शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
6
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
7
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
8
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
9
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
10
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
11
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
12
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
13
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
14
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
15
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
16
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
17
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
18
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
19
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
20
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

शालेय पोषण आहार योजनेत राजकारण्यांचा हस्तक्षेप

By admin | Updated: November 17, 2014 22:51 IST

राज्य शासनाने गेल्या काही वर्षांपासून प्राथमिकस्तरावरील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना सुरू केली. परंतु आहार शिजविणारे स्वयंपाकी व मदतनिस हे कोण असावेत, यासाठी राजकीय

जिवती : राज्य शासनाने गेल्या काही वर्षांपासून प्राथमिकस्तरावरील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना सुरू केली. परंतु आहार शिजविणारे स्वयंपाकी व मदतनिस हे कोण असावेत, यासाठी राजकीय नेते हस्तक्षेप करीत आहेत. हे नेते मुख्याध्यापक आणि शिक्षकच नाही तर खुद्द संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या कक्षात शिरून आपल्या मर्जीतील माणसाठी आग्रह धरत आहेत. प्रसंगी दबाव आणताना दिसून येत आहे. ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यातच उद्भवली आहे. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार ही योजना अमंलात आणली. या योजनेला बरीच वर्षे झालीत. नियमानुसार शाळेत अन्न शिजविण्यासाठी स्वयंपाकी व मदतनिस निवडण्याचा अधिकार हा शालेय व्यवस्थापन समितीला असतो. गावात प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून ते दरवर्षी या लोकांना बदलवू शकतात, एवढा अधिकार या समितीला असतो. असे असताना काही गाव पुढारी मात्र यात हस्तक्षेप करुन गावात तणाव निर्माण करण्याचे काम करीत आहेत.गावातील शालेय व्यवस्थापन समितीने निवडलेला व्यक्ती हा सर्वसामान्य असताना एखादा त्याला विरोध करतो. गावपुढाऱ्याकडे जाऊन आपली निवड व्हावी, यासाठी आग्रह धरतो. गावपुढारीसुद्धा त्याचीच बाजू घेऊन संवर्ग विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याशी वाद घालत असतात. एवढेच नाही तर हे लोक जिल्हा परिषद, कामगार कल्याण, येथून बनावट पत्रसुद्धा शाळेला दर दोन दिवसाआड पाठवित असल्याचाही प्रकार उजेडात आला आहे. गेल्या अनेक वर्षांतील प्रकरणांचा निपटारा लावण्यासाठी या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वेळ मिळत नसताना या शालेय पोषण आहार योजनेसंदर्भात पत्र पाठविण्यासाठी त्यांच्याकडे वेळ येतो कुठून, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.विद्यार्थ्यांना दररोज जेवण मिळत असले तरी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, संवर्ग विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना मात्र आमदार, खासदार, जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्याकडून नाहक त्रास होताना दिसून येत आहे. एवढेच नाही तर यामुळे गावातील लोकांमध्येही तणाव निर्माण करण्याचे काम हे राजकारणी करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)