिली नसल्याचे गावकरी सांगतात.प्रस्तुत प्रतिनिधीने पोवनी गावाला भेट दिली असता वेकोलित घडवून आणल्या जाणाऱ्या शक्तिशाली स्फोटांमुळे अनेक नव्या, जुन्या इमारतींना अल्पावधीतच तडे गेल्याचे दिसून आले. तर काही घरांच्या भिंती कोसळण्याच्या मार्गावर असल्याने कुटुंबीयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. स्फोटांची तीव्रता इतकी असते की ब्लास्टिंगमुळे घरातील भांडी व घर अनेकदा हालत असल्याचे गावकरी सांगतात.गाव लहान असल्याने गावात विकासाची गंगा वाहने आवश्यक आहे. मात्र येथील चित्र उलट असून गावाला प्रशासनाकडून विकासासाठी तोकडा निधी मिळत असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात येते. त्यामुळे गावातील विकासकामांना खीळ बसली आहे. गावातील ग्रामपंचायतीने आता लक्ष देणे सोडून दिल्याचे दिसते.