शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

सुधीर मुनगंटीवार यांना निवडून द्या

By admin | Updated: October 11, 2014 01:30 IST

विधानसभेत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज बुलंद करणारा कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्रात विशेष ओळख ..

चंद्रपूर : विधानसभेत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज बुलंद करणारा कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्रात विशेष ओळख निर्माण करणारे सुधीर मुनगंटीवार हे खरे लोकनेते आहे. विकास कामांची मोठी मालिका तयार करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी संसदीय संघर्षाच्या माध्यमातून अनेक लोकहिताचे निर्णय घेण्यास शासनाला भाग पाडले आहे. आदर्श आमदार कसा असावा, याचे उत्तम उदाहरण मुनगंटीवार आहेत. लोकशाही सुदृढ करण्याच्या दृष्टीने सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे आमदार निवडून जाणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड यांनी केले. ९ आॅक्टोबर रोजी चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर येथे आयोजित जाहीर सभेत डॉ. निशीगंधा वाड बोलत होत्या. विधानसभेत उपेक्षित, वंचितांचा आवाज बुलंद करताना त्यांनी समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक या सर्व क्षेत्रातील प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी संसदीय कौशल्य पणाला लावले आहे. नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करीत वचनाला जागणारा नेता अशी आपली ओळख सुधीर मुनगंटीवार यांनी निर्माण केली आहे. त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करुन पुन्हा सर्व सामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी विधानसभेत पाठवावे, असे आवाहन डॉ. निशीगंधा वाड यांनी केले.यावेळी मंचावर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा वनिता कानडे, भाजपा चंद्रपूर महानगर सरचिटणीस रामपाल सिंह, जि.प. सदस्य शांताराम चौखे, हनुमान काकडे, लोकचंद कापगते, रंजना किन्नाके, माला रामटेके, सविता नवले, विलास टेंभुर्णे, हंसराज राजपुरे, दुर्गापूरच्या सरपंच सविता चंदनगोले, स्मिता नंदनवार आदी भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना भाजपा नेते रामपाल सिंह म्हणाले, विकास कसा असावा आणि विकासाभिमुख आमदार कसा असावा, याचा उत्तम आदर्श सुधीर मुनगंटीवारांनी निर्माण केला आहे. सुधीर मुनगंटीवारांसारखे लोकनेते आमचे आमदार आहेत, हे आमचे भाग्य आहे. या मतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी सुधीर मुनगंटीवार पुन्हा निवडून येणे गरजेचे असल्याचे रामपाल सिंह म्हणाले.यावेळी वनिता कानडे, शांताराम चौधरे आदींची भाषणे झालीत. सभेचे संचालन हनुमान काकडे यांनी केले. या सभेनंतर डॉ. निशीगंधा वाड यांनी बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे), विसापूर आणि बल्लारपूर शहरातील गांधी पुतळ्याजवळ आयोजित जाहीर सभांना संबोधित केले. नागरिकांची प्रचंड उपस्थिती होती. अनेकांनी निशीगंधा वाड यांच्याशी बातचितही करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांचा उत्साह बघून त्या आनंदल्या. (शहर प्रतिनिधी)