शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोळसा खाणीत प्रदूषण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 21:28 IST

राजुरा तालुक्यातील वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडच्या खुल्या कोळसा खाणीत प्रदूषणाने कहरच केला आहे. धूळ प्रदूषणामुळे वेकोलित काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देकामगारांचे आरोग्य धोक्यात : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडच्या खुल्या कोळसा खाणीत प्रदूषणाने कहरच केला आहे. धूळ प्रदूषणामुळे वेकोलित काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाल्याने हे प्रदूषण जीवघेणे ठरत आहे.वेकोलिच्या राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी २, गोवरी डीप खुल्या कोळसा खाणी आहे. या कोळसा खाणीत नियमांना डावलून धूळप्रदूषण केले जाते. दिवसरात्र मोठ्या प्रमाणात खाणीत धूळ उडत असल्याने येथे काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेकोलि प्रशासन वर्षाकाठी करोडो रुपयांचा नफा कमविते. परंतु कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी वेकोलि घेत नाही. हे कामगारांचे दुदैव आहे. कामगारांच्या सुरक्षिततेचा वेकोलित मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला जातो. परंतु हा कामगाराप्रति वेकोलि प्रशासनाने दाखविलेला केवळ देखावा आहे. वेकोलि परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने परिसरातील रस्ते धुळीने माखले आहे. एखादा ट्रक जवळून गेला तर रस्त्यावरील समोरचे काहीच दिसत नाही. परिणामी मोठा अपघात होण्याची शक्यता असते. धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वेकोलि प्रशासनाची आहे. परंतु वेकोलिचे जबाबदार अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. वेकोलि प्रशासन कामगारांच्या जिवाशी खेळ करीत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाला वेकोलित उडणारी धूळ का दिसत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वेकोलितून उडणाºया धुळीने कोळसा खाण परिसरातील शेती पूर्णत: काळवंडली आहे. कोळशाच्या उडणाºया धुळीने अनेकांचे नुकसान होत असताना धूळ प्रदूषणाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारायला हवा. केवळ जबाबदारी झटकून चालणार नाही तर प्रदूषण नियंत्रण मंडळालाही आपले चोख कर्तव्य बजावावे लागणार आहे.वेकोलिच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी धूळ प्रदूषणावर लक्ष दिले नाही तर नागरिकांचा अधिकाऱ्यांविरुद्ध उद्रेक होईल, हे निश्चित आहे. वेकोलितून उडणाऱ्या कोळशाच्या धुळीने परिसरातील नागरिकही बेजार झाले आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळ गप्प का ?प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. मात्र धूळ प्रदूषणावरुन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियंत्रण सुटत चालल्याने कारखान्यात मोठ्या प्रमाणात नियमाची एैसीतैसी केली जात आहे. प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे झाले आहे.