शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा चोरीत पोलीस व वेकोलि अधिकाऱ्यांचाच हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:15 IST

कोरपना तालुक्यातील पैनगंगा कोळसा खाणीतून सशस्त्र सहा ट्रकद्वारे कोळसा चोरून नेला. या घटनेला पाच दिवस लोटूनही एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. या प्रकरणात वेकोलि अधिकारी आणि पोलीस अधिकारी गुंतले असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : सीबीआय चौकशी करावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरपना तालुक्यातील पैनगंगा कोळसा खाणीतून सशस्त्र सहा ट्रकद्वारे कोळसा चोरून नेला. या घटनेला पाच दिवस लोटूनही एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. या प्रकरणात वेकोलि अधिकारी आणि पोलीस अधिकारी गुंतले असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीमधून मोठ्या प्रमाणावर कोळसा चोरी होत आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई होत नाही, याकडे लक्ष वेधून चोरीच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केली. जिल्ह्यात केंद्रीय सुरक्षा दल तैनात असताना अशाप्रकारची चोरी होत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या चोरी दडण्यामागे वेकोलि व पोलीस प्रशासनाला शासनाचे पाठबळ असल्याशिवाय हे शक्य नाही. पैनगंगा कोळसा खाणीतून दररोज १० ट्रक कोळशाची चोरी होत आहे. ही चोरी नियमित होत असल्यामुळे सशस्त्र चोरीचे धाडस करण्यात आल्याचा आरोपही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केला.यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) प्रकाश देवतळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीश कोतावार, माजी जिल्हाध्यक्ष शिवाराव, शहर काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्ष तथा नगरसेविका सुनिता अग्रवाल, माजी नगरसेवक राजेश अड्डूर, रशीद शेख आदी उपस्थित होते.प्रकल्पग्रस्तांच्या खात्यात आरटीजीएसद्वारे मोबदला जमा करावेकोलि प्रकल्पग्रस्तांना धनादेशाद्वारे रक्कम दिली जात असल्यामुळे अनेकजण अद्यापही यापासून वंचित आहे. हा वाटप किती काळ चालेल, हे कळायला मार्ग नाही. शासनाने धनादेशाद्वारे प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यापेक्षा सदर रक्कम त्यांच्या खात्यात एकाचवेळी आरटीजीएसद्वारे जमा करावी, अशी मागणीही आ. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.घटनेने उडाली होती खळबळशनिवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास हायवा ट्रकसह ३० ते ४० जण वेकोलिच्या वणी क्षेत्रातील पैनगंगा कोळसा खाणीत सशस्त्र घुसले होते. मायनिंग सरदारच्या गळ्यावर तलवार ठेवून खाण लुटली होती.