शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

प्लॅटफाॅर्म तिकीट दर वाढले, मात्र गर्दी ओसरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST

चंद्रपूर: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकिटांचे दर वाढविण्यात आले आहे. मात्र तरीही स्थानकावरील गर्दी ...

चंद्रपूर: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकिटांचे दर वाढविण्यात आले आहे. मात्र तरीही स्थानकावरील गर्दी ओसरलेली नसून प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांची संख्या वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनामुळे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले. तब्बल आठ ते नऊ महिने रेल्वे ठप्प होती. आता हळूहळू रेल्वे रुळावर येत आहे. प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे काही मोजक्या रेल्वेगाड्या सुरू केल्या. रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षित तिकीट महत्त्वाचे करण्यात आले आहे. सर्वसामान्य बोग्या बंद करण्यात आल्या. रेल्वे स्थानकावर केवळ प्रवाशांनाच येऊ दिल्या जात होते. त्यांना सोडण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना मात्र फलाटावर येण्यास मनाई करण्यात आली होती. आता हळूहळू रेल्वेगाड्यांची सख्या वाढविण्यात आली. त्यामुळे रेल्वे फलाटांवर प्रवाशांसह त्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांची संख्याही वाढू लागली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पूर्वी १० रुपये असलेले प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दर वाढवून ३० रुपये करण्याचा निर्णय घेतला. पण तरी देखील प्रवाशांसह त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाइकांची गर्दी कमी झाली नाही. रेल्वे स्थानकावर काम नसतानाही फिरणाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान लक्ष ठेवून आहेत. असे लोक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहेत.

तरीही विकली गेली फ्लॅटफॅार्म तिकिटे

रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर गर्दी कमी करण्यासाठी फ्लॅटफॅार्म तिकिटांमध्ये वाढ केली असून आता नागरिकांना प्लॅटफाॅर्म तिकीट काढण्यासाठी ३० रुपये मोजावे लागत आहे. मात्र शनिवार तसेच रविवारी मोठ्या प्रमाणात प्लॅटफाॅर्म तिकीट विकल्या गेल्याची माहिती मिळाली आहे.

कोट

कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत आहे. असे असतानाही रेल्वे प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी होती. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकीट वाढ करण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात गर्दीवर नियंत्रण आली आहे.

-एम.एन. बेग

टीटीआयई, बल्लारशाह

--

२५ गाड्यांची ये-जा

चंद्रपूर तसेच बल्लारपूर रेल्वे स्थानकावरून दररोज २० ते २५ रेल्वे गाड्यांची ये-जा सुरू असते. चंद्रपूरमध्ये काही गाड्या थांबत नाही. मात्र बल्लारशाह रेल्वे स्थानकावर सर्व गाड्या थांबतात. कोरोनच्या संकटामुळे पॅसेंजर गाड्या अजूनही बंदच आहेत. केवळ सुपरफास्ट गाड्या, स्पेशल गाड्यांची धडधड स्थानकावर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

--

हजार ते बाराशे प्रवाशांचा प्रवास

मध्य रेल्वेचे चंद्रपूर तसेच बल्लारपूर स्थानक महत्त्वाचे आहे. येथून चेन्नई, दिल्ली तसेच अन्य मार्गाकडे मोठ्या प्रमाणात रेल्वे धावतात. कोरोनामुळे काही प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत नाही. असे असले तरी दररोज सरासरी हजार ते बाराशे प्रवासी रेल्वेने प्रवास करीत असल्याची माहिती मिळाली आहे.