शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

प्लॅटफाॅर्म तिकीट दर वाढले, मात्र गर्दी ओसरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST

चंद्रपूर: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकिटांचे दर वाढविण्यात आले आहे. मात्र तरीही स्थानकावरील गर्दी ...

चंद्रपूर: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकिटांचे दर वाढविण्यात आले आहे. मात्र तरीही स्थानकावरील गर्दी ओसरलेली नसून प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांची संख्या वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनामुळे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले. तब्बल आठ ते नऊ महिने रेल्वे ठप्प होती. आता हळूहळू रेल्वे रुळावर येत आहे. प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे काही मोजक्या रेल्वेगाड्या सुरू केल्या. रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षित तिकीट महत्त्वाचे करण्यात आले आहे. सर्वसामान्य बोग्या बंद करण्यात आल्या. रेल्वे स्थानकावर केवळ प्रवाशांनाच येऊ दिल्या जात होते. त्यांना सोडण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना मात्र फलाटावर येण्यास मनाई करण्यात आली होती. आता हळूहळू रेल्वेगाड्यांची सख्या वाढविण्यात आली. त्यामुळे रेल्वे फलाटांवर प्रवाशांसह त्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांची संख्याही वाढू लागली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पूर्वी १० रुपये असलेले प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दर वाढवून ३० रुपये करण्याचा निर्णय घेतला. पण तरी देखील प्रवाशांसह त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाइकांची गर्दी कमी झाली नाही. रेल्वे स्थानकावर काम नसतानाही फिरणाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान लक्ष ठेवून आहेत. असे लोक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहेत.

तरीही विकली गेली फ्लॅटफॅार्म तिकिटे

रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर गर्दी कमी करण्यासाठी फ्लॅटफॅार्म तिकिटांमध्ये वाढ केली असून आता नागरिकांना प्लॅटफाॅर्म तिकीट काढण्यासाठी ३० रुपये मोजावे लागत आहे. मात्र शनिवार तसेच रविवारी मोठ्या प्रमाणात प्लॅटफाॅर्म तिकीट विकल्या गेल्याची माहिती मिळाली आहे.

कोट

कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत आहे. असे असतानाही रेल्वे प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी होती. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकीट वाढ करण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात गर्दीवर नियंत्रण आली आहे.

-एम.एन. बेग

टीटीआयई, बल्लारशाह

--

२५ गाड्यांची ये-जा

चंद्रपूर तसेच बल्लारपूर रेल्वे स्थानकावरून दररोज २० ते २५ रेल्वे गाड्यांची ये-जा सुरू असते. चंद्रपूरमध्ये काही गाड्या थांबत नाही. मात्र बल्लारशाह रेल्वे स्थानकावर सर्व गाड्या थांबतात. कोरोनच्या संकटामुळे पॅसेंजर गाड्या अजूनही बंदच आहेत. केवळ सुपरफास्ट गाड्या, स्पेशल गाड्यांची धडधड स्थानकावर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

--

हजार ते बाराशे प्रवाशांचा प्रवास

मध्य रेल्वेचे चंद्रपूर तसेच बल्लारपूर स्थानक महत्त्वाचे आहे. येथून चेन्नई, दिल्ली तसेच अन्य मार्गाकडे मोठ्या प्रमाणात रेल्वे धावतात. कोरोनामुळे काही प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत नाही. असे असले तरी दररोज सरासरी हजार ते बाराशे प्रवासी रेल्वेने प्रवास करीत असल्याची माहिती मिळाली आहे.