शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

झाडीपट्टी नाटकातील भूमिका साकारणे, हे आव्हानच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:02 IST

झाडीपट्टी नाटकांना शंभर वर्षांपूर्वीपासूनची परंपरा आहे आणि ही परंपरा झाडीपट्टीतील कलावंत आजही जोपासत आहेत.

ठळक मुद्देमकरंद अनासपुरे : मराठी कलावंताची ‘लोकमत’शी बातचित

राजकुमार चुनारकर।आॅनलाईन लोकमतचिमूर : झाडीपट्टी नाटकांना शंभर वर्षांपूर्वीपासूनची परंपरा आहे आणि ही परंपरा झाडीपट्टीतील कलावंत आजही जोपासत आहेत. तुम्ही कुठेही काम करीत असाल तर तुम्हाला कलाकार म्हणून स्वत:ला तपासणे गरजचे आहे. चित्रपटांमध्ये तशी संधी राहत नाही. कारण सिनेमामध्ये ‘रिटेक’ असतो. मात्र नाटकात अखंड काम करावे लागते व नाटकात रिटेक नसतो. त्यामुळे झाडीपट्टीतील नाटकात भूमिका साकारणे हे कलाकारांपुढे आव्हान असते, असे मत मराठी सिनेमातील कलावंत मकरंद अनासपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.चिमूर तालुक्यातील नेरी येथे आयोजित ‘गद्दार’ नाटकात ‘नाम्या’ ची भूमिका मकरंद अनासपुरे यांनी साकारली होती. नाटकाच्या मध्यंतरात त्यांना गाठून त्यांची प्रस्तुत प्रतिनिधीने बातचित केली. मराठी चित्रपटसृष्टीत व ‘नाम फाऊंडेशन’ संस्थेच्या कार्याने पूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असणारे मकरंद अनासपुरे म्हणाले, सगळ्याच भागातील चित्रपट बनले आहेत. आता झाडीपट्टीतील विषयांवर चित्रपट बनायला हवा. झाडीपट्टी रंगभूमीतील अडचणी मी स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून मांडणार आहे व मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने ते झाडीपट्टीला न्याय देतील. सगळ्याच ग्रामीण भाषेत गोडवा आहे. त्यामुळे ती भाषा मंचावर येणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला तर शेतकºयांच्या समस्या राहणार नाही व आत्महत्याही होणार नाही. सरकार शेतकऱ्यांना भाव देत नाही.त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी आहे. शेतकरीही स्वाभिमानी आहेत. गरज नसल्यास ते कर्ज घेत नाही. मात्र परिस्थितीमुळे शेतकरी कर्ज घेतो व कर्जापायी आत्महत्या करतो.मात्र सामाजिक बांधीलकी म्हणून ‘नाम’ फाऊंडेशनद्वारे शेतकºयांसाठी काही प्रमाणात काम केले जात आहे. नाम फाऊंडेशन कुणावर टिका किंवा प्रसिद्धीसाठी काम करीत नाही. नाम फाऊंडेशन शेतकरी, विधवा, वीर सैनिकांसाठी काम करते. त्यामध्ये शेतकºयांना १५ हजार तर शहीद सैनिकांना २ लाख ५० हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे.‘नाम’ द्वारे जलसंघटनांचेही कामे केली जात आहेत. १२८ गावात नद्या, तलाव, कालवे खोलीकरणाचे काम केलेत.नक्षलग्रस्त गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा नाम फाऊंडेशनचे काम सुरू करणार आहोत. सगळ्यांनी माणुसकीचा विचार केल्यास या संघटनांना काम करण्याची गरज भासणार नाही. मात्र ‘आपलं पोट भरलं ना, मग दुसºयांचा विचार का करायचा’, अशी मानसिकता समाजात असल्याची खंतही मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.झाडीपट्टीत मागच्या जानेवारीपासून येण्यास सुरूवात केली. झाडीपट्टीत मोठे कलाकार आहेत. कलाकारांनी कलेचा दर्जा वाढविण्याची गरज आहे. संधी मिळावी म्हणून जो धडपडतो, तो कला क्षेत्रात टिकतो, असेही मकरंद यांनी सांगितले.