शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

कोळसा चोरीत पोलीस व वेकोलि अधिकाऱ्यांचाच हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:15 IST

कोरपना तालुक्यातील पैनगंगा कोळसा खाणीतून सशस्त्र सहा ट्रकद्वारे कोळसा चोरून नेला. या घटनेला पाच दिवस लोटूनही एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. या प्रकरणात वेकोलि अधिकारी आणि पोलीस अधिकारी गुंतले असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : सीबीआय चौकशी करावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरपना तालुक्यातील पैनगंगा कोळसा खाणीतून सशस्त्र सहा ट्रकद्वारे कोळसा चोरून नेला. या घटनेला पाच दिवस लोटूनही एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. या प्रकरणात वेकोलि अधिकारी आणि पोलीस अधिकारी गुंतले असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीमधून मोठ्या प्रमाणावर कोळसा चोरी होत आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई होत नाही, याकडे लक्ष वेधून चोरीच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केली. जिल्ह्यात केंद्रीय सुरक्षा दल तैनात असताना अशाप्रकारची चोरी होत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या चोरी दडण्यामागे वेकोलि व पोलीस प्रशासनाला शासनाचे पाठबळ असल्याशिवाय हे शक्य नाही. पैनगंगा कोळसा खाणीतून दररोज १० ट्रक कोळशाची चोरी होत आहे. ही चोरी नियमित होत असल्यामुळे सशस्त्र चोरीचे धाडस करण्यात आल्याचा आरोपही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केला.यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) प्रकाश देवतळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीश कोतावार, माजी जिल्हाध्यक्ष शिवाराव, शहर काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्ष तथा नगरसेविका सुनिता अग्रवाल, माजी नगरसेवक राजेश अड्डूर, रशीद शेख आदी उपस्थित होते.प्रकल्पग्रस्तांच्या खात्यात आरटीजीएसद्वारे मोबदला जमा करावेकोलि प्रकल्पग्रस्तांना धनादेशाद्वारे रक्कम दिली जात असल्यामुळे अनेकजण अद्यापही यापासून वंचित आहे. हा वाटप किती काळ चालेल, हे कळायला मार्ग नाही. शासनाने धनादेशाद्वारे प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यापेक्षा सदर रक्कम त्यांच्या खात्यात एकाचवेळी आरटीजीएसद्वारे जमा करावी, अशी मागणीही आ. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.घटनेने उडाली होती खळबळशनिवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास हायवा ट्रकसह ३० ते ४० जण वेकोलिच्या वणी क्षेत्रातील पैनगंगा कोळसा खाणीत सशस्त्र घुसले होते. मायनिंग सरदारच्या गळ्यावर तलवार ठेवून खाण लुटली होती.