शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

प्लॅटफाॅर्म तिकीट दर वाढले, मात्र गर्दी ओसरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST

चंद्रपूर: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकिटांचे दर वाढविण्यात आले आहे. मात्र तरीही स्थानकावरील गर्दी ...

चंद्रपूर: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकिटांचे दर वाढविण्यात आले आहे. मात्र तरीही स्थानकावरील गर्दी ओसरलेली नसून प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांची संख्या वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनामुळे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले. तब्बल आठ ते नऊ महिने रेल्वे ठप्प होती. आता हळूहळू रेल्वे रुळावर येत आहे. प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे काही मोजक्या रेल्वेगाड्या सुरू केल्या. रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षित तिकीट महत्त्वाचे करण्यात आले आहे. सर्वसामान्य बोग्या बंद करण्यात आल्या. रेल्वे स्थानकावर केवळ प्रवाशांनाच येऊ दिल्या जात होते. त्यांना सोडण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना मात्र फलाटावर येण्यास मनाई करण्यात आली होती. आता हळूहळू रेल्वेगाड्यांची सख्या वाढविण्यात आली. त्यामुळे रेल्वे फलाटांवर प्रवाशांसह त्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांची संख्याही वाढू लागली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पूर्वी १० रुपये असलेले प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दर वाढवून ३० रुपये करण्याचा निर्णय घेतला. पण तरी देखील प्रवाशांसह त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाइकांची गर्दी कमी झाली नाही. रेल्वे स्थानकावर काम नसतानाही फिरणाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान लक्ष ठेवून आहेत. असे लोक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहेत.

तरीही विकली गेली फ्लॅटफॅार्म तिकिटे

रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर गर्दी कमी करण्यासाठी फ्लॅटफॅार्म तिकिटांमध्ये वाढ केली असून आता नागरिकांना प्लॅटफाॅर्म तिकीट काढण्यासाठी ३० रुपये मोजावे लागत आहे. मात्र शनिवार तसेच रविवारी मोठ्या प्रमाणात प्लॅटफाॅर्म तिकीट विकल्या गेल्याची माहिती मिळाली आहे.

कोट

कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत आहे. असे असतानाही रेल्वे प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी होती. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकीट वाढ करण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात गर्दीवर नियंत्रण आली आहे.

-एम.एन. बेग

टीटीआयई, बल्लारशाह

--

२५ गाड्यांची ये-जा

चंद्रपूर तसेच बल्लारपूर रेल्वे स्थानकावरून दररोज २० ते २५ रेल्वे गाड्यांची ये-जा सुरू असते. चंद्रपूरमध्ये काही गाड्या थांबत नाही. मात्र बल्लारशाह रेल्वे स्थानकावर सर्व गाड्या थांबतात. कोरोनच्या संकटामुळे पॅसेंजर गाड्या अजूनही बंदच आहेत. केवळ सुपरफास्ट गाड्या, स्पेशल गाड्यांची धडधड स्थानकावर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

--

हजार ते बाराशे प्रवाशांचा प्रवास

मध्य रेल्वेचे चंद्रपूर तसेच बल्लारपूर स्थानक महत्त्वाचे आहे. येथून चेन्नई, दिल्ली तसेच अन्य मार्गाकडे मोठ्या प्रमाणात रेल्वे धावतात. कोरोनामुळे काही प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत नाही. असे असले तरी दररोज सरासरी हजार ते बाराशे प्रवासी रेल्वेने प्रवास करीत असल्याची माहिती मिळाली आहे.