शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

ज्येष्ठ नागरिक संघाच्या निवडणुकीला राजकीय रंग

By admin | Updated: January 16, 2016 01:20 IST

येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या १९ जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणुकीला राजकीय रंग चढत आहे.

चंद्रपूर : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या १९ जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणुकीला राजकीय रंग चढत आहे. या संघाच्या संचालक मंडळासाठी प्रथमच निवडणुका होत असून प्रचार, भेटीगाठी, सभा आणि आरोप-प्रत्यारोपामुळे या निवडणुकीला राजकीय रंग चढत आहे.३ हजार ७६४ सदस्यसंख्या असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये प्रथमच दोन पॅनल उभे ठाकल्याने मतदान पद्धतीने यावेळी निवडणुका होत आहेत. यात एकूण १५ संचालक आहेत. सत्ताधाऱ्यांचे विकास पॅनल आणि विरोधकांचे परिवर्तन पॅनल असे दोन पॅनल रिंगणात उतरले आहेत. या दोन्ही पॅनलने सर्व जागांवर उमेदवार उभे केले असून एक अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवित आहे. त्यामुळे रिंगणातील उमेदवारांची संख्या ३१ झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. पुनमचंद वाकडे काम पहात आहेत.ज्येष्ठ नागरिक संघाच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतानाही २००९ नंतर येथे निवडणुका झालेल्या नाहीत. ही बाब धर्मदाय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी निवडणुकीचे आदेश दिले. या सोबत आर्थिक व्यवहारावरून कार्यकारिणीतील संचालकांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामळे दोन तट पडले. परिणामत: ज्येष्ठ नागरिक संघ प्रथमच निवडणुकीला सामोरा जात आहे. या दोन्ही पॅनलकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. परिवर्तन पॅनल गोपाळराव सातपुते यांच्या नेतृत्वात लढत असून त्यांनी भविष्यात स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासन देण्याचा दावा केला आहे. या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या गटाने सत्ताधाऱ्यांवर आर्थिक स्वरूपाचे आरोप केले. मागील अनेक वर्षात ज्येष्ठ नागरिक संघ वाढविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही वाव दिला जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. संघाच्या घटनेचा अवमान करून आजवर कामकाज चालविण्यात आल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला.दरम्यान, विकास पॅनलनेही शुक्रवारी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडली. विजय चंदावार म्हणाले, ज्येष्ठ नागरिक संघ वाढविण्यासाठी कुणी मेहनत केली हे सर्वांना माहीत आहे. सर्व राजकीय नेत्यांचे सहकार्य घेवून आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाची कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात यावी यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र काही सदस्यांनी धर्मदाय आयुक्तांकडे तक्रारी करून निवडणुकीची मागणी केली. त्यामुळे निवडणूक घ्यावी लागली, असे ते म्हणाले. प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)