शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

तंटामुक्त समित्यांमध्ये राजकारण

By admin | Updated: January 12, 2016 00:51 IST

गाव विकासाच्या संकल्पनेत गावातील प्रतिष्ठित व वैचारिक लोकांचा भरणा करून आपला गाव आपला विकास, हे ब्रीद साधल्या जाईल,

समन्वय नाही : गावविकासाची संकल्पना पदाधिकाऱ्यांमुळेच रखडलीगुंजेवाही : गाव विकासाच्या संकल्पनेत गावातील प्रतिष्ठित व वैचारिक लोकांचा भरणा करून आपला गाव आपला विकास, हे ब्रीद साधल्या जाईल, असे स्वप्न बघुन स्व. आर.आर. पाटील यांनी पुर्वीच्या लोकपंचायतीच्या आधारावर २२ आॅगस्ट २००७ रोजी तंटामुक्त समितीची संकल्पना मांडली. सदर समितीचे गठन करून यात पारदर्शकता येण्यासाठी अटी व शर्तीचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. मात्र अनेक गावात गठीत करण्यात आलेल्या तंटामुक्त समित्यांमध्ये राजकारण शिरले आहे. सदर समितीचे कामकाज केवळ दारूबंदी व आपसी वाद सोडविण्यापुरतेच मर्यादित ठेवल्याने समित्यांना हेव्यादाव्याचे ग्रहण लागले आहे. त्याच कारणाने गावविकासाची संकल्पना अंमलात आणण्यात समितीचे सदस्य असमर्थ ठरू लागल्याने समितीच असमर्थ दिसून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.वास्तविक सदर समितीवर प्रतिष्ठित व न्यायनिवाळा करण्याच्या प्रक्रियेचा पुरेसा अनुभव असलेल्या समितीची निवड करताना ती व्यक्ती व्यसनाधीन नसावी, गुन्हेगारी स्वरूपाची नसावी अथवा त्याचा कुठल्याही गुन्हेगारीत सहभाग नसावा. तसेच त्याची समाजातील एकुण वागणूक सौजन्यपूर्ण असावी. प्रसंगी समाजहितासाठी घेतलेल्या निर्णयात सहभागी होऊन योग्य ते योगदान देण्याची त्याची तयारी असावी. परंतु समितीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मान ठेवण्याची सदस्यांचीच आडकाठी ठरणार नाही. अशा व्यक्तीचीच या समितीवर निवड करण्यात यावी, अशी अट आहे. निवड समितीने केवळ अवैध धंदे, दारूबंदी किंवा गावातील स्वत:ला नेता समजून स्वत:ची पाठ थोपटणाऱ्या नेत्याच्या मी पणाला बळी न पडता किंवा विरोध म्हणून काम न करता लोकहितासाठी काम करावे. तंटामुक्त समितीचे कामकाज प्रभावी, पारदर्शी व सर्वांना समान न्याय देणारे असावे. गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गावविकासासाठी मारक ठरत असलेल्या गोष्टीचा त्याग करून गावात एक वाक्यात कशी नांदेल, या दिशेने कामकाज करणे गरजेचे आहे. तसा अहवाल संबंधित पोलीस ठाण्याला सादर करून समितीचे काम आणखी समाजभिमुख कसे करता येईल, हा प्रयत्न व्हायला हवा. यापुढे आणखी एक पाऊल टाकत अनेक शासकीय योजना लोकापर्यंत पोहचविण्याचे कार्यही या समित्यांकडून होणे गरजेचे आहे.१५ आॅगस्ट २००७ पासून सदर समितीच्या निर्मितीमुळे संकल्पना प्रत्यक्ष अंमलात येऊन गावागावात आमुलाग्र बदल घडून येतील. परिणामी महसूल व पोलीस विभागावरील ताण कमी होऊन सर्वसामान्यांना कोर्ट कचेऱ्याच्या माराव्या लागणाऱ्या चकरा, अनावश्यक होणारा खर्च, व्यर्थ जाणारा वेळ याची बचत होऊ शकणार आहे. (वार्ताहर)