शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मनपा निवडणुकीत शांततेत मतदान

By admin | Updated: April 20, 2017 01:26 IST

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाची टक्केवारी

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून महानगरपालिका प्रशासनाने १५ दिवसांपासूनच जोरदार जनजागृती केली. मात्र उन्हाच्या तडाक्याने मतदानावर चांगलाच परिणाम झाला. मतदान केंद्रावर सकाळपासून असलेली मतदारांची संख्या सायंकाळपर्यंत तशीच कायम राहिली. सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत सरासरी ५८ टक्के मतदानाची नोंद झाली. मनपा निवडणुकीत ६६ जागांसाठी ४६० उमेदवार रिंगणात आहेत. ८ एप्रिलला सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिल्यानंतर ९ एप्रिलपासून प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली. नऊ दिवसांच्या प्रचारानंतर आज बुधवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. मतदानासाठी शहरात ठिकठिकाणी ३६७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. यातील २६ केंद्र संवेदनशिल असल्याने त्याकडे भरारी पथक विशेष लक्ष ठेवून होते. या निवडणुकीकरिता एकूण ४४० कंट्रोल युनिट व १२५८ बॅलेट युनिट निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आले होते. प्रशासनाकडून १० टक्के मतदान पथके राखीव ठेवण्यात आले होते तर मतदान केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी ४० झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आज सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. सध्या चंद्रपुरात सुर्य आग ओकत आहे. त्यामुळे सकाळच्या टप्प्यात मतदान मोठ्या प्रमाणात होईल, अशी प्रशासनाला व सर्वानाच अपेक्षा होती. मात्र सकाळपासूनच मतदारांमध्ये उदासीनता दिसून आली. शहरातील प्रत्येक केंद्रावर दोन-चार मतदार येऊन मतदान करून जात होते. सकाळी १०, ११ वाजेपर्यंत अशीच स्थिती कायम होती. नागरकरांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण महाकाली प्रभागातील काँग्रेसचे उमेदवार नंदू नागरकर यांच्या घरासमोर त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप नंदू नागरकर यांनी केला. हे कार्यकर्ते रात्री १२.३० वाजताच्या सुमारास नागरकर यांच्या घरासमोर वाहन पार्क करीत असताना पोलिसांनी लाठीने मारहाण केली, असा त्यांचा आरोप आहे. मात्र असा कुठलाच प्रकार घडला नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. अनिल महाराजांना ताब्यात घेतले जटपुरा प्रभागातील भाजपाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी अनिल महाराज हे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार प्रविण पडवेकर यांनी केला. याबाबत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत शहर पोलिसांनी अनिल महाराज यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर काही वेळ चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. बॅनर निघाले; मात्र झेंडे करीत होते प्रचार आदर्श आचार संहिता व निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार १७ एप्रिलला सायंकाळी ६.३० वाजता थांबविण्यात आला. प्रचारावर पायबंद असताना शहरात कोणत्याही उमेदवारांचे वा राजकीय पक्षांचे बॅनर, फ्लेक्स, झेंडे लावण्यात येऊ नये असेही निर्देश आहे. मनपा प्रशासनाने शहरातील चौकाचौकातील व रस्त्यावरी बॅनर, फ्लेक्स काढून टाकले. मात्र काही ठिकाणी राजकीय पक्षांचे झेंडे आज मतदानाच्या दिवशीही फडकत होते. चांदा पब्लिक स्कुलपासून काही अंतरावर एका रस्त्यावरील झाडावर काँग्रेसचा झेंडा फडकत होता तर जनता कॉलेजच्या मागे गरबा ग्राऊंडवर भाजपाचे तीन झेंडे फडकताना दिसून आले.