शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

तंटामुक्त समितीला राजकारण अडसर

By admin | Updated: October 6, 2014 23:10 IST

१५ आॅक्टोबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय कार्यकर्ते आपलाच उमेदवार

हरदोना : १५ आॅक्टोबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय कार्यकर्ते आपलाच उमेदवार कसा सरस आहे. हे गावातील नागरिकांना पटवून देत आहे. उमेदवारही मतदार राजापर्यंत ‘डोअर टू डोअर’ प्रचार करीत आहे. मात्र गावात शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी राजकारण आणि दारू तंटामुक्त समितीला अडसर ठरत आहे.विधानसभा निवडणूकांचा सावत्रिक कार्यक्रम जाहिर झाल्यापासून निवडणुकांचे पडघम वाजयला सुरुवात झाली. सर्वच राजकीय पक्ष आपला उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी गणित जुळवित आहे.निवडणूक आठवड्याभरावर आली आहे. उमेदवारांना मतदार राजापर्यंत पोहचायला मोठी कसरत करावी लागत आहे. यावेळी राजकीय पक्षांकडून मतदारांना विविध आमिष दाखवून आपलेसे करण्यात राजकीय कार्यकर्ते गुंतले आहे. पाच वर्षात कधी गावात न पोहचलेले उमेदवार आता मतदारांच्या घरापर्यंत पोहचत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष, कार्यकर्ते सकाळपासूनच गावात फिरत आहे. गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणूक काळात तंटामुक्त गाव समित्यांना सक्रिय राहणे गरजेचे आहे. निवडणुकी दरम्यान गावातील शांततेचा सारीपाट बदलत असतो. गावागावात राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. अनेक जण पूर्णवेळ प्रचारात गुंतले आहे. असले तरी मतदार राजानी आता सावध राहणे तेवढेच गरजेचे आहे. निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मतदारांना आपले करण्यासाठी राजकीय कार्यकर्ते कामाला लागले आहे. अनेकांनी आमिषेही दाखविले आहे. मतदारांना भूल पाडण्यासाठी अनेक मार्ग शोधण्यात कार्यकर्ते मग्न आहे. त्यामुळे काही राजकीय कार्यकर्त्यांमुळे गावातील शांतता व सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तंटामुक्त गाव समितीला कोणतेही राजकीय वलय न लागता कोणताही निर्णय घेतात दुसऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.गावागावातील तंटामुक्त गाव समित्यांनी निवडणूक काळात सक्रिय राहण्याची गरज सध्या आहे. निवडणूकीदरम्यान गावातील राजकारण आणि दारू तंटामुक्त समितीला अडसर ठरु शकते. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम आता खऱ्या अर्थाने तंटामुक्त समित्यांकडे आले आहे. त्यामुळे तंटामुक्त समितीने कोणत्याही आमिषाला बळी न पडता गावात काम करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)