शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

सुधीर मुनगंटीवार यांना निवडून द्या

By admin | Updated: October 11, 2014 01:30 IST

विधानसभेत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज बुलंद करणारा कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्रात विशेष ओळख ..

चंद्रपूर : विधानसभेत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज बुलंद करणारा कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्रात विशेष ओळख निर्माण करणारे सुधीर मुनगंटीवार हे खरे लोकनेते आहे. विकास कामांची मोठी मालिका तयार करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी संसदीय संघर्षाच्या माध्यमातून अनेक लोकहिताचे निर्णय घेण्यास शासनाला भाग पाडले आहे. आदर्श आमदार कसा असावा, याचे उत्तम उदाहरण मुनगंटीवार आहेत. लोकशाही सुदृढ करण्याच्या दृष्टीने सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे आमदार निवडून जाणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड यांनी केले. ९ आॅक्टोबर रोजी चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर येथे आयोजित जाहीर सभेत डॉ. निशीगंधा वाड बोलत होत्या. विधानसभेत उपेक्षित, वंचितांचा आवाज बुलंद करताना त्यांनी समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक या सर्व क्षेत्रातील प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी संसदीय कौशल्य पणाला लावले आहे. नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करीत वचनाला जागणारा नेता अशी आपली ओळख सुधीर मुनगंटीवार यांनी निर्माण केली आहे. त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करुन पुन्हा सर्व सामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी विधानसभेत पाठवावे, असे आवाहन डॉ. निशीगंधा वाड यांनी केले.यावेळी मंचावर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा वनिता कानडे, भाजपा चंद्रपूर महानगर सरचिटणीस रामपाल सिंह, जि.प. सदस्य शांताराम चौखे, हनुमान काकडे, लोकचंद कापगते, रंजना किन्नाके, माला रामटेके, सविता नवले, विलास टेंभुर्णे, हंसराज राजपुरे, दुर्गापूरच्या सरपंच सविता चंदनगोले, स्मिता नंदनवार आदी भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना भाजपा नेते रामपाल सिंह म्हणाले, विकास कसा असावा आणि विकासाभिमुख आमदार कसा असावा, याचा उत्तम आदर्श सुधीर मुनगंटीवारांनी निर्माण केला आहे. सुधीर मुनगंटीवारांसारखे लोकनेते आमचे आमदार आहेत, हे आमचे भाग्य आहे. या मतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी सुधीर मुनगंटीवार पुन्हा निवडून येणे गरजेचे असल्याचे रामपाल सिंह म्हणाले.यावेळी वनिता कानडे, शांताराम चौधरे आदींची भाषणे झालीत. सभेचे संचालन हनुमान काकडे यांनी केले. या सभेनंतर डॉ. निशीगंधा वाड यांनी बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे), विसापूर आणि बल्लारपूर शहरातील गांधी पुतळ्याजवळ आयोजित जाहीर सभांना संबोधित केले. नागरिकांची प्रचंड उपस्थिती होती. अनेकांनी निशीगंधा वाड यांच्याशी बातचितही करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांचा उत्साह बघून त्या आनंदल्या. (शहर प्रतिनिधी)