शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक संघाच्या निवडणुकीला राजकीय रंग

By admin | Updated: January 16, 2016 01:20 IST

येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या १९ जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणुकीला राजकीय रंग चढत आहे.

चंद्रपूर : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या १९ जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणुकीला राजकीय रंग चढत आहे. या संघाच्या संचालक मंडळासाठी प्रथमच निवडणुका होत असून प्रचार, भेटीगाठी, सभा आणि आरोप-प्रत्यारोपामुळे या निवडणुकीला राजकीय रंग चढत आहे.३ हजार ७६४ सदस्यसंख्या असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये प्रथमच दोन पॅनल उभे ठाकल्याने मतदान पद्धतीने यावेळी निवडणुका होत आहेत. यात एकूण १५ संचालक आहेत. सत्ताधाऱ्यांचे विकास पॅनल आणि विरोधकांचे परिवर्तन पॅनल असे दोन पॅनल रिंगणात उतरले आहेत. या दोन्ही पॅनलने सर्व जागांवर उमेदवार उभे केले असून एक अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवित आहे. त्यामुळे रिंगणातील उमेदवारांची संख्या ३१ झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. पुनमचंद वाकडे काम पहात आहेत.ज्येष्ठ नागरिक संघाच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतानाही २००९ नंतर येथे निवडणुका झालेल्या नाहीत. ही बाब धर्मदाय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी निवडणुकीचे आदेश दिले. या सोबत आर्थिक व्यवहारावरून कार्यकारिणीतील संचालकांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामळे दोन तट पडले. परिणामत: ज्येष्ठ नागरिक संघ प्रथमच निवडणुकीला सामोरा जात आहे. या दोन्ही पॅनलकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. परिवर्तन पॅनल गोपाळराव सातपुते यांच्या नेतृत्वात लढत असून त्यांनी भविष्यात स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासन देण्याचा दावा केला आहे. या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या गटाने सत्ताधाऱ्यांवर आर्थिक स्वरूपाचे आरोप केले. मागील अनेक वर्षात ज्येष्ठ नागरिक संघ वाढविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही वाव दिला जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. संघाच्या घटनेचा अवमान करून आजवर कामकाज चालविण्यात आल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला.दरम्यान, विकास पॅनलनेही शुक्रवारी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडली. विजय चंदावार म्हणाले, ज्येष्ठ नागरिक संघ वाढविण्यासाठी कुणी मेहनत केली हे सर्वांना माहीत आहे. सर्व राजकीय नेत्यांचे सहकार्य घेवून आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाची कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात यावी यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र काही सदस्यांनी धर्मदाय आयुक्तांकडे तक्रारी करून निवडणुकीची मागणी केली. त्यामुळे निवडणूक घ्यावी लागली, असे ते म्हणाले. प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)