शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी वसतिगृह इमारतीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:19 IST

कोट्यवधीचा निधी पाण्यात : इमारत ठरली प्रेमीयुगुलाचे आश्रयस्थान कोरपना: तालुक्यातील गडचांदूर या औद्योगिक नगरीत माणिकगड सिमेंट कंपनीच्या दोन किलोमीटर ...

कोट्यवधीचा निधी पाण्यात : इमारत ठरली प्रेमीयुगुलाचे आश्रयस्थान

कोरपना: तालुक्यातील गडचांदूर या औद्योगिक नगरीत माणिकगड सिमेंट कंपनीच्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरापूर ग्रामपंचायत हद्दीत आदिवासी मुला-मुलींचे शैक्षणिक विकास व प्रगतीसाठी गडचांदूर-पाटण या मुख्य रस्त्यालगत शासकीय जमिनीवर वसतिगृहाची निर्मिती केली. मात्र आता या इमारतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

महाराष्ट्र शासनाने या कामासाठी सहा कोटी निधीची तरतूद करून उपरोक्त कामाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फतीने उपरोक्त जमिनीवर आदिवासी मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहासाठी अद्ययावत सर्व सोयी सुविधायुक्त देखणी इमारती तयार करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने उपरोक्त इमारतीचे बांधकाम सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून ७ एप्रिल २०१७ रोजी कायदेशीर ताबा इमारतीचा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग यांना दिला. तसेच या इमारतींना पिण्याच्या पाण्याच्या सुविधाकरिता बोकुळडोह येथून नळ योजनेतून पाईनलाईन टाकली. ते काम अर्धवट अवस्थेत पडले आहे. शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या दोन्ही इमारती २०१९ पर्यंत सुस्थितीत होत्या. मात्र सन २०२०-२१ वित्तीय वर्षात आदिवासी विकास विभागाच्या दिरंगाई व दुर्लक्षपणामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचे विदारक चित्र या ठिकाणी दिसून येते. या इमारती अद्यावत असताना इमारतीमधील फॅन, इलेक्ट्रिक साहित्य, दरवाजे, खिडक्याच्या काचा, स्टील राॅड, मार्बल टाईल्स सर्व चोरीला गेले आहे. याठिकाणी जुगाराचा अड्डा, दारूच्या खाली बाटल्या पडलेल्या असतात. प्रेमीयुगुलांचे तर हे आश्रयस्थान झाल्याचे चित्र पाहायला मिळते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबीद अली, विकास टेकाम, माणिकराव आडे, विनोद जुमडे, प्रवीण जाधव, रोशन बुरेवार जिवतीवरून येताना शासनाची इमारत दुर्लक्षित का म्हणून पाहणी करायला गेले असताना हा प्रकार उघडकीस आला. शासकीय मालमत्तेच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करून वसुली करण्यात यावी व तातडीने त्याठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून आदिवासी विद्यार्थ्यांकरिता इमारती उपलब्ध करून द्यावे व या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर आमदार सुभाष धोटे यांना दिले आहे.