शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

तंटामुक्त समित्यांमध्ये राजकारण

By admin | Updated: January 12, 2016 00:51 IST

गाव विकासाच्या संकल्पनेत गावातील प्रतिष्ठित व वैचारिक लोकांचा भरणा करून आपला गाव आपला विकास, हे ब्रीद साधल्या जाईल,

समन्वय नाही : गावविकासाची संकल्पना पदाधिकाऱ्यांमुळेच रखडलीगुंजेवाही : गाव विकासाच्या संकल्पनेत गावातील प्रतिष्ठित व वैचारिक लोकांचा भरणा करून आपला गाव आपला विकास, हे ब्रीद साधल्या जाईल, असे स्वप्न बघुन स्व. आर.आर. पाटील यांनी पुर्वीच्या लोकपंचायतीच्या आधारावर २२ आॅगस्ट २००७ रोजी तंटामुक्त समितीची संकल्पना मांडली. सदर समितीचे गठन करून यात पारदर्शकता येण्यासाठी अटी व शर्तीचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. मात्र अनेक गावात गठीत करण्यात आलेल्या तंटामुक्त समित्यांमध्ये राजकारण शिरले आहे. सदर समितीचे कामकाज केवळ दारूबंदी व आपसी वाद सोडविण्यापुरतेच मर्यादित ठेवल्याने समित्यांना हेव्यादाव्याचे ग्रहण लागले आहे. त्याच कारणाने गावविकासाची संकल्पना अंमलात आणण्यात समितीचे सदस्य असमर्थ ठरू लागल्याने समितीच असमर्थ दिसून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.वास्तविक सदर समितीवर प्रतिष्ठित व न्यायनिवाळा करण्याच्या प्रक्रियेचा पुरेसा अनुभव असलेल्या समितीची निवड करताना ती व्यक्ती व्यसनाधीन नसावी, गुन्हेगारी स्वरूपाची नसावी अथवा त्याचा कुठल्याही गुन्हेगारीत सहभाग नसावा. तसेच त्याची समाजातील एकुण वागणूक सौजन्यपूर्ण असावी. प्रसंगी समाजहितासाठी घेतलेल्या निर्णयात सहभागी होऊन योग्य ते योगदान देण्याची त्याची तयारी असावी. परंतु समितीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मान ठेवण्याची सदस्यांचीच आडकाठी ठरणार नाही. अशा व्यक्तीचीच या समितीवर निवड करण्यात यावी, अशी अट आहे. निवड समितीने केवळ अवैध धंदे, दारूबंदी किंवा गावातील स्वत:ला नेता समजून स्वत:ची पाठ थोपटणाऱ्या नेत्याच्या मी पणाला बळी न पडता किंवा विरोध म्हणून काम न करता लोकहितासाठी काम करावे. तंटामुक्त समितीचे कामकाज प्रभावी, पारदर्शी व सर्वांना समान न्याय देणारे असावे. गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गावविकासासाठी मारक ठरत असलेल्या गोष्टीचा त्याग करून गावात एक वाक्यात कशी नांदेल, या दिशेने कामकाज करणे गरजेचे आहे. तसा अहवाल संबंधित पोलीस ठाण्याला सादर करून समितीचे काम आणखी समाजभिमुख कसे करता येईल, हा प्रयत्न व्हायला हवा. यापुढे आणखी एक पाऊल टाकत अनेक शासकीय योजना लोकापर्यंत पोहचविण्याचे कार्यही या समित्यांकडून होणे गरजेचे आहे.१५ आॅगस्ट २००७ पासून सदर समितीच्या निर्मितीमुळे संकल्पना प्रत्यक्ष अंमलात येऊन गावागावात आमुलाग्र बदल घडून येतील. परिणामी महसूल व पोलीस विभागावरील ताण कमी होऊन सर्वसामान्यांना कोर्ट कचेऱ्याच्या माराव्या लागणाऱ्या चकरा, अनावश्यक होणारा खर्च, व्यर्थ जाणारा वेळ याची बचत होऊ शकणार आहे. (वार्ताहर)