शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

महाराष्ट्रातील वीज प्रकल्प धोक्यात

By admin | Updated: July 20, 2016 00:44 IST

महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा व भुसावळ येथील तब्बल १५ वीज निर्मिती प्रकल्प बंद केले आहेत.

आंदोलनाचा इशारा : महानिर्मिती बचाव संयुक्त कृती समितीचंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा व भुसावळ येथील तब्बल १५ वीज निर्मिती प्रकल्प बंद केले आहेत. त्याच्या निषेधार्थ वीज कामगार संयुक्त कृती सतीने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या गेटवर द्वारसभा घेण्यात आली. या सभेमध्ये भारतीय कामगार सेना मनसे कामगार सेना, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना, ग्रॅज्युएट इंजि. असोसिएशन, पॉवर फ्रट, भारतीय मजदूर संघ, वर्कर्स फेडरेशन केमिस्ट असोसिएशन, सबॉर्डिनेट इंजि. असोससिएशन, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटना, इंटक त्याचप्रमाणे भारतीय कामगार कंत्राटी कामगार सेना, भारतीय मजदूर कंत्राटी कामगार संघटना आदींनी भाग घेतला. सभेला भारतीय कामगार सेनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष राजन भानुशाली व वितरण क्षेत्राचे केंद्रीय सहकार्याध्यक्ष मधुकर सुरवाडे उपस्थित होते. भारतीय कामगार सेनेचे निर्मिती क्षेत्राचे केंद्रीय सहकार्याध्यक्ष के.एन. देवताळू यांनी वीज निर्मिती प्रकल्प शासनाने धोक्यात आणल्याचा आरोप केला. या प्रकल्पांना अदानीसारखे मोठे उद्योजक हायजॅक करून राज्यातील सर्व वीज निर्मिती प्रकल्पांचे खाजगीकरण करुन विजेचा दर आठ रुपये प्रति युनिट करून जनतेला वीज भाववाढीसाठी वेठीस धरण्यात येईल, याची जाणीव त्यांनी करून दिली. त्याचप्रमाणे जीईएचे सचिव नवल दामले यांनी महाजनकोची सखोल माहिती दिली. पावर पॉर्इंटचे कार्याध्यक्ष प्रदीप ढाले यांनी महाजनकोला वाचविण्याकरिता सर्वांनी एकजूट राहण्याचे आवाहन केले. वर्कर्स फेडरेशनचे ठाकूर यांनी भविष्यातील आंदोलनात कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबासह आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले विद्युत क्षेत्र तांत्रिका कामगार संघटनेचे प्रकाश फाले कर्मचाऱ्यांचे हित जोपासण्यासाठी आमची संघटना सदैव तत्पर राहील, असे सांगितले. त्यानंतर केमिस्ट असोसिएशनचे कस्तुरे यांनी प्रकल्पामध्ये येणारा कोळसा निकृष्ट दर्जाचा असल्याबाबत माहिती दिली. एसीए संघटनेचे बडगुजर यांनी बंद १५ प्रकल्प सुरू होईपर्यंत सर्वांनी एकजूट राहून शासनाविरुद्ध लढा देण्याचा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून केले. (प्रतिनिधी)