शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जनकापुरातील अड्याळमेंढा तलावाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST

नादुरुस्त तलाव गेटमुळे शेतकऱ्यांना अडचण : पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष सावरगाव : नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील अड्याळमेंढा तलावाचे गेट नादुरुस्त ...

नादुरुस्त तलाव गेटमुळे शेतकऱ्यांना अडचण : पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

सावरगाव : नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील अड्याळमेंढा तलावाचे गेट नादुरुस्त असल्याने तलावाच्या दुर्दशेमुळे येथील शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे.

परिणामी, दुबार पीक घेण्यास असमर्थ ठरत आहे.

येथील शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व पारंपरिक व्यवसाय आहे. गावातील अनेक कुटुंबे शेती हा व्यवसाय करूनच त्यांची उपजीविका करतात. शिवाय, या व्यवसायावरच आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधतात. या गावाच्या शिवारात जवळपास तीन तलाव आहेत. या तिन्ही मोठ्या तलावांमुळे परिसरातील शेतकरी हजारो हेक्टरवर खरीप आणि रब्बी पिके घेत असतात. परंतु, जनकापूर येथील अड्याळमेंढा तलावाची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे येथील शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे आणि पीक घेण्यास असमर्थ ठरत आहे. सदर तलावाच्या पाण्याने अंदाजे ५०० हेक्टरवरील शेती दुबार सिंचित केली जाते. तलावात गावातील मच्छीमार सोसायटीमार्फत मत्स्य व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, मागील जवळपास तीन ते चार वर्षांपासून या तलावाच्या गेटच्या लोखंडी पाट्या पूर्णपणे जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे मागील काळात प्रचंड पर्जन्यवृष्टी होऊनसुद्धा तलावाच्या पाण्याची पातळी शून्यावर आली आहे.

भौगोलिकदृष्ट्या बघितले तर सदर तलावाभोवती सुंदर वनराई नटलेली आहे आणि सभोवतालच्या परिसरात वन्यप्राण्यांचा सारखा व बारमाही वावर असतो. येथे बिबटे, अस्वल, पट्टेदार वाघ, रानगवा, हरीण, सांबर, चितळ आदी लहानमोठे प्राणी आणि मोठे हिंस्र प्राणीसुद्धा येथे बघायला मिळतात. या बाबीचा शासनाने विचार करणे गरजेचे आहे.

बॉक्स

वारंवार दिली निवेदने, मात्र उपयोग नाही

या संदर्भात गेट दुरुस्ती करण्याकरिता लाभधारक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग, सिंचाई शाखा नागभीड आणि सिंदेवाही विभागाला वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र, त्यांना सदर विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर अधिकारीवर्ग प्रचंड उदासीन का, असा गहन प्रश्न निर्माण होत आहे.

बॉक्स

मत्स्य व्यवसाय डबघाईस

गेटच्या नादुरुस्तीमुळे शेतकरीवर्गाला दरवर्षी पिकाच्या तोंडी आलेल्या घासाला मुकावे लागत आहे. तसेच तलावातील पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर असल्याने मच्छीमार सोसायटीचा मत्स्य व्यवसायसुद्धा डबघाईस आला आहे. दरम्यान, संबंधित पाटबंधारे विभागाच्या सिंचाई शाखेने या बाबीची गंभीर दखल घेऊन तलावाच्या गेटची तत्काळ दुरुस्ती करून देण्यात यावी, अशी मागणी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मदास शेंडे व लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे.

कोट

जनकापुरातील अड्याळमेंढा तलावाची अवस्था अत्यंत वाईट आहे. गेट सुरळीत नसल्याने पाणी आटण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, लाभार्थी शेतकरी दुबार पीक घेण्यापासून मुकले आहेत.

- ब्रह्मादास शेंडे,

युवा सामाजिक कार्यकर्ते,

जनकापूर