शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

५२५ गावांत मार्चमध्येच महिलांच्या डोक्यावर हंडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:52 IST

चंद्रपूर : थंडी ओसरल्याने उन्हाची काहिली वाढू लागली. परिणामी, यंदा मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील ५२५ गावांतील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन ...

चंद्रपूर : थंडी ओसरल्याने उन्हाची काहिली वाढू लागली. परिणामी, यंदा मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील ५२५ गावांतील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार, अशी चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने ५२५ गावांसाठी २०२०-२०२१ चा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला. त्यासाठी १५ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला; परंतु अद्याप निधी न मिळाल्याने उपाययोजनांच्या कामांना पुन्हा विलंब होऊन पाणीटंचाईचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या कमीच पाऊस झाला. परिणामी, सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. जिल्ह्याची भूजल पातळीही खालावत असून बोअरवेल व विहिरी तळ गाठत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ५२५ गावांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. भूजल सर्वेक्षण विभागानेही यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर होण्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून १९ जानेवारी २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. या आराखड्यानुसार भाग दोनमध्ये जानेवारी ते मार्चदरम्यान ५२५ गावांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे टंचाईवर मात करण्यासाठी ६३८ कामांचे नियोजन करण्यात आले. भाग एक, दोन व तीनसाठी १४ कोटी ९६ लाखांच्या निधीची गरज आहे. शासनाकडून किमान पहिल्या भागातील १२ कोटी ७४ लाखांचा निधी तात्काळ मिळाला नाही तर उपाययोजनेची कामे प्रभावित होऊ शकतात.

सिंदेवाही, गोंडपिपरी तालुक्याला सर्वाधिक झळ

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार, सिंदेवाही व गोंडपिपरी तालुक्यात संभाव्य टंचाईग्रस्त गावांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे विहिरी खोल करणे, गाळ उपसणे, इनबोअर वेल, नवीन विंधन विहिरी, नवीन कूपनलिका, नळयोजना दुरुस्ती आदी कामे प्रस्तावित आहेत.

२३ खासगी विहिरींचे अधिग्रहण

नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटंकावे लागणार नाही, यासाठी कृती आराखड्यात २३ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याची बाब नमूद आहे. याशिवाय, हातपंपाची विशेष दुरुस्ती (अपारंपरिक) व अन्य उपाययोजनांचा समावेश आहे.

एप्रिल- जूनमध्ये ३० टँकरचा प्रस्ताव

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याचे तीन भाग करण्यात आले. दुसऱ्या भागात एप्रिल- जूनमध्ये ३० गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता २ कोटी २२ लाख २५ हजारांचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला.

एक हजार ३३३ उपाययोजना प्रस्तावित

जिल्ह्यातील पाणीटंचाई उपाययोजना भाग एक, दोन व तीनसाठी एक हजार ३३३ उपाययोजना प्रस्तावित आहे. त्यामध्ये जानेवारी ते मार्चमध्ये ६३८ तर एप्रिल- जूनसाठी ६९५ कामांचा समावेश आहे. दोन्ही टप्प्यात एक हजार ३३३ गावांना संभाव्य टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

कोट

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. लवकरच निधी मिळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पाठपुरावा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, पाणीटंचाईची कायमस्वरूपी कामे आता वर्षभरातही करता येतात.

-गिरीश बारसागडे, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा), जि. प., चंद्रपूर