शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

वीज केंद्राने अडला रस्ता

By admin | Updated: December 13, 2014 01:17 IST

येथील रय्यतवारी रिट मधील जमिन चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने अधिग्रहीत केली. उर्वरित जमिनीवर शेतकरी शेती करीत आहे.

चंद्रपूर : येथील रय्यतवारी रिट मधील जमिन चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने अधिग्रहीत केली. उर्वरित जमिनीवर शेतकरी शेती करीत आहे. मात्र त्यांना जाण्यासाठी वीज केंद्राने रस्त्याच ठेवला नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. किमान शेतात जाण्यासाठी रस्ता करून द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मंत्र्यांपासून तर प्रशासनापर्यंत सर्वांना निवेदन दिले आहे. मात्र अद्यापही यावर तोडगा निघाला नाही.चांदा रय्यतारी रिठमधील हजारो एकर जमीन चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने १९८० पूर्वी भूसंपादन केली. प्रकल्पाने भूसंपादन केल्यानंतर उर्वरित असलेल्या जमिनीवर शेतकरी शेती करून उपजिवीका करीत आहे. मात्र या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्त्याच नाही. त्यामुळे शेतात जायचे तरी कुठून, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, एका बाजूने सेंट्रल रेल्वे लाईन आहे तर दुसऱ्या बाजूने महाऔष्णिक वीज केंद्रासाठी कोळसा व इतर माल वाहतूक करण्याकरिता रेल्वे लाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे शेतात बैलबंडी किंवा ट्रॅक्टरला जाण्यासाठी रस्ता नाही. दरम्यान शेतकऱ्यांनी तत्कालीन पालकमंत्री शोभाताई फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन रस्त्यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना येण्या-जाण्यासाठी प्रिकास्ट ब्रिज तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र सदर काम काही दिवसाताच बंद पडले. त्यानंतर पुन्हा या रस्त्याच्या मागणीसाठी नागरिकांनी प्रशासनाकडे पायपीट सुरु केली आहे. मात्र अद्यापही रस्ता तयार करून देण्यात आला नाही. आता केंद्रात आणि राज्यात आपल्या शहरातील मंत्री असल्याने या शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहे. केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, चंद्रपूर वीज केंद्राच्या मुख्य व्यवस्थापकांना शेतकऱ्यांनी निवेदन देत रस्ता तयार करून देण्याची मागणी केली आहे. (नगर प्रतिनिधी)