शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

शहीद भूमीतील पोलिसांची कसरत

By admin | Updated: February 13, 2015 01:32 IST

चिमूर ही शहिदांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. या भूमीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी तपश्चर्या करुन इंग्रजांच्या विरोधात आवाज उठविला आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

संजय वरघने  चिमूरचिमूर ही शहिदांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. या भूमीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी तपश्चर्या करुन इंग्रजांच्या विरोधात आवाज उठविला आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या चिमूर तालुक्यातील गावांमध्ये शांततामय वातावरण राहावे म्हणून राष्ट्रसंतानी गावागावात गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली आणि गावात सर्व जातीधर्माचे नागरिक एकत्र राहून गुणागोविंदाने राहत आहेत. चिमूर तालुक्यात एकूण २६२ गावांचा समावेश असून ९८ ग्रामपंचायती आहेत. चिमूर शहराची लोकसंख्या ३५ ते ४० हजारच्या जवळपास आहे. चिमूर तालुक्यात चिमूर पोलीस ठाणे व भिसी पोलीस ठाणे येत असून नेरी व शंकरपूर येथे पोलीस चौकी आहे. चिमूर पोलीस ठाणे अतिसंवेदनशील ठाणे म्हणून ओळखले जाते. चिमूरचे पोलीस ठाणे इंग्रजकालीनचिमूर ही शहीदांची भूमी असून देशाला स्वातंत्र मिळविण्यासाठी इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारले. यो पोलीस ठाण्याची स्थापना १९४७ साली झाली. तेव्हापासून हे ठाणे येथे अस्तित्वात आहे. चिमूर परिसरात इंग्रजांचे पोलीस इन्स्पेक्टर जरासंध व एसडीपीओ डुंगाजी यांची हत्या करण्यात आली. इंग्रजांना चिमूरकरांनी त्यावेळी ‘सळो की पळो’ करुन सोडले. भारतमातेला स्वातंत्र मिळवून देण्यात चिमूरचा सिंहाचा वाटा आहे. ठाणे व वसाहत समस्यांच्या विळख्यातचिमूर पोलीस ठाणे हे इंग्रजकालीन असल्यामुळे सदर इमारत ही जीर्ण अवस्थेत उभी आहे. पावसाळ्याच्या दिवसात या ईमारतीला गळती लागले. त्यावर येथील कर्मचारी आपल्या निधीतून प्लॉस्टिक टाकून कसे कसे जीव मुठीत घेवून दिवस काढत आहेत. तसेच पोलीस वसाहतीची अवस्था वेगळी नाही. पोलीस ज्या क्वॉर्टरमध्ये राहतात. ते जिर्ण झाले असल्याने पोलिसांना निवासाची समस्या आहे. पोलीस कर्मचारी आपले कुटुंब घेवून त्याच जिर्ण क्वॉर्टरमध्ये राहत आहेत. काही भाड्याच्या खोलीत दिवस काढत आहेत. धार्मिक व पर्यटन स्थळचिमूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ताडोबा व्याघ्र प्रकल्प, रामदेगी देवस्थान, राष्ट्रसंताची तपोभूमी गोंदेडा, जोगामोगा देवस्थान, मुक्ताई देवस्थान, भिसी व नेरी येथील हेमाडपंथी मंदिर, चिमूरातील श्रीहरी बालाजी देवस्थानात वर्षभर भक्तांची गर्दी असते. तसेच गोंदेडा यात्रा व चिमूरची बालाजी महाराजांची घोडायात्रेत अनेक यात्रेकरु दर्शनाला येत असल्याने पोलिसांना कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.वादविवादातून होतात हत्याचिमूर तालुक्यात शेतीचा वाद, छोटे मोठे वाद विकोपाला जाऊन त्याचे रुपांतर खुनाच्या घटनेत होण्याचे प्रकार अनेकदा घडले. खडसंगी, तळोधी नाईक, वडाळा पैकु, नेरी परिसरात व चिमूरातही खुनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. लोकसंख्या व पोलीस बळचिमूर तालुक्याची लोकसंख्या अंदाजे दिड लाखाच्या जवळपास असून या तालुक्यात २६२ गावांचा व ९८ ग्रामपंचायतीचा समावे आहे. मात्र त्या प्रमाणात चिमूर ठाण्याला फक्त ५४ पोलीस कर्मचारी व ५ अधिकारी असल्याने पोलीस प्रशासनासमोर सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चिमुरात चोरीच्या प्रमाणात वाढ नुकतेच चिमूर येथील राज्य महामार्गावरील वडाळा गावात तीन ते चार दुकान फोडून मुद्देमालासह व काही वस्तु चोरुन नेल्याचा घटना घडल्यात. यासोबतच शहरातील गुरुदेव ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे कार्यालय अज्ञात चोरट्यांनी फोडून अंदाजे दोन लाख रुपये पळवून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे.