शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त समितीला राजकारण अडसर

By admin | Updated: October 6, 2014 23:10 IST

१५ आॅक्टोबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय कार्यकर्ते आपलाच उमेदवार

हरदोना : १५ आॅक्टोबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय कार्यकर्ते आपलाच उमेदवार कसा सरस आहे. हे गावातील नागरिकांना पटवून देत आहे. उमेदवारही मतदार राजापर्यंत ‘डोअर टू डोअर’ प्रचार करीत आहे. मात्र गावात शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी राजकारण आणि दारू तंटामुक्त समितीला अडसर ठरत आहे.विधानसभा निवडणूकांचा सावत्रिक कार्यक्रम जाहिर झाल्यापासून निवडणुकांचे पडघम वाजयला सुरुवात झाली. सर्वच राजकीय पक्ष आपला उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी गणित जुळवित आहे.निवडणूक आठवड्याभरावर आली आहे. उमेदवारांना मतदार राजापर्यंत पोहचायला मोठी कसरत करावी लागत आहे. यावेळी राजकीय पक्षांकडून मतदारांना विविध आमिष दाखवून आपलेसे करण्यात राजकीय कार्यकर्ते गुंतले आहे. पाच वर्षात कधी गावात न पोहचलेले उमेदवार आता मतदारांच्या घरापर्यंत पोहचत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष, कार्यकर्ते सकाळपासूनच गावात फिरत आहे. गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणूक काळात तंटामुक्त गाव समित्यांना सक्रिय राहणे गरजेचे आहे. निवडणुकी दरम्यान गावातील शांततेचा सारीपाट बदलत असतो. गावागावात राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. अनेक जण पूर्णवेळ प्रचारात गुंतले आहे. असले तरी मतदार राजानी आता सावध राहणे तेवढेच गरजेचे आहे. निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मतदारांना आपले करण्यासाठी राजकीय कार्यकर्ते कामाला लागले आहे. अनेकांनी आमिषेही दाखविले आहे. मतदारांना भूल पाडण्यासाठी अनेक मार्ग शोधण्यात कार्यकर्ते मग्न आहे. त्यामुळे काही राजकीय कार्यकर्त्यांमुळे गावातील शांतता व सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तंटामुक्त गाव समितीला कोणतेही राजकीय वलय न लागता कोणताही निर्णय घेतात दुसऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.गावागावातील तंटामुक्त गाव समित्यांनी निवडणूक काळात सक्रिय राहण्याची गरज सध्या आहे. निवडणूकीदरम्यान गावातील राजकारण आणि दारू तंटामुक्त समितीला अडसर ठरु शकते. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम आता खऱ्या अर्थाने तंटामुक्त समित्यांकडे आले आहे. त्यामुळे तंटामुक्त समितीने कोणत्याही आमिषाला बळी न पडता गावात काम करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)