शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

कोळसा खाणीत प्रदूषण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 21:28 IST

राजुरा तालुक्यातील वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडच्या खुल्या कोळसा खाणीत प्रदूषणाने कहरच केला आहे. धूळ प्रदूषणामुळे वेकोलित काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देकामगारांचे आरोग्य धोक्यात : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडच्या खुल्या कोळसा खाणीत प्रदूषणाने कहरच केला आहे. धूळ प्रदूषणामुळे वेकोलित काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाल्याने हे प्रदूषण जीवघेणे ठरत आहे.वेकोलिच्या राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी २, गोवरी डीप खुल्या कोळसा खाणी आहे. या कोळसा खाणीत नियमांना डावलून धूळप्रदूषण केले जाते. दिवसरात्र मोठ्या प्रमाणात खाणीत धूळ उडत असल्याने येथे काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेकोलि प्रशासन वर्षाकाठी करोडो रुपयांचा नफा कमविते. परंतु कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी वेकोलि घेत नाही. हे कामगारांचे दुदैव आहे. कामगारांच्या सुरक्षिततेचा वेकोलित मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला जातो. परंतु हा कामगाराप्रति वेकोलि प्रशासनाने दाखविलेला केवळ देखावा आहे. वेकोलि परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने परिसरातील रस्ते धुळीने माखले आहे. एखादा ट्रक जवळून गेला तर रस्त्यावरील समोरचे काहीच दिसत नाही. परिणामी मोठा अपघात होण्याची शक्यता असते. धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वेकोलि प्रशासनाची आहे. परंतु वेकोलिचे जबाबदार अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. वेकोलि प्रशासन कामगारांच्या जिवाशी खेळ करीत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाला वेकोलित उडणारी धूळ का दिसत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वेकोलितून उडणाºया धुळीने कोळसा खाण परिसरातील शेती पूर्णत: काळवंडली आहे. कोळशाच्या उडणाºया धुळीने अनेकांचे नुकसान होत असताना धूळ प्रदूषणाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारायला हवा. केवळ जबाबदारी झटकून चालणार नाही तर प्रदूषण नियंत्रण मंडळालाही आपले चोख कर्तव्य बजावावे लागणार आहे.वेकोलिच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी धूळ प्रदूषणावर लक्ष दिले नाही तर नागरिकांचा अधिकाऱ्यांविरुद्ध उद्रेक होईल, हे निश्चित आहे. वेकोलितून उडणाऱ्या कोळशाच्या धुळीने परिसरातील नागरिकही बेजार झाले आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळ गप्प का ?प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. मात्र धूळ प्रदूषणावरुन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियंत्रण सुटत चालल्याने कारखान्यात मोठ्या प्रमाणात नियमाची एैसीतैसी केली जात आहे. प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे झाले आहे.