शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

५२५ गावांत मार्चमध्येच महिलांच्या डोक्यावर हंडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:52 IST

चंद्रपूर : थंडी ओसरल्याने उन्हाची काहिली वाढू लागली. परिणामी, यंदा मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील ५२५ गावांतील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन ...

चंद्रपूर : थंडी ओसरल्याने उन्हाची काहिली वाढू लागली. परिणामी, यंदा मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील ५२५ गावांतील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार, अशी चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने ५२५ गावांसाठी २०२०-२०२१ चा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला. त्यासाठी १५ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला; परंतु अद्याप निधी न मिळाल्याने उपाययोजनांच्या कामांना पुन्हा विलंब होऊन पाणीटंचाईचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या कमीच पाऊस झाला. परिणामी, सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. जिल्ह्याची भूजल पातळीही खालावत असून बोअरवेल व विहिरी तळ गाठत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ५२५ गावांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. भूजल सर्वेक्षण विभागानेही यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर होण्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून १९ जानेवारी २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. या आराखड्यानुसार भाग दोनमध्ये जानेवारी ते मार्चदरम्यान ५२५ गावांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे टंचाईवर मात करण्यासाठी ६३८ कामांचे नियोजन करण्यात आले. भाग एक, दोन व तीनसाठी १४ कोटी ९६ लाखांच्या निधीची गरज आहे. शासनाकडून किमान पहिल्या भागातील १२ कोटी ७४ लाखांचा निधी तात्काळ मिळाला नाही तर उपाययोजनेची कामे प्रभावित होऊ शकतात.

सिंदेवाही, गोंडपिपरी तालुक्याला सर्वाधिक झळ

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार, सिंदेवाही व गोंडपिपरी तालुक्यात संभाव्य टंचाईग्रस्त गावांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे विहिरी खोल करणे, गाळ उपसणे, इनबोअर वेल, नवीन विंधन विहिरी, नवीन कूपनलिका, नळयोजना दुरुस्ती आदी कामे प्रस्तावित आहेत.

२३ खासगी विहिरींचे अधिग्रहण

नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटंकावे लागणार नाही, यासाठी कृती आराखड्यात २३ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याची बाब नमूद आहे. याशिवाय, हातपंपाची विशेष दुरुस्ती (अपारंपरिक) व अन्य उपाययोजनांचा समावेश आहे.

एप्रिल- जूनमध्ये ३० टँकरचा प्रस्ताव

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याचे तीन भाग करण्यात आले. दुसऱ्या भागात एप्रिल- जूनमध्ये ३० गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता २ कोटी २२ लाख २५ हजारांचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला.

एक हजार ३३३ उपाययोजना प्रस्तावित

जिल्ह्यातील पाणीटंचाई उपाययोजना भाग एक, दोन व तीनसाठी एक हजार ३३३ उपाययोजना प्रस्तावित आहे. त्यामध्ये जानेवारी ते मार्चमध्ये ६३८ तर एप्रिल- जूनसाठी ६९५ कामांचा समावेश आहे. दोन्ही टप्प्यात एक हजार ३३३ गावांना संभाव्य टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

कोट

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. लवकरच निधी मिळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पाठपुरावा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, पाणीटंचाईची कायमस्वरूपी कामे आता वर्षभरातही करता येतात.

-गिरीश बारसागडे, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा), जि. प., चंद्रपूर