शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

झाडीपट्टी नाटकातील भूमिका साकारणे, हे आव्हानच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:02 IST

झाडीपट्टी नाटकांना शंभर वर्षांपूर्वीपासूनची परंपरा आहे आणि ही परंपरा झाडीपट्टीतील कलावंत आजही जोपासत आहेत.

ठळक मुद्देमकरंद अनासपुरे : मराठी कलावंताची ‘लोकमत’शी बातचित

राजकुमार चुनारकर।आॅनलाईन लोकमतचिमूर : झाडीपट्टी नाटकांना शंभर वर्षांपूर्वीपासूनची परंपरा आहे आणि ही परंपरा झाडीपट्टीतील कलावंत आजही जोपासत आहेत. तुम्ही कुठेही काम करीत असाल तर तुम्हाला कलाकार म्हणून स्वत:ला तपासणे गरजचे आहे. चित्रपटांमध्ये तशी संधी राहत नाही. कारण सिनेमामध्ये ‘रिटेक’ असतो. मात्र नाटकात अखंड काम करावे लागते व नाटकात रिटेक नसतो. त्यामुळे झाडीपट्टीतील नाटकात भूमिका साकारणे हे कलाकारांपुढे आव्हान असते, असे मत मराठी सिनेमातील कलावंत मकरंद अनासपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.चिमूर तालुक्यातील नेरी येथे आयोजित ‘गद्दार’ नाटकात ‘नाम्या’ ची भूमिका मकरंद अनासपुरे यांनी साकारली होती. नाटकाच्या मध्यंतरात त्यांना गाठून त्यांची प्रस्तुत प्रतिनिधीने बातचित केली. मराठी चित्रपटसृष्टीत व ‘नाम फाऊंडेशन’ संस्थेच्या कार्याने पूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असणारे मकरंद अनासपुरे म्हणाले, सगळ्याच भागातील चित्रपट बनले आहेत. आता झाडीपट्टीतील विषयांवर चित्रपट बनायला हवा. झाडीपट्टी रंगभूमीतील अडचणी मी स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून मांडणार आहे व मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने ते झाडीपट्टीला न्याय देतील. सगळ्याच ग्रामीण भाषेत गोडवा आहे. त्यामुळे ती भाषा मंचावर येणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला तर शेतकºयांच्या समस्या राहणार नाही व आत्महत्याही होणार नाही. सरकार शेतकऱ्यांना भाव देत नाही.त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी आहे. शेतकरीही स्वाभिमानी आहेत. गरज नसल्यास ते कर्ज घेत नाही. मात्र परिस्थितीमुळे शेतकरी कर्ज घेतो व कर्जापायी आत्महत्या करतो.मात्र सामाजिक बांधीलकी म्हणून ‘नाम’ फाऊंडेशनद्वारे शेतकºयांसाठी काही प्रमाणात काम केले जात आहे. नाम फाऊंडेशन कुणावर टिका किंवा प्रसिद्धीसाठी काम करीत नाही. नाम फाऊंडेशन शेतकरी, विधवा, वीर सैनिकांसाठी काम करते. त्यामध्ये शेतकºयांना १५ हजार तर शहीद सैनिकांना २ लाख ५० हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे.‘नाम’ द्वारे जलसंघटनांचेही कामे केली जात आहेत. १२८ गावात नद्या, तलाव, कालवे खोलीकरणाचे काम केलेत.नक्षलग्रस्त गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा नाम फाऊंडेशनचे काम सुरू करणार आहोत. सगळ्यांनी माणुसकीचा विचार केल्यास या संघटनांना काम करण्याची गरज भासणार नाही. मात्र ‘आपलं पोट भरलं ना, मग दुसºयांचा विचार का करायचा’, अशी मानसिकता समाजात असल्याची खंतही मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.झाडीपट्टीत मागच्या जानेवारीपासून येण्यास सुरूवात केली. झाडीपट्टीत मोठे कलाकार आहेत. कलाकारांनी कलेचा दर्जा वाढविण्याची गरज आहे. संधी मिळावी म्हणून जो धडपडतो, तो कला क्षेत्रात टिकतो, असेही मकरंद यांनी सांगितले.