शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

चौकीतील पोलीस नाकाबंदीवर तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2016 01:15 IST

पोलीस चौकीत कार्यरत पोलीस रात्रीच्यावेळी चौकीच्या हद्दतीत गस्तीवर असावेत,..

 चोरट्यांचे फावतेयं : चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिक हैराणचंद्रपूर : पोलीस चौकीत कार्यरत पोलीस रात्रीच्यावेळी चौकीच्या हद्दतीत गस्तीवर असावेत, अशी अपेक्षा असताना त्याच पोलीस कर्मचाऱ्यांना नाकाबंदीवर जुंपण्यात येत असल्याने चोरट्यांचे चांगलेच फावत आहेत. त्यातून शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिक कमालिचे हैराण झाले आहेत.चंद्रपूर शहरात नागरी सुरक्षेच्या दृष्टीने अनेक पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. त्यात वडगाव चौकी, महाकाली चौकी, रयतवारी, बंगाली कॅम्प, बाबुपेठ पठाणपुरा, घुटकाळा आदी पोलीस चौक्यांचा समावेश आहे. परिसरात एखादी गंभीर घटना घडल्यास संबंधित पोलीस चौकीत जाऊन नागरिकांना घटनेची माहिती देता यावी, अथवा त्यासंदर्भात तक्रार करता यावी, यासाठी या पोलीस चौक्या उभारण्यात आल्यात. त्या ठिकाणी पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आलेत. हे कर्मचारी दिवसभर आपले काम इमाने-इतरबारे करतात. मात्र ११ वाजतानंतर त्यांना नाकाबंदीसाठी तैनात केले जाते. तेथे त्यांची अकारण ऊर्जा खर्च होत आहे. या नाकाबंदीतून आजवर किती गुन्हे उघडकीस आलेत, हादेखील संशोेधनाचा विषय ठरला आहे. पोलीस चौकीत तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना चौकीच्या हद्दीतील परिसराचा पूर्ण अभ्यास असतो. परिसरातील गुन्हेगारांचीही त्यांना ओळख असते. या उलट गस्तीवर पाठविण्यात येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना परिसरातील ना रस्ते माहित असतात, ना गुन्हेगाराची ओळख असते. चौकीतील कर्मचारी मात्र या विषयात ‘अपडेट’ असतात. त्यांचे त्या परिसरातील ‘सोर्स’ देखील स्ट्रॉंग असतात. त्यामुळे गुन्हेगारी रोखण्यासाठी चौकीतील पोलीस कर्मचारीच यशस्वी होऊ शकतात. असे असले तरी ज्यांंना परिसराचा, गुन्हेगारांचा कुठलाही अभ्यास नसतो, अशांना रात्रीच्या गस्तीवर पाठविले जात आहे. त्यातून चोरट्यांचे फावत आहे. शहरात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढगेल्या काही दिवसांपासून शहरात चोरट्यांचा अक्षरश: उच्छाद सुरू आहे. पोलिसांच्या रात्रगस्तीलादेखील चोरटे जुमानत नसल्याचे चित्र आहे. काही भागात पोलिसांची गस्तच होत नसल्याच्या तक्रारी आहेत. मागील चार दिवसांत महाकाली पोलीस चौकीतील कर्मचारी रात्रीच्यावेळी नाकाबंदी करण्यात गुंतून असताना लालपेठ व भिवापूर परिसरात चोरीच्या घटना घडल्याची माहिती आहे. नाकाबंदीही आवश्यकगुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नाकाबंदीही आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी चौकीतील पोलीस कर्मचारी न ठेवता अन्य कर्मचाऱ्यांना तैनात केल्यास त्याचा फायदा अधिक होऊ शकतो. चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांना गस्तीवर पाठविल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात यश येऊ शकते.