शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आधार पडताळणीच्या नावावर लूट

By admin | Updated: February 11, 2016 01:28 IST

नागरिकांची ओळख पटविण्याचे साधन म्हणून आधार कार्डची योजना कार्यान्वित केली व नंतर या आधार कार्डवर शासनाने सर्वसामान्यांना अनेक सवलतीकरिता आधार कार्ड अनिवार्य केले.

अनेक गावांत कॅम्प : प्रति आधार कार्ड ३० रुपयांची वसुलीखडसंगी : नागरिकांची ओळख पटविण्याचे साधन म्हणून आधार कार्डची योजना कार्यान्वित केली व नंतर या आधार कार्डवर शासनाने सर्वसामान्यांना अनेक सवलतीकरिता आधार कार्ड अनिवार्य केले. त्यामुळे प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे. याच आधार कार्डचे व्हेरीफिकेशन करण्याच्या नावावर चंद्रपूर येथील एका अ‍ॅकडमीकडून प्रति कार्ड ३० रुपये प्रमाणे वसूली केली जात आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा प्रकार सुरू आहे.आधार कार्ड सर्व नागरिकांना मोफत देण्यात आले आहे. आधार कार्ड काढण्यासाठी शासनाने नेमून दिलेल्या एजन्सीकडून काढण्यात आले. मात्र काही नागरिक, विद्यार्थी आधार कार्डपासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी शासनाच्या महाआॅनलाईन केंद्रातून आजही आधारकार्ड काढणे सुरू आहे.आधार कार्ड सर्वसामान्यांच्या राशन कार्ड, गॅस सबसिडी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, केरोसीन आदी सवलतीसाठी ग्रामीण जनतेला उपयोगी येत आहे. त्यामुळे आधार कार्डबाबत मोठी उत्सुकता आहे. मात्र आधार कार्डचे व्हेरीफिकेशन करण्याच्या नावावर चिमूर तालुक्यात सचिन करिअर अकॅडमी चंद्रपूरच्यावतीने गावागावांत जाऊन प्रत्येक नागरिकांकडून ३० रुपये घेण्यात येत आहेत. याबाबत काही नागरिकांनी या बाबतचे परिपत्रक किंवा शासनाच्या आदेश दाखवा म्हटले, तेव्हा त्यांनी जे पेपर दाखविले ते बनावट असल्याचा संशय काही नागरिकांनी व्यक्त केला. तेव्हा याबाबत महाआॅनलाईनचे संचालक यांच्याशी संपर्क केला असता, असा कुठलाही कार्यक्रम शासनाकडून आला नसल्याचे सांगितले.सचिन कॅरिअर अकॅडमीचे कार्यकर्ते आल्यानंतर प्रथम ग्रामपंचायत सरपंच पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत असून सरपंचाना ते पत्र दाखवून हा गोरखधंदा करीत आहेत. काही गावातील सरपंचाने याबाबत महसूल विभागाची विचारणा केली व असा कार्यक्रम शासनाचा नाही, असे सांगून हा कार्यक्रम राबविण्यात मज्जाव केला. मात्र काही गावातील सरपंचानी त्या प्रकाराची कुठलीही सत्यता न तपासता हा प्रकार सुरू केला आहे. नागरिकाची अशा प्रकारे होणारी लूट उघड्या डोळ्यांनी सरपंच व पदाधिकारी बघत आहेत. तेव्हा पुढारी हे गावकऱ्याचे प्रतिनिधी की, अशा बोगस एजन्सीचे, असा सवाल गावकरी करीत आहेत.चिमूर तालुक्यात आधारकार्ड व्हेरीफिकेशनचा कार्यक्रम खरोखखरच शासनाचा आहे की, बनावट याची सत्यता जनतेपुढे आणण्यासाठी महसूल विभागाने चौकशी करत या बोगस प्रकारावर आळा घालून जनतेची लूट थांबविण्याची मागणी अनेक गावातील नागरिकांनी केली आहे. त्यामुळे प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)