शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

मृतदेहासह पोलीस चौकीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:30 IST

अपघातात जखमी महिलेचा आठ दिवसांनी मृत्यू झाला. पण आरोपीवर पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्यामुळे व वाहन ताब्यात घेताना हेराफेरी केल्यामुळे संतप्त झालेले नातेवाईक मृतदेह घेऊन शंकरपूर पोलीस चौकीवर धडकले.

ठळक मुद्देचार तास ठिय्या : अपघातानंतर योग्य कारवाई न केल्याचा आरोप

आॅनलाईन लोकमतशंकरपूर : अपघातात जखमी महिलेचा आठ दिवसांनी मृत्यू झाला. पण आरोपीवर पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्यामुळे व वाहन ताब्यात घेताना हेराफेरी केल्यामुळे संतप्त झालेले नातेवाईक मृतदेह घेऊन शंकरपूर पोलीस चौकीवर धडकले. जोपर्यंत योग्य कारवाई होत नाही, तोपर्यंत प्रेत न उचलण्याचा निर्णय घेतल्याने पोलीस विभागाची चांगली तारांबळ उडाल्याची घटना रविवारी घडला.अखेर पोलीस उपअधीक्षक यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून मागण्या मान्य केल्यानंतर चार तासानंतर प्रेत उचलण्यात आले. २२ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता पार्वती कवडू चौधरी (६५) ही महिला भाजीपाला विकून घरी जात असताना भवानी चौकात भरधाव येणाºया दुचाकी वाहनाची त्यांना धडक बसली. सदर दुचाकी वाहन मनोज मेश्राम चालवित होता, त्याच्यासोबत दुसरा एक व्यक्ती बसला होता.जखमी महिलेला तत्काळ शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर नागपूरला हलविण्यात आले. मात्र रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास पार्वती चौधरी यांचा मृत्यू झाला. मात्र आरोपीवर योग्य कारवाई न झाल्याने महिलेचे प्रेत शवविच्छेदनानंतर थेट पोलीस चौकीत आणण्यात आले.आरोपीवर योग्य कारवाई न करता अपघातातील वाहनाची हेराफेरी केली. वेळोवेळी चुकीची माहिती पोलीस विभागाने नातेवाईकांना दिल्याचा आरोप माना समाजाच्या नेत्यांनी केला. चार तास नातेवाईकांनी पोलीस चौकीत ठिय्या केल्यानंतर शिष्टमंडळाशी पोलीस उपअधीक्षक परदेशी यांनी चर्चा केली. त्यानंतर नातेवाईकांनी प्रेत उचलले. यावेळी जि.प. सदस्य डॉ. सतिश वारजूकर यांनी मृताच्या कुटुंबीयांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत दिली.चार पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदलीया प्रकरणात कारवाईत कसूर केल्याप्रकरणी शंकरपूर पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सोनकुसरे, पठाण, चाफले व नंदूरकर यांची तडाफडकी बदलीचे आदेश काढण्यात आले आहे.